शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

महामंडळांसाठी निधीची तरतूद करावी : दशरथ फुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:13 IST

फलटण : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत राज्यातील दलित, ओबीसी, मागासवर्गीय, भटक्या विमुक्त तसेच अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याच्या उद्देशाने ...

फलटण : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत राज्यातील दलित, ओबीसी, मागासवर्गीय, भटक्या विमुक्त तसेच अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या विविध महामंडळाचे कामकाज निधीअभावी पूर्णत: मंदावले असून, राज्य शासनाने चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात १००० कोटींची तरतूद या महामंडळासाठी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

राज्य शासनाने इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक भटक्या जाती व जमाती विकास महामंडळ, अल्पसंंख्याक विकास महामंडळ, अपंग विकास महामंडळ तसेच अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ, अहिल्याबाई होळकर शेळी, मेंढी विकास महामंडळ ही महामंडळे स्थापन केली असून, या महामंडळाकडे पुरेसा निधी नसल्याने त्यांचे कामकाज पूर्णत: मंदावले आहे,

देशात गेल्यावर्षभरात कोरोचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शासनास लॉकडाऊन घोषित करावे लागले, याचा परिणाम सर्व क्षेत्रांतील व्यवहारावर झाला आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. लॉकडाऊन अनेकांचे उद्योगधंदे छोटे-मोठे व्यवसाय अडचणीत आले आहेत. अशांना आज भांडवलाची गरज आहे. त्यासाठी शासनाने या महामंडळामार्फत मागासवर्गीय घटकातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी दशरथ फुले यांनी केली आहे. यापूर्वी महामंंडळाची कर्जमाफी झाली होती. त्यावेळपासून या महामंडळांना पुरेसा निधी उपलब्ध करून दिला नाही. तेव्हापासून ही महामंडळे अडचणी आली आहेत.

केंद्र व राज्य शासन मागासवर्गीय समाजाच्या सार्वजनिक कल्याणासाठी निधी दरवर्षी उपलब्ध करून देते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या महामंडळांनी पाहिजे त्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला गेला नाही. मग मागासवर्गींसाठी तरतूद केलेला निधी जातो कोठे.

चौकट...

आर्थिक चालना देण्याची गरज...

राज्यभरात दलित, ओबीसी, भटक्या विमुक्त, मागासवर्गीय समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, हा समाज आर्थिक व सामाजिकदृष्ट्या अत्यंत मागे आहे. त्यामुळे या समाजाला या महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक चालना देण्याची गरज आहे. तसेच ही महामंडळे या महामंडळाकडील बहुसंख्य कर्ज प्रकरणे विविध बँकेकडे पाठवली जातात; परंतु बँका महामंडळाकडून आलेली प्रकरणे करत नाहीत. त्यामुळे सर्व प्रकरणे थेट महामंडळानेच करावी, अशी मागणी फुले यांनी केली आहे.

या महामंडळावर गेल्या अनेक वर्षांपासून अध्यक्ष तसेच संचालक मंडळाच्या नेमणुका केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे या महांमडळावर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही तरी अध्यक्षासह संचालक मंडळाची नेमणूक शासनाने करावी व महामंडळाच्या विकासास चालना द्यावी, अशी मागणी दशरथ फुले यांनी केली आहे.