शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

शेती नुकसानीची १०० टक्के भरपाई मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:41 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार अतिवृष्टी झाली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीतील शेती पिके, ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार अतिवृष्टी झाली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीतील शेती पिके, जमीन नुकसानीची १०० टक्के भरपाई मिळावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत करण्यात आला. तसेच सभेला गैरहजर राहणाऱ्या वीज कंपनी अधिकाऱ्यांना नोटीस काढण्याचा निर्णयही घेण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जलव्यवस्थापन आणि स्थायी समितीची सभा झाली. अध्यक्ष उदय कबुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच अनेक ठरावही करण्यात आले. सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी समिती सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण समितीच्या सभापती कल्पना खाडे, महिला व बालकल्याण समिती सभापती सोनाली पोळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, समितींचे सदस्य उपस्थित होते.

सभागृहात सुरुवातीला जलव्यवस्थापन समितीची सभा झाली. या सभेत मागील सभेचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्यात आला. त्यानंतर विविध विषयांवर चर्चा झाली. मागील काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली. यामध्ये जिल्ह्यातील तलाव, पाणीपुरवठा योजनांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी सूचना अध्यक्ष उदय कबुले यांनी केली. तसेच जिल्ह्यातील पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी तीन कोटी ६२ लाखांचा निधी लागणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच अनेक पाझर तलावावर व बाजूला झाडे वाढली आहेत. यामुळे तलावाला धोका निर्माण झाला असल्याने ती काढण्याबाबत उपाययोजना करावी, अशी चर्चाही सभेत झाली.

स्थायीच्या सभेत सुरुवातीला मागील सभेत झालेल्या ठरावावरील कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर अतिवृष्टीचा विषय सभागृहात समोर आला. जिल्ह्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टी झाली. यामध्ये भूस्खलन होऊन अनेकांचा मृत्यू झाला. तसेच महापूर व अतिवृष्टीने शेती व पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी शेती नुकसानीची संपूर्ण भरपाई मिळावी, असा ठराव घेण्यात आला.

दरम्यान, सभेत २०२१-२२ या वर्षातील कामांना आठ दिवसांत प्रशासकीय मान्यता देण्याचे काम पूर्ण करा, अशी सूचना अध्यक्ष कबुले यांनी अधिकाऱ्यांना केली. तसेच पूर भागातील रस्त्यांच्या कामासाठी आपत्कालीन निधीही मंजूर करण्यात आला.

चौकट :

वीज कंपनीबद्दल नाराजी...

जिल्हा परिषदेच्या अनेक सभांना वीज वितरण कंपनीचे अधिकारी हजर राहत नाहीत. मागील सभेलाही कोणी अधिकारी हजर नव्हता. त्यामुळे वीज कंपनीला नोटीस काढण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर गुरुवारच्या सभेलाही अधिकारी हजर नसल्याने पुन्हा नोटीस काढण्याची सूचना अध्यक्षांनी केली.

...............................................................