शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

वीज तोडल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:45 IST

महावितरण कंपनीने थकीत वीजधारकांची वीजजोडणी तोडायला सुरुवात केली आहे. कोणतीही लेखी नोटीस न देता आणि कसलीही पूर्वकल्पना न देता ...

महावितरण कंपनीने थकीत वीजधारकांची वीजजोडणी तोडायला सुरुवात केली आहे. कोणतीही लेखी नोटीस न देता आणि कसलीही पूर्वकल्पना न देता वितरणचे कर्मचारी वीजजोडणी तोडत आहेत. काही रक्कम भरण्याचा तगादा लावत आहेत. मात्र इच्छा असूनही कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे सामान्य ग्राहक हतबल झाले आहेत. ते विनवणी करीत आहेत. मात्र, वीज कर्मचारी त्यांचे म्हणणे ऐकून न घेता आपले काम चोख बजावत आहेत. त्यामुळे ग्रामीण ग्रामीण जनता आणि विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दहावी व बारावीची परीक्षा लवकरच होण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीने अनेक दिवस शाळा बंद होत्या. खासगी शिकवणीही यंदा विद्यार्थ्यांना मिळाली नाही. ऑनलाईन शिकवणुकीतून जे काही ज्ञान पदरात पडले त्यावरच त्यांना तयारी करावी लागणार आहे. तसेच पाचवी ते आठवीचे वर्ग आता सुरू झाले आहेत. मात्र इतर वर्गांना अजूनही ऑनलाईन शिकवणी सुरू आहे. वीजच नसल्याने मोबाईल चार्ज करणे तसेच तासाला हजेरी लावणे विद्यार्थ्यांना अवघड बनले आहे. अंधारामुळे संपूर्ण वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र ही परिस्थिती सरकार लक्षात घेत नाही आणि नियमांवर बोट ठेवून काम करीत आहे.

कोरोना महामारीमुळे सर्व जग संकटात आले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहे; तर अनेकजण रावाचे रंक झाले आहेत. शेतकरीही या काळात आर्थिक समस्यांचा सामना करीत होता. ग्रामीण जीवन शेतीवर अवलंबून आहे. शेतमालाला दर नसल्याने त्याची परिस्थिती खराब झाली आहे. त्यामुळे वीज बिल भरणे अशक्य बनले आहे. उसाला तोड लागली तरी त्याच्या बिलातून मागील कर्ज वसूल होऊन उरलेले पैसे त्याच्या हातात येणार आहेत. त्याला अजून वेळ लागणार आहे. मात्र आताच वीजतोडणी केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाणार आहे.

- चौकट

मोहीम न थांबल्यास आंदोलन करणार

शेतकरी सध्या आर्थिक संकटात आहे. हाती पैसे नसल्याने वीज बिल भरणे त्याला शक्य होत नाही. या काळात त्याला आधार देण्याची गरज आहे. परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थी हित लक्षात घेऊन ही वीजतोडणी मोहीम काहीकाळ पुढे ढकलावी. सुगी झाल्यावर सवलत देऊन काही करता येतेय का, हे पाहावे. मात्र मोहीम सुरू राहिल्यास याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन उभारले जाणार आहे.

- रामकृष्ण वेताळ, सदस्य

किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश

- चौकट

काही दिवस सवलत मिळावी

सध्या उन्हाळा व परीक्षेचा काळ सुरू होत आहे. मनात असूनही हाती पैसा नसल्याने थकीत वीज बिल भरणे सध्या शक्य नाही. म्हणून ही मोहीम पुढे ढकलावी. सुगी झाल्यावर चार पैसे हाती येतील तेव्हा संधी देऊन पुन्हा मोहीम सुरू करण्याचा विचार सुरू करावा. विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय करू नये.

- शंकरराव पाटील

पालक, सुर्ली