शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

नेत्यांसमोरच ‘नाना-भाऊं’ची फटकेबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 23:56 IST

नेत्यांसमोरच ‘नाना-भाऊं’ची फटकेबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : काँगे्रस कमिटीमध्ये बुधवारी भलतीच तापा-तापी झाली. ‘तुम्हाला गावात किती मते पडतात ते तपासा,’ अशी बोचरी टीका आमदार जयकुमार गोरे यांनी केल्यानंतर आमदार आनंदराव पाटील यांनीही ‘विरोध करताना लाज काढू नका,’ असे म्हणत पलटवार केला. झारखंडहून आलेल्या पक्षनिरीक्षकांच्या समोरच या दोन आमदारांमधील वाक्युध्द पाहून सारेच अवाक झाले. जिल्हाध्यक्ष निवडीच्या अनुषंगाने पूर्व तयारीसाठी काँगे्रसचे झारखंड राज्यातून आलेले पक्षनिरीक्षक शकील अहमद, कोल्हापूरचे तौफिक मुलाणी यांनी बुधवारी काँगे्रस कमिटीमध्ये बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे, जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, कार्याध्यक्ष अ‍ॅड. विजयराव कणसे, धैर्यशील कदम, मोहनराव भोसले, किरण बर्गे, किशोर बाचल, रजनी पवार, जयकुमार शिंदे, युवकचे जिल्हाध्यक्ष राहुल घाडगे, नंदाभाऊ जाधव, बाबासाहेब कदम, अशोकराव जाधव, दयानंद भोसले, सर्जेराव जांभळे, सतीश भोसले, रोहिणी निंबाळकर, उपाध्यक्ष बाळासाहेब बागवान यांची उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष निवडीवरून जिल्हा काँगे्रसमध्ये अनेक दिवसांपासून सुंदोपसुंदी सुरू आहे. आमदार जयकुमार गोरे, धैर्यशील कदम, किरण बर्गे, रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली होती. त्याआधी माजी वनमंत्री पतंगराव कदम यांनी पाचवड येथील कार्यक्रमामध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे काँगे्रसचे नेतृत्व दिले गेले पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली होती. नुकतीच किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मदन भोसले यांनी पक्षाचे नेतृत्व करावे, अशी इच्छा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाड येथे आपल्या निवासस्थानी व्यक्त केली होती. आमदार आनंदराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर कडाडून टीका केली होती. या पार्श्वभूमीवर साताऱ्यात येणाऱ्या पक्षनिरीक्षकांच्या दौऱ्याकडे काँगे्रसजणांचे लक्ष लागून राहिले होते. काँगे्रस कमिटीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये आमदार आनंदराव पाटील व आमदार जयकुमार गोरे यांनी आमचे नेते पृथ्वीराज चव्हाण असल्याने ते जो निर्णय घेतील, तो मान्य असेल, असे पक्षनिरीक्षकांसमोर सांगून टाकले. यावेळी पक्षनिरीक्षक शकील अहमद यांनी जिल्हाध्यक्ष व जिल्ह्यातील ८ ब्लॉकमधून प्रतिनिधी निवडण्यात येणार आहेत. सर्वप्रथम ब्लॉकचे प्रतिनिधी निवडले जातील. त्यानंतर हेच निवडून आलेले लोक जिल्हाध्यक्षपदासाठी मतदान करतील, तसेच तालुकाध्यक्षांची मतेही जाणून घेतील असे सांगितले. दरम्यान, कर्जमाफीत एका गावात केवळ चार शेतकऱ्यांनाच लाभ होऊ शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांची सरसकट दीड लाखाची कर्जमाफी करण्याची मागणी काँगे्रसने निवेदनाद्वारे केली. बाबा म्हणतील तसं!काँगे्रसच्या जिल्हाध्यक्ष निवडीवरून शाब्दिक लढाईला थोडी बगल देत आमदार जयकुमार गोरे व आमदार आनंदराव पाटील बुधवारी पक्षनिरीक्षकांनी आयोजित केलेल्या बैठकीच्या निमित्ताने जिल्हा काँगे्रस कमिटीत एकत्र आले. जिल्हाध्यक्ष निवडण्याच्या अनुषंगाने पृथ्वीराजबाबा जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य आहे, असे दोघांनीही यावेळी स्पष्ट केले.