शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

लाॅकडाऊन काळात बलुतेदारांना आर्थिक पॅकेज द्या : राजेंद्र भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:38 IST

मलटण : ‘लाॅकडाऊन काळात घोषित केलेल्या आर्थिक पॅकेजमध्ये बलुतेदारा॑चा समावेश करण्यात यावा,’ अशी मागणी राज्य बलुतेदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष ...

मलटण :

‘लाॅकडाऊन काळात घोषित केलेल्या आर्थिक पॅकेजमध्ये बलुतेदारा॑चा समावेश करण्यात यावा,’ अशी मागणी राज्य बलुतेदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र भागवत यांनी केली आहे.

लाॅकडाऊन जरुर करा; पण छोटे शेतकरी, वंचित उपेक्षित असंघटित बेरोजगार, ग्रामीण छोटे कारागीर, नाभिक, परीट, छोटे व्यावसायिक चर्मकार, फूल विक्रेते बलुतेदार यांचा शासनाने विचार करणं गरजेचं आहे.

या छोट्या कारागिरांनी सहकारी पतसंस्था, बँकांचे कर्ज काढून आपल्या व्यवसाय चालवून आपला चरितार्थ चालवित आहेत. गतवर्षीच्या लाॅकडाऊनमुळे हा वर्ग पूर्णपणे अडचणीत आला आहे. कोरोना साथीचा उपद्रव कमी झाला, व्यवसाय हळूहळू पुन्हा सुरू होऊ लागले. व्यवसाय पुन्हा वेगाला लागताच पुन्हा यावर्षी कोरोनाचे वादळ घोंगावत वेगाने प्रसार वाढू लागला. रोजरोज लाॅकडाऊनच्या भीतीखाली असतानाच एकदाचा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला. पण छोट्या व्यावसायिकांना पुन्हा आपले व्यवसाय शासनाने बंद करण्याचा आदेश दिला.

केस कर्तनालय, लाँड्री, झाडू, दोरखंड व्यवसाय बंद असल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीची शासनाने काळजी घेणे गरजेचे आहे. या व्यावसायिकांना इतरांप्रमाणे कोरोना प्रतिबंधात्मक नियम लावून व्यवसाय सुरू करण्यास मुभा देणे गरजेचे असताना मोठ्या कंपन्या सुरू ठेवून छोटे व्यावसायिक मारण्याचा सरकार प्रयत्न करताना दिसून येत आहे.

नोंदणीकृत कामगारांना महिना १५००, बिगर नोंदणीकृत व्यवसाय ग्रामीण भागात जास्त आहेत. नगरपालिका ग्रामपंचायतींनी आपल्या परिसरातील व्यवसाय नोंदणी करणे बंधनकारक केले जात नाही. बोगस नोंदणीधारक अनुदान लाटतात छोट्या व्यवसायांना काहीच मिळत नाही. लाॅकडाऊन जरुर करा; पण वंचित उपेक्षित असंघटित क्षेत्रातील बलुतेदार वर्ग यांच्या पोटापाण्याचा विचार होणे गरजेचे आहे,’ असे भागवत यांनी सांगितले.