शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

चिमणराव कदम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

By admin | Updated: December 14, 2014 23:46 IST

अंत्यदर्शनासाठी गर्दी : फलटण तालुक्यासह जिल्ह्यातून कार्यकर्त्यांची उपस्थिती

फलटण : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, फलटण-खंडाळ्याचे माजी आमदार सूर्याजीराव शंकरराव कदम तथा चिमणराव कदम यांचे मुंबईत निधन झाल्यानंतर रविवारी सकाळी अकरा वाजता त्यांचे पार्थिव येथे आणण्यात आले. त्यावेळी फलटण शहर व तालुक्यातील आबालवृद्धांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. दरम्यान, सायंकाळी पाचच्या सुमारास गिरवी या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. आजारी असल्याने वैद्यकीय उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कॅण्डी हॉस्पिटल येथे त्यांना दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता त्यांचे निधन झाले. पार्थिव रविवारी सकाळी येथे पोहोचल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी काही वेळ ठेवण्यात आले. निवासस्थानासमोर खास उभारण्यात आलेल्या शामियान्यात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यावेळी माजी आमदार डॉ. कृष्णचंद्र भोईटे, माजी मंत्री, आ. डॉ. पतंगराव कदम, विलासराव पाटील-उंडाळकर, जयसिंगराव पाटील-उंडाळकर, शंकरराव गाढवे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत, सुभाषराव शिंदे, रघुनाथराजे नाईक-निंंबाळकर, अध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी-बेडके, माजी आमदार मदन भोसले, राजनशेठ चिपळूणकर, प्रल्हादराव साळुंखे-पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, सभापती अमित कदम, कृषी सभापती शिवाजीराव शिंदे, नितीन भरगुडे-पाटील, जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके-पाटील, धैर्यशील ऊर्फ दत्ता अनपट, सुनीता गायकवाड, बाळासाहेब कासार, अशोकशेठ सस्ते, पंचायत समिती सभापती स्मिता सांगळे, उपसभापती पुष्पा सस्ते, यांच्यांसह संस्थांचे पदाधिकारी, राजकीय कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी अंत्यदर्शन घेतले.दरम्यान, दुपारी कदम यांचे पार्थिव गिरवी या त्यांच्या गावी नेण्यात आले. त्यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार जयकुमार गोरे, आमदार आनंदराव पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी अंत्यदर्शन घेतले. सायंकाळी चारच्या सुमारास अंत्ययात्रेला सुरुवात झाली. सायंकाळी पाचच्या सुमारास कृषी महाविद्यालयाच्या आवारात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी) कुटुंबीयांचे सांत्वन...अंत्यदर्शन घेण्याबरोबरच प्रत्येकाने चिमणराव कदम यांच्या पत्नी शारदादेवी कदम आणि कदम कुटुंबीयांचे सांत्वन केले. पत्नी व कदम कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांच्या भावनाही त्यांना अनावर होत होत्या. त्यामुळे त्यांची अवस्थाही आभाळ कोसळल्यासारखी झाली होती.