शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
2
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
3
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
4
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
5
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
6
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
7
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
8
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
9
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
10
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
11
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
12
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
13
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
14
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
15
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
16
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
17
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
18
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
19
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!

शेती नुकसानीची १०० टक्के भरपाई मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:41 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार अतिवृष्टी झाली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीतील शेती पिके, ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार अतिवृष्टी झाली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीतील शेती पिके, जमीन नुकसानीची १०० टक्के भरपाई मिळावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत करण्यात आला. तसेच सभेला गैरहजर राहणाऱ्या वीज कंपनी अधिकाऱ्यांना नोटीस काढण्याचा निर्णयही घेण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जलव्यवस्थापन आणि स्थायी समितीची सभा झाली. अध्यक्ष उदय कबुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच अनेक ठरावही करण्यात आले. सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी समिती सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण समितीच्या सभापती कल्पना खाडे, महिला व बालकल्याण समिती सभापती सोनाली पोळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, समितींचे सदस्य उपस्थित होते.

सभागृहात सुरुवातीला जलव्यवस्थापन समितीची सभा झाली. या सभेत मागील सभेचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्यात आला. त्यानंतर विविध विषयांवर चर्चा झाली. मागील काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली. यामध्ये जिल्ह्यातील तलाव, पाणीपुरवठा योजनांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी सूचना अध्यक्ष उदय कबुले यांनी केली. तसेच जिल्ह्यातील पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी तीन कोटी ६२ लाखांचा निधी लागणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच अनेक पाझर तलावावर व बाजूला झाडे वाढली आहेत. यामुळे तलावाला धोका निर्माण झाला असल्याने ती काढण्याबाबत उपाययोजना करावी, अशी चर्चाही सभेत झाली.

स्थायीच्या सभेत सुरुवातीला मागील सभेत झालेल्या ठरावावरील कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर अतिवृष्टीचा विषय सभागृहात समोर आला. जिल्ह्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टी झाली. यामध्ये भूस्खलन होऊन अनेकांचा मृत्यू झाला. तसेच महापूर व अतिवृष्टीने शेती व पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी शेती नुकसानीची संपूर्ण भरपाई मिळावी, असा ठराव घेण्यात आला.

दरम्यान, सभेत २०२१-२२ या वर्षातील कामांना आठ दिवसांत प्रशासकीय मान्यता देण्याचे काम पूर्ण करा, अशी सूचना अध्यक्ष कबुले यांनी अधिकाऱ्यांना केली. तसेच पूर भागातील रस्त्यांच्या कामासाठी आपत्कालीन निधीही मंजूर करण्यात आला.

चौकट :

वीज कंपनीबद्दल नाराजी...

जिल्हा परिषदेच्या अनेक सभांना वीज वितरण कंपनीचे अधिकारी हजर राहत नाहीत. मागील सभेलाही कोणी अधिकारी हजर नव्हता. त्यामुळे वीज कंपनीला नोटीस काढण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर गुरुवारच्या सभेलाही अधिकारी हजर नसल्याने पुन्हा नोटीस काढण्याची सूचना अध्यक्षांनी केली.

...............................................................