शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

आघाडीवर काम करणाऱ्यांना आर्थिक मदत करा : खंडाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:40 IST

सातारा : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेची व प्रत्यक्षात ग्राउंडवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रोत्साहन भत्त्याच्या नावाखाली चेष्टा सुरू केली ...

सातारा : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेची व प्रत्यक्षात ग्राउंडवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रोत्साहन भत्त्याच्या नावाखाली चेष्टा सुरू केली आहे. ती थांबवून या कर्मचाऱ्यांना सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी केली आहे.

कोरोना रोखण्यासाठी काम करत असलेले नगरपालिका सफाई कामगार व आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, मदतनीस यांना १२ महिन्यांच्या कामाचा प्रोत्साहन भत्ता देताना परिपत्रकात शब्द छल केला आणि महिना १००० रुपये भत्ता न देता एकूण कामाचा १००० रुपये भत्ता दिला. म्हणजे प्रत्येक दिवसाला २.५० पै. इतका प्रोत्साहन भत्ता दिला आहे.

मागील वर्षी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेला मदतीचा हात म्हणून फक्त तीनच महिने धान्य शिधापत्रिकेवर मोफत दिले आणि उरलेले नऊ महिने त्यांना वाऱ्यावर सोडले. यावेळीही राज्य सरकारने फक्त एक महिना तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू शिधापत्रिकेवर देण्याचे जाहीर केले. केंद्र व राज्य सरकारने सांगावे की, मागील वर्षी फक्त तीनच महिने आणि यावर्षी एकच महिना कोविड-१९ आहे. बाकीच्या वेळी नाही, त्यामुळे ही एकप्रकारे सर्वसामान्य जनतेची, त्यांच्या परिस्थितीची घोर चेष्टाच आहे. याचा विचार करून आता तरी कोविड-१९ ची गंभीर परिस्थिती आहे तोपर्यंत शिधापत्रिका असणारे, पण ज्यांना जगण्यासाठी धान्याची गरज आहे, त्यांना प्रती युनिट धान्य व डाळ, खाद्यतेल, साखर या वस्तू देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.