शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

गावाच्या मध्यावरच होतात अंत्यसंस्कार

By admin | Updated: October 21, 2014 23:46 IST

बोर्गेवाडी, भैरेवाडीची स्थिती : शाळेनजीकच अंत्यविधी होत असल्याने मुलांमध्ये भीती

चाफळ : डेरवण-चाफळ, ता. पाटण ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या बोर्गेवाडी व भैरेवाडी या गावांना स्मशानभूमी शेड नाहीत. डेरवणला स्मशानभूमी शेड आहे; पण तेथे जाण्यासाठी रस्ता नाही. बोर्गेवाडी गावाच्या मध्याहून वाहणाऱ्या ओढ्याच्या काठावरच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून शंभर मीटर अंतरावर ग्रामस्थांना मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. भैरेवाडीचीही तशीच काहीशी अवस्था आहे. वारंवार मागणी करूनही संबंधित विभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहे. पाटण तालुक्यातील डेरवण ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या बोर्गेवाडी गावची लोकसंख्या ६०० च्या आसपास आहे. तर भैरेवाडी गावची लोकसंख्या ४०० च्या आसपास आहे. या दोन्ही गावातील बहुतांश तरुण नोकरीच्या निमीत्ताने परगावी वास्तव्यास आहेत. त्यांचे चार-सहा महिन्यांतून गावी कधीतरी येणे-जाणे असते. या दोन्ही गावांना स्मशानभूमी शेड नाहीत. दोन्ही गावांना राजकीय वारसा लाभलेला आहे. तरीही येथील राजकीय मंडळींना स्मशानभूमी शेडचा प्रश्न सोडविता आलेला नाही. बोर्गेवाडी गावात प्रवेश करताच प्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लागते. शाळेपासून अगदी हाकेच्या अंतरावरच स्मशानभूमी आहे. येथे उघड्यावरच अंत्यसंस्कार केले जात असल्याने त्याचा त्रास शाळेतील विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. अनेकदा मुले शाळेत जाण्यास घाबरत आहेत. स्मशानभूमीच्या आजूबाजूला घरे आहेत. तेथील ग्रामस्थांनाही याचा त्रास होत आहे. बोर्गेवाडी, भैरेवाडी गावांना स्मशानभूमी आहे. परंतु येथे शेड नाही. विघूत खांब आहे; पण त्यावर दिवे नाहीत. अंत्यविधी करण्यास पै पाहुणे येथे येतात. मात्र त्यांना उभे राहण्यास स्वतंत्र शेड नाही. परिणामी पावसाळ्यांत ग्रामस्थांना रात्रभर जागून अंत्यसंस्कार करावे लागतात. अनेकदा रॉकेल बत्ती अथवा कंदीलाचा आधार घेऊन रात्रभर येथे थांबावे लागते. वास्तविक, ही दोन्ही गावे महसूली असल्याने ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिलेले सौरऊर्जेचे दिवे तरी येथे देणे आवश्यक होते, मात्र तसे झालेले नाही.परिणामी याचा सर्वाधिक फटका दोन्ही गावच्या ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)गावाला स्मशानभूमी शेड नाही. त्यामुळे उघड्यावरच ओढ्याच्या काठावर अंत्यसंस्कार करावे लागतात. शालेय मुलांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. याठिकाणी शेड नसल्याने पावसाळ्यात रात्रीच्या वेळी बॅटरी अथवा कंदील,रॉकेल बत्तीचा आधार घ्यावा लागतो. ग्रामपंचायतीचेही याकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे. - नामदेव मोरे (बोर्गेवाडी)