शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

फाटक बंद..आंदोलन सुरू!

By admin | Updated: March 30, 2015 00:10 IST

कोणेगावच्या ग्रामस्थांमध्ये संताप : पस्तीस वर्षांपासूनची परंपरा होणार कालबाह्य

मसूर : कोणेगाव, ता. कऱ्हाड या गावाला मसूरहून कांबिरवाडीमार्गे जात असताना कांबिरवाडी व कोणेगाव दरम्यान असणारे रेल्वे गेट सोमवार, दि. ३० पासून कायमचे बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणेगाव ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी अकरा वाजता रेल रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. या परिसरातील वाड्या-वस्त्या तसेच कोणेगावातील सुमारे तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला याशिवाय पर्यायी रस्ता नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.गेल्या पस्तीस वर्षांपासून याठिकाणी रेल्वे फाटक आहे. या फाटकामधून ग्रामस्थ नेहमी ये-जा करतात. मात्र, रेल्वे प्रशासनाने अचानक हे फाटक बंद करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. कोणेगावला तिन्ही बाजूंनी कृष्णा नदी असून, गावाला मुख्य बाजारपेठ असलेल्या मसूर यागावी जाण्यासाठी या गेटचा उपयोग होत आहे. या गेटऐवजी पर्यायी रस्ता हा कच्चा असून, तो अरुंद आहे. पावसाळ्यात समोरून वाहन आले तर लोकांना रेल्वेकडेला जावे लागणार आहे. आणि त्यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. हा रस्ता काळ्या मातीतून गेला आहे. गेल्या ३५ वर्षांपासून हे फाटक सुरू झाल्यापासून आजपर्यंत ते सायंकाळी सात वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत बंद अवस्थेत होते तरीही ग्रामस्थांनी कोणतीही तक्रार न करता त्या मार्गावरून ये -जा केली. परंतु आता फाटकच बंद होत आहे.रेल्वे प्रशासनाने फाटकाशेजारी रेल्वे गेट सोमवारपासून बंद करण्यात येत असल्याचा फलक लावला आहे. हा फलक वाचून ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. ग्रामस्थांना कसलीही पूर्व सूचना न देता रेल्वे प्रशासनाने ही आडमुठी भूमिका घेतल्याने ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. रविवारी रेल्वे फाटकावर काही नागरिकांना अचानक फलक दिसला. सोमवारपासून हे फाटक बंद होणार असल्याने गावात याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. काहींनी तातडीने बैठक घेऊन यावर आंदोलनाची तयारी करण्यासाठी निर्णय घेतला. (वार्ताहर)गत पस्तीस वर्षापासून वापरात असणारे गेट रेल्वे प्रशासनाने अचानक बंद करण्याचा घेतलेला निर्णय गावाला विचारात घेवून घ्यायला हवा होता. उंब्रज - मसूर रस्त्यावर असणा-या गेटच्या ठिकाणी उड्डाण पूल होणार आहे. असे समजते परंतु जोपर्यंत उड्डाण पूल होत नाही तोपर्यंत तरी आमचे गेट चालू रहावे.राजकुमार चव्हाणमाजी उपसरपंच कोणेगांवआमची कुचंबणा करु नका कांबिरवाडी-कोणेगावदरम्यान असलेले रेल्वेच्या फाटकाचा गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून येथील नागरिक रहदारीसाठी वापर करत आहेत, असे असताना हे फटक बंद करण्याचा निर्णय घेतला. सध्या पर्यायी रस्ता या ठिकाणी नाही. पलीकडे कसे जायचे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.