शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
4
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
5
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
6
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
7
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
8
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
9
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
10
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
11
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
12
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
13
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
14
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
15
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
16
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा
17
ही AI मशीनगन चालवण्यासाठी माणसाची गरज नाही! स्वतःच शत्रूला ओळखणार अन् गोळ्याही घालणार
18
Google Chrome: डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा!
19
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
20
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?

फाटक बंद..आंदोलन सुरू!

By admin | Updated: March 30, 2015 00:10 IST

कोणेगावच्या ग्रामस्थांमध्ये संताप : पस्तीस वर्षांपासूनची परंपरा होणार कालबाह्य

मसूर : कोणेगाव, ता. कऱ्हाड या गावाला मसूरहून कांबिरवाडीमार्गे जात असताना कांबिरवाडी व कोणेगाव दरम्यान असणारे रेल्वे गेट सोमवार, दि. ३० पासून कायमचे बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणेगाव ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी अकरा वाजता रेल रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. या परिसरातील वाड्या-वस्त्या तसेच कोणेगावातील सुमारे तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला याशिवाय पर्यायी रस्ता नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.गेल्या पस्तीस वर्षांपासून याठिकाणी रेल्वे फाटक आहे. या फाटकामधून ग्रामस्थ नेहमी ये-जा करतात. मात्र, रेल्वे प्रशासनाने अचानक हे फाटक बंद करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. कोणेगावला तिन्ही बाजूंनी कृष्णा नदी असून, गावाला मुख्य बाजारपेठ असलेल्या मसूर यागावी जाण्यासाठी या गेटचा उपयोग होत आहे. या गेटऐवजी पर्यायी रस्ता हा कच्चा असून, तो अरुंद आहे. पावसाळ्यात समोरून वाहन आले तर लोकांना रेल्वेकडेला जावे लागणार आहे. आणि त्यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. हा रस्ता काळ्या मातीतून गेला आहे. गेल्या ३५ वर्षांपासून हे फाटक सुरू झाल्यापासून आजपर्यंत ते सायंकाळी सात वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत बंद अवस्थेत होते तरीही ग्रामस्थांनी कोणतीही तक्रार न करता त्या मार्गावरून ये -जा केली. परंतु आता फाटकच बंद होत आहे.रेल्वे प्रशासनाने फाटकाशेजारी रेल्वे गेट सोमवारपासून बंद करण्यात येत असल्याचा फलक लावला आहे. हा फलक वाचून ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. ग्रामस्थांना कसलीही पूर्व सूचना न देता रेल्वे प्रशासनाने ही आडमुठी भूमिका घेतल्याने ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. रविवारी रेल्वे फाटकावर काही नागरिकांना अचानक फलक दिसला. सोमवारपासून हे फाटक बंद होणार असल्याने गावात याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. काहींनी तातडीने बैठक घेऊन यावर आंदोलनाची तयारी करण्यासाठी निर्णय घेतला. (वार्ताहर)गत पस्तीस वर्षापासून वापरात असणारे गेट रेल्वे प्रशासनाने अचानक बंद करण्याचा घेतलेला निर्णय गावाला विचारात घेवून घ्यायला हवा होता. उंब्रज - मसूर रस्त्यावर असणा-या गेटच्या ठिकाणी उड्डाण पूल होणार आहे. असे समजते परंतु जोपर्यंत उड्डाण पूल होत नाही तोपर्यंत तरी आमचे गेट चालू रहावे.राजकुमार चव्हाणमाजी उपसरपंच कोणेगांवआमची कुचंबणा करु नका कांबिरवाडी-कोणेगावदरम्यान असलेले रेल्वेच्या फाटकाचा गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून येथील नागरिक रहदारीसाठी वापर करत आहेत, असे असताना हे फटक बंद करण्याचा निर्णय घेतला. सध्या पर्यायी रस्ता या ठिकाणी नाही. पलीकडे कसे जायचे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.