शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
8
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
9
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
10
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
11
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
12
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
13
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
14
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
15
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
16
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
18
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
19
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
20
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
Daily Top 2Weekly Top 5

अख्ख्या लाॅकडाऊनमध्ये खाल्ली ताजी-ताजी भाजी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:45 IST

माणसाला कोरोनानं खूप काही शिकवलं. काम, पैशाच्या मागे लागल्याने माणूस आपली माणसं, त्यांची सुख-दु:ख विसरला होता. पोरांच्याही आठ-आठ दिवस ...

माणसाला कोरोनानं खूप काही शिकवलं. काम, पैशाच्या मागे लागल्याने माणूस आपली माणसं, त्यांची सुख-दु:ख विसरला होता. पोरांच्याही आठ-आठ दिवस भेटीगाठी होत नव्हत्या. पण याचं कोणालाच विशेष वाटत नव्हतं. कामाच्या व्यापात माणूस आवडी, छंदही हरवून बसला होता. याच माणसाला जमिनीवर आणण्याचे काम कोरोनाने केले.

कोरोनाचा शिरकाव भारतात मार्च २०२० मध्ये झाला. सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाविषयी प्रशासन, आरोग्य विभागालाही फारशी माहिती नव्हती. त्यामुळे कडकडीत संचारबंदी लागू केली होती. शहरातील प्रमुख रस्ते बॅरिकेट, कळक (बांबू) लावून बंद केले होते; तर काही गावांमध्ये येणाऱ्या रस्त्यावर चर खोदून, काटे टाकून कोणी येणार नाही, याची खबरदारी घेतली जात होती. शहरात कोणी रस्त्यावर फिरताना दिसला, तर पोलीस बदडून काढत होते. त्यामुळेच माणसांना घरातच थांबावे लागत होते. नागरिकांची होणारी अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने पुढे दारापर्यंत फळे, भाजी विक्रेते येतील याचे नियोजन केले.

काहीवेळेस आठ-आठ दिवस बाहेर पडता येत नव्हते. तेव्हा कडधान्यापासून भाजी करून गृहिणींनी वेळ निभावून नेली. पण मूळचे शेतकरी असलेले, गावाकडे बालपण गेलेल्यांनी रिकाम्या वेळेत अंगणात, टेरेसवर, तर काहींनी बाल्कनीत भाज्या पिकविण्याचा निर्णय घेतला. यासाठी ओळखीच्या लोकांकडून रात्रीच्यावेळी रोपं, बियाणं, तर काही वेळेस खतं आणून जागा उपलब्ध असेल अशा ठिकाणी पिकवली. या काळात कंपन्या, शासकीय, निमशासकीय कार्यालये बंदच होती. त्यामुळे कामही फारसे नसल्याने अनेकांकडे वेळच वेळ होता. या वेळेत त्यांनी पाणी वेळेवर देणे, गवत काढणे असली कामे केली. त्यामुळे या भाज्याही चांगल्या उगवल्या. काही महिन्यात त्याची भाजी करता येईल एवढी वाढ झाली.

यातून स्वनिर्मितीचा आनंद घेता आला. ग्रामीण भागात किंवा शहरातही ज्यांच्या दारात जागा मोठी आहे, त्यांनी झाडवर्गातील शेंगभाजीची लागवड केली. यामध्ये शेवगा लावला. ज्यांनी अगोदरच हे झाड लावलेले होतं, ते या काळात एकमेकांना मदतीला धावून आले. शेजारधर्म निभावत ते आठ दिवसाला वेगवेगळ्या शेजाऱ्यांना एक-दोन भाज्या होतील एवढ्या शेंगा देत होते.

शहरातील माणसांनी मात्र या काळात कल्पकतेला दाद देत शेतीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शहरात वन बीएचके, टू-बीएचके जागेत राहणाऱ्या सिमेंटच्या जंगलातील माणसांकडे कोठून आले अंगण. त्यांनी टेरेसवर, तर काहींनी बाल्कनीत भाज्या पिकवल्या. लाॅकडाऊन काळातही सुरुवातीस सायंकाळच्या वेळेस असंख्य सातारकर फिरायला महादरे, कुरणेश्वर परिसरात जात होते. जाताना रिकाम्या पिशव्या किंवा पोते घेऊन जात होते. येताना शेतातील काळी माती आणत होते.