शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

अख्ख्या लाॅकडाऊनमध्ये खाल्ली ताजी-ताजी भाजी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:45 IST

माणसाला कोरोनानं खूप काही शिकवलं. काम, पैशाच्या मागे लागल्याने माणूस आपली माणसं, त्यांची सुख-दु:ख विसरला होता. पोरांच्याही आठ-आठ दिवस ...

माणसाला कोरोनानं खूप काही शिकवलं. काम, पैशाच्या मागे लागल्याने माणूस आपली माणसं, त्यांची सुख-दु:ख विसरला होता. पोरांच्याही आठ-आठ दिवस भेटीगाठी होत नव्हत्या. पण याचं कोणालाच विशेष वाटत नव्हतं. कामाच्या व्यापात माणूस आवडी, छंदही हरवून बसला होता. याच माणसाला जमिनीवर आणण्याचे काम कोरोनाने केले.

कोरोनाचा शिरकाव भारतात मार्च २०२० मध्ये झाला. सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाविषयी प्रशासन, आरोग्य विभागालाही फारशी माहिती नव्हती. त्यामुळे कडकडीत संचारबंदी लागू केली होती. शहरातील प्रमुख रस्ते बॅरिकेट, कळक (बांबू) लावून बंद केले होते; तर काही गावांमध्ये येणाऱ्या रस्त्यावर चर खोदून, काटे टाकून कोणी येणार नाही, याची खबरदारी घेतली जात होती. शहरात कोणी रस्त्यावर फिरताना दिसला, तर पोलीस बदडून काढत होते. त्यामुळेच माणसांना घरातच थांबावे लागत होते. नागरिकांची होणारी अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने पुढे दारापर्यंत फळे, भाजी विक्रेते येतील याचे नियोजन केले.

काहीवेळेस आठ-आठ दिवस बाहेर पडता येत नव्हते. तेव्हा कडधान्यापासून भाजी करून गृहिणींनी वेळ निभावून नेली. पण मूळचे शेतकरी असलेले, गावाकडे बालपण गेलेल्यांनी रिकाम्या वेळेत अंगणात, टेरेसवर, तर काहींनी बाल्कनीत भाज्या पिकविण्याचा निर्णय घेतला. यासाठी ओळखीच्या लोकांकडून रात्रीच्यावेळी रोपं, बियाणं, तर काही वेळेस खतं आणून जागा उपलब्ध असेल अशा ठिकाणी पिकवली. या काळात कंपन्या, शासकीय, निमशासकीय कार्यालये बंदच होती. त्यामुळे कामही फारसे नसल्याने अनेकांकडे वेळच वेळ होता. या वेळेत त्यांनी पाणी वेळेवर देणे, गवत काढणे असली कामे केली. त्यामुळे या भाज्याही चांगल्या उगवल्या. काही महिन्यात त्याची भाजी करता येईल एवढी वाढ झाली.

यातून स्वनिर्मितीचा आनंद घेता आला. ग्रामीण भागात किंवा शहरातही ज्यांच्या दारात जागा मोठी आहे, त्यांनी झाडवर्गातील शेंगभाजीची लागवड केली. यामध्ये शेवगा लावला. ज्यांनी अगोदरच हे झाड लावलेले होतं, ते या काळात एकमेकांना मदतीला धावून आले. शेजारधर्म निभावत ते आठ दिवसाला वेगवेगळ्या शेजाऱ्यांना एक-दोन भाज्या होतील एवढ्या शेंगा देत होते.

शहरातील माणसांनी मात्र या काळात कल्पकतेला दाद देत शेतीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शहरात वन बीएचके, टू-बीएचके जागेत राहणाऱ्या सिमेंटच्या जंगलातील माणसांकडे कोठून आले अंगण. त्यांनी टेरेसवर, तर काहींनी बाल्कनीत भाज्या पिकवल्या. लाॅकडाऊन काळातही सुरुवातीस सायंकाळच्या वेळेस असंख्य सातारकर फिरायला महादरे, कुरणेश्वर परिसरात जात होते. जाताना रिकाम्या पिशव्या किंवा पोते घेऊन जात होते. येताना शेतातील काळी माती आणत होते.