शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
4
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
5
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
6
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
8
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
9
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
11
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
12
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
13
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
15
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
16
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
17
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
18
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
20
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान

गॅससह इंधन दरवाढीचा मिठाई व्यावसायिकांना झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:49 IST

सातारा : विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागतापूर्वीच बाजारपेठेवर दरवाढीचे विघ्न आल्याने मिठाईच्या दरात वाढ झाली आहे. सार्वजनिक उत्सवावर आलेल्या मर्यादेने नवस ...

सातारा : विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागतापूर्वीच बाजारपेठेवर दरवाढीचे विघ्न आल्याने मिठाईच्या दरात वाढ झाली आहे. सार्वजनिक उत्सवावर आलेल्या मर्यादेने नवस फेडणाऱ्यांची संख्याही कमी झाल्याने मिठाई व्यावसायिक ग्राहक टिकविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

सणासुदीच्या दिवसांत मिठाईची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागणी वाढली की, दरही वाढतात, असा पायंडा असला, तरी यावर्षी गणेशोत्सवात मिठाईचे दर स्थिरच आहेत. तथापि, मिठाईसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर वाढल्याने आगामी काही दिवसांत मिठाईचे दर वाढण्याची शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. कच्च्या मालाचे दर वाढल्यास मिठाईचा दर वाढतो. मात्र, यावेळी कच्च्या मालाचे दरच उत्सव कालावधीत जैसे थे राहिले आहेत, तसेच भट्टीसाठी लागणाऱ्या इंधनाच्या किमतीत वाढ झाली असली तरी मिठाईचेही दर स्थिर ठेवण्यात आले आहेत.

चौकट :

का वाढले दर?

पेट्रोल, डिझेलच्या दरांत झालेली वाढ, कामगारांचे वाढलेले पगार यांचा विचार करता किरकोळ दरवाढ झाली आहे. सध्या ग्राहक टिकवणं हा उद्देश आहे. त्यामुळं कोणीही अनावश्यक धाडस करून स्वत:ला अडचणीत आणणार नाही, हे नक्की.

-प्रशांत मोदी, स्वीट मार्ट चालक

मागील काही दिवसांत दुधाचे भाव चांगलेच वाढले आहेत. मिठाई बनवताना सर्वांत जास्त दूध आणि साखरेचा वापर होतो. दूध आणि साखर यांच्यासह गॅस सिलिंडरचाही दर वाढल्याने उत्पादनाचा खर्च वाढला आहे. परिणामी, किलोमागे मिठाईचे दरही वाढले आहेत.

-आनंद काळे, स्वीट मार्ट चालक

भेसळीकडे असू द्या लक्ष

धार्मिक उत्सवात लोकांचा मिठाई खरेदीकडे जास्त कल असतो. काही विक्रेते भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री करतात. सणासुदीच्या काळात मागणी वाढली की, अधिक पुरवठा करता यावा, तसेच त्यात अधिक नफा मिळावा, यासाठी मिठाईत भेसळ करण्याचा प्रयत्न होतो. खाद्यपदार्थ आकर्षक दिसण्यासाठी वापरण्यात येणारा रंग, मिठाईचे आयुष्य वाढविण्यासाठी पदार्थात टाकलेले हानिकारक घटक यामुळेही भेसळ होते.

ग्राहक म्हणतात...

मिठाईची चव आणि दर्जा बघून पैसे द्यायला हरकत नाही. यंदा मिठाई घेण्यासाठी दुकानांवर ग्राहकांची झुंबड आहे. त्याचा गैरफायदा घेऊन दर वाढविणे चुकीचे आहे. हा ग्राहकांच्या हक्कांवर घातलेला घाला आहे.

-नेहा शिवदे, सातारा

गणेशोत्सव असो की, अन्य कोणताही उत्सव या काळात घराघरांत मिठाई लागतेच. सध्या दैनंदिन विविध वस्तूंचे दर सातत्याने वाढत आहेत. मात्र, सण असल्याने दर वाढले तरी आर्थिक भुर्दंड सोसून खरेदी करावीच लागते.

-सुधीर सायगावे, सातारा

दरांवर नियंत्रण कोणाचे?

मिठाईच्या दर्जावर अन्न व औषध प्रशासन नियंत्रण ठेवते; पण दरावर मात्र कोणाचेच नियंत्रण नाही. नाही म्हणायला बेकरी व स्वीट मार्ट असोसिएशनने मात्र स्वत:हून नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पेढे, बर्फी यांचे दर प्रत्येक दुकानात वेगवेगळ्या पद्धतीने लावले जात आहेत. हे दर आकारताना आपण त्यात दर्जेदार, शुद्ध तुपाचा वापर केल्याचे सांगतात. प्रत्यक्षात यात काहीच नसते; पण मोठ्या दुकानांच्या दरानेच छोटे विक्रेते आपला माल विकतात.

...................