शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

गुंडांच्या टोळ्या तडीपारीच्या ‘रडार’वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:10 IST

कऱ्हाड : टोळीयुद्धाने धुमसणारं कऱ्हाड आता शांत झालंय. अंतर्गत कुरबुरी सुरू असल्या तरी गुंडगिरीला चांगलाच चाप बसलाय. भाईगिरीला पोलिसांनी ...

कऱ्हाड : टोळीयुद्धाने धुमसणारं कऱ्हाड आता शांत झालंय. अंतर्गत कुरबुरी सुरू असल्या तरी गुंडगिरीला चांगलाच चाप बसलाय. भाईगिरीला पोलिसांनी खीळ घातलीय. मात्र, एवढं करूनही काही टोळ्या सक्रिय होताना दिसताहेत. आणि याच टोळ्या सध्या पोलिसांच्या ‘रडार’वर आहेत.

कऱ्हाडातील शेख टोळीचा हस्तक असलेल्या अशिष पडळकरच्या टोळीला गत आठवड्यात तडीपार करण्यात आले आहे. त्यापूर्वीही आणखी दोन टोळ्यांच्या तडीपारीचे आदेश झाले आहेत. या तडीपारीमुळे गुन्हेगारी पूर्णपणे थांबणार नसली तरी त्याला चाप लागण्यास मदत होणार आहे. वास्तविक, कऱ्हाडला गुन्हेगारीचा मोठा इतिहास आहे. पूर्वी शहरात मोठ्या प्रमाणावर टोळ्या सक्रिय होत्या. वर्चस्ववादातून त्यांच्यात खटके उडायचे. हा वाद एवढा विकोपाला जायचा की, कायदा-सुव्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघायचे. मात्र, या वाढत्या टोळीयुद्धाला लगाम घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली. पटावरची प्यादी हेरली आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यामुळे गत काही वर्षांत कऱ्हाडातील गुन्हेगारी टोळ्या मोडीत निघाल्या आहेत.

गत दोन वर्षांत नव्याने काही टोळ्या कऱ्हाडात सक्रिय होण्याच्या तयारीत होत्या. गुन्हेगारांनी त्यांची पथारीही पसरलेली. मात्र, ऐनवेळी त्या टोळीची दहशत मोडीत काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला. त्यामुळे संघटित गुन्हेगारीवर काही प्रमाणात नियंत्रण आले. एकीकडे कऱ्हाड शहरात नव्याने काही टोळ्या बाळसं धरीत असताना मलकापूरसारख्या उपनगरातही टोळ्यांनी आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केली होती. गत काही वर्षांत घडलेल्या गुन्हेगारी घटनांमध्ये मलकापुरातील गुंडांच्या टोळीचा सहभाग अधोरेखित झाला आहे. त्यामुळे कऱ्हाडबरोबरच मलकापुरात नव्याने तयार होत असलेल्या या टोळ्यांभोवती कारवाईचा फास आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. आणि पोलिसांनीही तडीपारीच्या माध्यमातून या टोळ्यांच्या कारवाया रोखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

- चौकट

पोलिसांचा थेट मुळावर घाव

टोळीचा प्रमुख एखाद्या गुन्ह्यात तुरुंगात असेल अथवा त्याच्यावर काही कारवाई झाली असेल, तर त्या टोळीचा उपद्रव कमी होतो. मात्र, टोळी पूर्णपणे निष्क्रिय होत नाही. टोळीप्रमुखाचा हस्तक काहीवेळा ती टोळी चालवितो. त्यामुळे त्या टोळीच्या लहानमोठ्या गुन्हेगारी कारवाया सुरूच राहतात. गुन्हेगारी टोळ्यांची हीच पद्धत ओळखून कऱ्हाडच्या पोलिसांनी थेट मुळावरच घाव घालण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण टोळीच तडीपार करण्याचा पोलिसांकडून प्रयत्न होत आहे.

- चौकट

... अशी होते कारवाई

१) एखादा गुन्हेगार अथवा चारपेक्षा जास्त जणांची टोळी क्रियाशील असेल तर सुरुवातीला प्रतिबंधात्मक कारवाई होते.

२) कारवाईनंतरही गुन्हे सुरूच असतील तर त्यांचे रेकॉर्ड तयार केले जाते. त्याद्वारे तडीपारीचा प्रस्ताव तयार केला जातो.

३) प्रस्ताव एकाविषयी असेल तर तो प्रांताधिकाऱ्यांकडे पाठविला जातो. तर टोळीचा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रमुखांकडे सादर करण्यात येतो.

४) पोलीस प्रमुख टोळीच्या प्रस्तावाबाबत पोलीस उपअधीक्षकांना छाननीचे आदेश देतात. उपअधीक्षक म्हणणे मागवून तो अहवाल पोलीस प्रमुखांकडे पाठवितात.

५) पोलीस अधीक्षक कार्यालयात सुनावणी झाल्यानंतर पोलीस प्रमुखांकडून त्या टोळीच्या तडीपारीबाबतचा आदेश देतात.

६) कधी तालुक्यातून, कधी जिल्ह्यातून, तर कधी एकापेक्षा जास्त जिल्ह्यातून ती टोळी तडीपार केली जाते.

- चौकट

तीन टोळ्यांवर तडीपारीची कारवाई

७ जुलै २०२०

६ आरोपी : टोळी प्रद्युम्न सोळवंडे

गुन्हे - खुनाचा प्रयत्न, मारामारी, बेकायदा शस्त्र

६ जानेवारी २०२१

४ आरोपी : टोळी अभिनंदन झेंडे

गुन्हे - मारामारी, खंडणी, खुनाचा प्रयत्न

५ मार्च २०२१

४ आरोपी : टोळी आशिष पडळकर

गुन्हे - खुनाचा प्रयत्न, मारामारी, गंभीर दुखापत

- कोट

कऱ्हाडातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी तीन टोळ्यांचे प्रस्ताव आम्ही पाठविले होते. त्या टोळ्या तडीपार झाल्या आहेत. सध्या आणखी दोन टोळ्यांचे प्रस्ताव आम्ही तयार केले आहेत. गुन्हेगारी कारवाया आणि त्यानुषंगाने सुरू असलेले गुन्हे रोखण्यावर आमचा भर आहे.

- विजय गोडसे, सहायक निरीक्षक

गुन्हे प्रकटीकरण शाखा, कऱ्हाड

फोटो : ११केआरडी०३, ०४, ०५

कॅप्शन : प्रतीकात्मक