शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

गामिनी काव्याने काशिनाथाचं चांगभलं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:35 IST

वाई : बावधन येथील ऐतिहासिक व पारंपरिक बगाड यात्रा शुक्रवारी 'काशिनाथाचं चांगभलं'च्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. ...

वाई : बावधन येथील ऐतिहासिक व पारंपरिक बगाड यात्रा शुक्रवारी 'काशिनाथाचं चांगभलं'च्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली करीत पोलीस प्रशासनाला गाफील ठेवून हजारो भाविकांच्या उपस्थितीत बावधनचे बगाड काढण्यात आले. बावधन गावात संचारबंदी असताना आदेशाचे उल्लंघन झाल्याने बावधन यात्रा कमिटीवर गुन्हे दाखल केले.

कोरोनाचा प्रशासनाने धसका घेतला असला तरीही भाविकांनी कोरोनाची तमा न बाळगता दहा हजार भाविकांनी बगाड्याचे दर्शन घेत यात्रेला हजेरी लावली.

बावधन गावात पोलीस प्रशासनाने अतिरिक्त पोलीस कुमक मागवली होती. गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले असताना बावधन ग्रामस्थांनी अतिशय गुप्तता ठेवून मुत्सद्देगिरीने भल्या पहाटे कृष्णा नदीत बगाड्याला विधिवत स्नान घालून सकाळी सहा वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत बगाडाला सुरुवात केली. पारंपरिक पद्धतीचा पोषाख घालून बगाडास टांगण्यात आले. यावेळी भाविकांनी नोटांची व नारळाची तोरणे, झेंडे, नवसाचे गोंडे बगाडास बांधले होते. बगाडाबरोबर वाघजाई देवी, भैरवनाथ आणि ज्योतिबाच्या पालख्यांचेही भाविकांनी दर्शन घेतले. सकाळी साडेदहा वाजता बावधनमधील भैरवनाथाच्या मंदिरासमोर पोहोचले. बगाड्याखाली उतरून मंदिरात प्रवेश करताच पोलिसांनी भाविकांना घरी जाण्याचे आवाहन करीत बगाड्यासह यात्रा कमिटीच्या सदस्यांना ताब्यात घेतले. त्यांची वाई पोलीस ठाण्यात रवानगी करीत बावधन गावातील प्रत्येक घरात जाऊन धरपकड करण्यास सुरुवात केली. अनेकांना ताब्यात घेतले असून, सर्वात मोठी कारवाई केली आहे. सोनेश्‍वर येथे बगाडाचा प्रारंभ झाल्यानंतर उभारलेल्या मंडपात बावधन युवा ग्रामस्थ मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.

बावधन यात्रेसाठी कडक बंदोबस्त लावण्यात आलेला असताना ग्रामस्थांनी प्रशासनाला न जुमानता बगाड काढल्याने प्रशासनाची मोठी नामुष्की झालेली आहे. दरम्यान, प्रशासनाशी यावेळी प्रसिद्धी माध्यमांनी संवाद साधला असता बावधन ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलेला शब्द न पाळल्याने प्रशासनाला बघ्याची भूमिका घ्यावी लागली. त्यामुळे पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

कोट..

बावधनच्या बगाड यात्रेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १४४ कलम लागू केले असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात बावधन ग्रामस्थांनी एकत्र येऊन कोरोना संसर्गाला निमंत्रण दिले आहे. प्रशासनाबरोबर अनेक वेळा सल्लामसलत करूनही दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे राज्य शासनाने घालून दिलेल्या कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

- धीरज पाटील, अपर जिल्हा अधीक्षक

कोट..

कोरोनाची दुसरी लाट येत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने यात्रा, उत्सव साजरे करण्यासाठी बंदी घालण्यात आली असताना दिलेल्या आदेशांची पायमल्ली करीत बावधन यात्रेमध्ये हजारो भाविक सामील झाल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढला असून, याला यात्रा कमिटीसह जबाबदार नागरिकांवर कडक कारवाई होणार, ग्रामस्थ व प्रशासनाचा संघर्ष वाढू नये, यासाठी प्रशासनाने बगाड पूर्ण होऊ दिले अन्यथा कृष्णा नदीवरच बगाड्यावर कारवाई करण्यात आली असती.

- संगीता राजापूरकर, प्रांताधिकारी