शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

गॅस दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:13 IST

कुडाळ : महागाईने उच्चांक गाठला आहे. यातच दिवाळीपासून स्वयंपाकाच्या गॅस दरवाढीने महागाईच्या भडक्यात आणखीच भर घातली. गेल्या चार महिन्यांत ...

कुडाळ : महागाईने उच्चांक गाठला आहे. यातच दिवाळीपासून स्वयंपाकाच्या गॅस दरवाढीने महागाईच्या भडक्यात आणखीच भर घातली. गेल्या चार महिन्यांत गॅसच्या दरात तब्बल दोनशे रुपयांची वाढ झाली. किराण्याबरोबरच भाजीपाल्याचेही दर भडकले आहेत. यामुळे सर्वसामान्य गृहिणींचे आर्थिक बजेट पुरते कोलमडले आहे.

कोरोनाच्या काळात या वर्षी अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. मिळेल तो रोजगार करून सर्वसामान्य आपला उदरनिर्वाह करू लागला. अशातच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही गगनाला भिडल्या. टप्प्याटप्प्याने अनलॉक झाल्यानंतर विस्कटलेली व्यवसायाची घडी हळूहळू रुळावर यायला लागली. यामुळे महागाई कमी होईल, अशी आशा होती.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून गॅस दरवाढीने कमालीची पातळी गाठल्याने गृहिणींचे बजेट पुरते कोलमडले आहे. ग्रामीण भागात शासनाच्या वतीने उज्ज्वला योजनेतून अनेक लाभार्थींना गॅस कनेक्शन दिले आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या घरातही स्वयंपाकासाठी गॅस पेटत होता. महिलांचा धुरापासून बचाव व्हावा, वृक्षतोड थांबावी यासाठी सवलतीच्या दरात गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. मात्र गेल्या काही दिवसांपासून गॅसच्या किमती वाढत असून सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. एका सिलिंडरसाठी आठशे रुपये मोजावे लागत आहेत. यामुळे सर्वसामान्यांना गॅस खरेदी करणे परवडत नसल्याने त्यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा चुलीकडे वळवला आहे. आता गॅसची शेगडी गुंडाळून ठेवत स्वयंपाकासाठी ग्रामीण भागात पुन्हा एकदा चुली पेटू लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

चौकट :

दोन महिन्यांत दोनशेने वाढ

१ डिसेंबरपासून दर आठवड्याला स्वयंपाकाच्या गॅसदरात वाढ झालेली आहे. डिसेंबर महिन्यात ५९४ रुपयांना मिळणारा गॅस ८०० रुपयांवर पोहोचला आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत गॅस दरात तब्बल दोनशे रुपये इतकी प्रचंड वाढ झालेली आहे. यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट पुरते कोलमडले आहे. कोरोनाच्या काळात वाढत्या महागाईच्या झळा ग्रामीण भागातील सामान्य जनतेला अधिक प्रमाणात पोहोचत आहेत.

कोट :

गॅसच्या वाढलेल्या किमतीमुळे गॅस खरेदी करू शकत नाही. वाढत्या महागाईमुळे आमचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. गेले कित्येक दिवस बंद केलेल्या चुली आता पुन्हा पेटवण्याची वेळ आली आहे. याकरिता सर्वसामान्यांचा विचार करून शासनाने घरगुती गॅसच्या किमती आवाक्यात ठेवाव्यात.

- रेश्मा पवार, गृहिणी, कुडाळ