शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

नेत्यांसमोरच ‘नाना-भाऊं’ची फटकेबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 23:56 IST

नेत्यांसमोरच ‘नाना-भाऊं’ची फटकेबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : काँगे्रस कमिटीमध्ये बुधवारी भलतीच तापा-तापी झाली. ‘तुम्हाला गावात किती मते पडतात ते तपासा,’ अशी बोचरी टीका आमदार जयकुमार गोरे यांनी केल्यानंतर आमदार आनंदराव पाटील यांनीही ‘विरोध करताना लाज काढू नका,’ असे म्हणत पलटवार केला. झारखंडहून आलेल्या पक्षनिरीक्षकांच्या समोरच या दोन आमदारांमधील वाक्युध्द पाहून सारेच अवाक झाले. जिल्हाध्यक्ष निवडीच्या अनुषंगाने पूर्व तयारीसाठी काँगे्रसचे झारखंड राज्यातून आलेले पक्षनिरीक्षक शकील अहमद, कोल्हापूरचे तौफिक मुलाणी यांनी बुधवारी काँगे्रस कमिटीमध्ये बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे, जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, कार्याध्यक्ष अ‍ॅड. विजयराव कणसे, धैर्यशील कदम, मोहनराव भोसले, किरण बर्गे, किशोर बाचल, रजनी पवार, जयकुमार शिंदे, युवकचे जिल्हाध्यक्ष राहुल घाडगे, नंदाभाऊ जाधव, बाबासाहेब कदम, अशोकराव जाधव, दयानंद भोसले, सर्जेराव जांभळे, सतीश भोसले, रोहिणी निंबाळकर, उपाध्यक्ष बाळासाहेब बागवान यांची उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष निवडीवरून जिल्हा काँगे्रसमध्ये अनेक दिवसांपासून सुंदोपसुंदी सुरू आहे. आमदार जयकुमार गोरे, धैर्यशील कदम, किरण बर्गे, रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली होती. त्याआधी माजी वनमंत्री पतंगराव कदम यांनी पाचवड येथील कार्यक्रमामध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे काँगे्रसचे नेतृत्व दिले गेले पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली होती. नुकतीच किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मदन भोसले यांनी पक्षाचे नेतृत्व करावे, अशी इच्छा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाड येथे आपल्या निवासस्थानी व्यक्त केली होती. आमदार आनंदराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर कडाडून टीका केली होती. या पार्श्वभूमीवर साताऱ्यात येणाऱ्या पक्षनिरीक्षकांच्या दौऱ्याकडे काँगे्रसजणांचे लक्ष लागून राहिले होते. काँगे्रस कमिटीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये आमदार आनंदराव पाटील व आमदार जयकुमार गोरे यांनी आमचे नेते पृथ्वीराज चव्हाण असल्याने ते जो निर्णय घेतील, तो मान्य असेल, असे पक्षनिरीक्षकांसमोर सांगून टाकले. यावेळी पक्षनिरीक्षक शकील अहमद यांनी जिल्हाध्यक्ष व जिल्ह्यातील ८ ब्लॉकमधून प्रतिनिधी निवडण्यात येणार आहेत. सर्वप्रथम ब्लॉकचे प्रतिनिधी निवडले जातील. त्यानंतर हेच निवडून आलेले लोक जिल्हाध्यक्षपदासाठी मतदान करतील, तसेच तालुकाध्यक्षांची मतेही जाणून घेतील असे सांगितले. दरम्यान, कर्जमाफीत एका गावात केवळ चार शेतकऱ्यांनाच लाभ होऊ शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांची सरसकट दीड लाखाची कर्जमाफी करण्याची मागणी काँगे्रसने निवेदनाद्वारे केली. बाबा म्हणतील तसं!काँगे्रसच्या जिल्हाध्यक्ष निवडीवरून शाब्दिक लढाईला थोडी बगल देत आमदार जयकुमार गोरे व आमदार आनंदराव पाटील बुधवारी पक्षनिरीक्षकांनी आयोजित केलेल्या बैठकीच्या निमित्ताने जिल्हा काँगे्रस कमिटीत एकत्र आले. जिल्हाध्यक्ष निवडण्याच्या अनुषंगाने पृथ्वीराजबाबा जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य आहे, असे दोघांनीही यावेळी स्पष्ट केले.