शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळांसाठी निधीची तरतूद करावी : दशरथ फुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:13 IST

फलटण : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत राज्यातील दलित, ओबीसी, मागासवर्गीय, भटक्या विमुक्त तसेच अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याच्या उद्देशाने ...

फलटण : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत राज्यातील दलित, ओबीसी, मागासवर्गीय, भटक्या विमुक्त तसेच अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या विविध महामंडळाचे कामकाज निधीअभावी पूर्णत: मंदावले असून, राज्य शासनाने चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात १००० कोटींची तरतूद या महामंडळासाठी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

राज्य शासनाने इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक भटक्या जाती व जमाती विकास महामंडळ, अल्पसंंख्याक विकास महामंडळ, अपंग विकास महामंडळ तसेच अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ, अहिल्याबाई होळकर शेळी, मेंढी विकास महामंडळ ही महामंडळे स्थापन केली असून, या महामंडळाकडे पुरेसा निधी नसल्याने त्यांचे कामकाज पूर्णत: मंदावले आहे,

देशात गेल्यावर्षभरात कोरोचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शासनास लॉकडाऊन घोषित करावे लागले, याचा परिणाम सर्व क्षेत्रांतील व्यवहारावर झाला आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. लॉकडाऊन अनेकांचे उद्योगधंदे छोटे-मोठे व्यवसाय अडचणीत आले आहेत. अशांना आज भांडवलाची गरज आहे. त्यासाठी शासनाने या महामंडळामार्फत मागासवर्गीय घटकातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी दशरथ फुले यांनी केली आहे. यापूर्वी महामंंडळाची कर्जमाफी झाली होती. त्यावेळपासून या महामंडळांना पुरेसा निधी उपलब्ध करून दिला नाही. तेव्हापासून ही महामंडळे अडचणी आली आहेत.

केंद्र व राज्य शासन मागासवर्गीय समाजाच्या सार्वजनिक कल्याणासाठी निधी दरवर्षी उपलब्ध करून देते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या महामंडळांनी पाहिजे त्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला गेला नाही. मग मागासवर्गींसाठी तरतूद केलेला निधी जातो कोठे.

चौकट...

आर्थिक चालना देण्याची गरज...

राज्यभरात दलित, ओबीसी, भटक्या विमुक्त, मागासवर्गीय समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, हा समाज आर्थिक व सामाजिकदृष्ट्या अत्यंत मागे आहे. त्यामुळे या समाजाला या महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक चालना देण्याची गरज आहे. तसेच ही महामंडळे या महामंडळाकडील बहुसंख्य कर्ज प्रकरणे विविध बँकेकडे पाठवली जातात; परंतु बँका महामंडळाकडून आलेली प्रकरणे करत नाहीत. त्यामुळे सर्व प्रकरणे थेट महामंडळानेच करावी, अशी मागणी फुले यांनी केली आहे.

या महामंडळावर गेल्या अनेक वर्षांपासून अध्यक्ष तसेच संचालक मंडळाच्या नेमणुका केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे या महांमडळावर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही तरी अध्यक्षासह संचालक मंडळाची नेमणूक शासनाने करावी व महामंडळाच्या विकासास चालना द्यावी, अशी मागणी दशरथ फुले यांनी केली आहे.