शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

साडेचौदा कोटींचा लेखाजोखा द्या!

By admin | Updated: August 12, 2014 23:14 IST

किवळ-खोडजाईवाडी बंधारा : निकृष्ट दर्जाचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद

मसूर : मागील तीन वर्षांपासून सुरू असलेले किवळ-खोडजाईवाडी बंधाऱ्याचे काम निकृष्ट होत असल्याचे निदर्शनास येताच संतप्त ग्रामस्थांनी ते काम बंद पाडले. प्रारंभी २ कोटी ८५ लाख रूपयांच्या निधीवरून दुप्पट-तिप्पट नव्हे तर तब्बल साडेचौदा कोटी रूपयांची वाढीव तरतूद होऊनही अपूर्ण तसेच निकृष्ट दर्जाचे काम का होत आहे, असा सवाल करून या तलाव्याच्या कामावर नक्की किती खर्च आला? साडेचौदा कोटी रूपयांचे काय काम केले, याचा लेखाजोखा संबंधित विभागाने देण्याची मागणी किवळ येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप साळुंखे यांनी केली.साळुंखे म्हणाले, ‘किवळ भागाने पाण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. टँकरने पाणी पिण्याची पावसाळ्यातही किवळ गावावर वेळ आली होती. किवळ-खोडजाईवाडीदरम्यान तलाव झाल्यास आसपासच्या विहिरींना, शेतीला पाणी उपलब्ध होईल. या ग्रामस्थांच्या मागणीनुसार शासनाच्या लघुपाटबंधारे विभागाने २ कोटी ८५ लाख रूपये तरतुदीचा मोठा तलाव बांधण्याचे काम गेल्या ३ वर्षांपासून सुरू केले आहे. यासाठी अनेक पदाधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. तथापि अधिकारी-सुपरवायझर यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे काम सध्या निदर्शनास आले आहे. तलावाच्या साठवणभिंंतीत मातीमिश्रित वाळू व खडीचा वापर अल्प सिमेंटमध्ये करून ग्रीटचा वापर जास्त केला आहे. तलावाची पीचिंगची कामे अद्याप तशीच आहेत. अधिक पाणीसाठा झाल्यास सांडवा केव्हाही फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. २ कोटी ८५ लाखांचे प्रत्यक्षात काम असले तरी दीड कोटीचेही काम झाले नसताना वाढीव साडेचौदा कोटी रूपयांच्या निधीची आणखी तरतूद करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात किती कोटींचे काम केले, याचे पुरावे संबंधितांनी द्यावेत.’या तलावाचे काम जुन्या तलावाच्या जागीच केले. पूर्वीच्या तलावाच्या मातीचाच वापर केला. माती कमी पडत असल्याचे कारण अधिकाऱ्यांनी पुढे केल्यावर ग्रामपंचायतीने शासनाच्या शेतीशाळेच्या सात एकरातील माती या तलावासाठी दिली. तलावाच्या भराव्यासाठी ही माती नेत असताना मोठे डबरे, खडे तसेच पडून ठेवले असून, तेथे गाळ भरण्याचे काम जाणीवपूर्वक अपूर्ण ठेवले आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सध्या सात एकर जमीन नापीक, निरूपयोगी झाली आहे. याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करतानाच, ही बाब तहसीलदारांच्या निदर्शनास आणून देऊनही त्यांनी दुर्लक्ष झाल्याचा आरोप साळुंखे यांनी केला आहे.यावेळी प्रकाश साळुंखे, सचिन साळुंखे , पै. शिवाजीराव साळुंखे, सागर साळुंखे, संतोष साळुंखे, राजेंद्र साळुंखे, विजय साळुंखे, सुहास साळुंखे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)तलावाच्या सांडवा भरावासाठी अल्प सिमेंट आणि मातीमिश्रित वाळू-खडीचा तसेच ग्रीटचा वापर करण्यात आला आहे. संबंधित सुपरवाईझरना काही ग्रामस्थांनी जाब विचारून असे निकृष्ट काम करून भविष्यात हा तलाव टिकणार का, असा सवाल केला. त्यावर ‘हेच प्रमाण अधिकाऱ्यांनी सांगितले आहे,’ असे स्पष्टीकरण सुपरवायझरनी दिले. म्हणजे अधिकारी-कंत्राटदार यांच्या संगनमतानेच हे निकृष्ट काम सुरू आहे.- प्रदीप साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते, किवळ