शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

महामंडळांसाठी निधीची तरतूद करावी : दशरथ फुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:13 IST

फलटण : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत राज्यातील दलित, ओबीसी, मागासवर्गीय, भटक्या विमुक्त तसेच अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याच्या उद्देशाने ...

फलटण : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत राज्यातील दलित, ओबीसी, मागासवर्गीय, भटक्या विमुक्त तसेच अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या विविध महामंडळाचे कामकाज निधीअभावी पूर्णत: मंदावले असून, राज्य शासनाने चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात १००० कोटींची तरतूद या महामंडळासाठी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

राज्य शासनाने इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक भटक्या जाती व जमाती विकास महामंडळ, अल्पसंंख्याक विकास महामंडळ, अपंग विकास महामंडळ तसेच अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ, अहिल्याबाई होळकर शेळी, मेंढी विकास महामंडळ ही महामंडळे स्थापन केली असून, या महामंडळाकडे पुरेसा निधी नसल्याने त्यांचे कामकाज पूर्णत: मंदावले आहे,

देशात गेल्यावर्षभरात कोरोचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शासनास लॉकडाऊन घोषित करावे लागले, याचा परिणाम सर्व क्षेत्रांतील व्यवहारावर झाला आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. लॉकडाऊन अनेकांचे उद्योगधंदे छोटे-मोठे व्यवसाय अडचणीत आले आहेत. अशांना आज भांडवलाची गरज आहे. त्यासाठी शासनाने या महामंडळामार्फत मागासवर्गीय घटकातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी दशरथ फुले यांनी केली आहे. यापूर्वी महामंंडळाची कर्जमाफी झाली होती. त्यावेळपासून या महामंडळांना पुरेसा निधी उपलब्ध करून दिला नाही. तेव्हापासून ही महामंडळे अडचणी आली आहेत.

केंद्र व राज्य शासन मागासवर्गीय समाजाच्या सार्वजनिक कल्याणासाठी निधी दरवर्षी उपलब्ध करून देते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या महामंडळांनी पाहिजे त्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला गेला नाही. मग मागासवर्गींसाठी तरतूद केलेला निधी जातो कोठे.

चौकट...

आर्थिक चालना देण्याची गरज...

राज्यभरात दलित, ओबीसी, भटक्या विमुक्त, मागासवर्गीय समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, हा समाज आर्थिक व सामाजिकदृष्ट्या अत्यंत मागे आहे. त्यामुळे या समाजाला या महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक चालना देण्याची गरज आहे. तसेच ही महामंडळे या महामंडळाकडील बहुसंख्य कर्ज प्रकरणे विविध बँकेकडे पाठवली जातात; परंतु बँका महामंडळाकडून आलेली प्रकरणे करत नाहीत. त्यामुळे सर्व प्रकरणे थेट महामंडळानेच करावी, अशी मागणी फुले यांनी केली आहे.

या महामंडळावर गेल्या अनेक वर्षांपासून अध्यक्ष तसेच संचालक मंडळाच्या नेमणुका केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे या महांमडळावर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही तरी अध्यक्षासह संचालक मंडळाची नेमणूक शासनाने करावी व महामंडळाच्या विकासास चालना द्यावी, अशी मागणी दशरथ फुले यांनी केली आहे.