शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

अख्ख्या लाॅकडाऊनमध्ये खाल्ली ताजी-ताजी भाजी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:45 IST

माणसाला कोरोनानं खूप काही शिकवलं. काम, पैशाच्या मागे लागल्याने माणूस आपली माणसं, त्यांची सुख-दु:ख विसरला होता. पोरांच्याही आठ-आठ दिवस ...

माणसाला कोरोनानं खूप काही शिकवलं. काम, पैशाच्या मागे लागल्याने माणूस आपली माणसं, त्यांची सुख-दु:ख विसरला होता. पोरांच्याही आठ-आठ दिवस भेटीगाठी होत नव्हत्या. पण याचं कोणालाच विशेष वाटत नव्हतं. कामाच्या व्यापात माणूस आवडी, छंदही हरवून बसला होता. याच माणसाला जमिनीवर आणण्याचे काम कोरोनाने केले.

कोरोनाचा शिरकाव भारतात मार्च २०२० मध्ये झाला. सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाविषयी प्रशासन, आरोग्य विभागालाही फारशी माहिती नव्हती. त्यामुळे कडकडीत संचारबंदी लागू केली होती. शहरातील प्रमुख रस्ते बॅरिकेट, कळक (बांबू) लावून बंद केले होते; तर काही गावांमध्ये येणाऱ्या रस्त्यावर चर खोदून, काटे टाकून कोणी येणार नाही, याची खबरदारी घेतली जात होती. शहरात कोणी रस्त्यावर फिरताना दिसला, तर पोलीस बदडून काढत होते. त्यामुळेच माणसांना घरातच थांबावे लागत होते. नागरिकांची होणारी अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने पुढे दारापर्यंत फळे, भाजी विक्रेते येतील याचे नियोजन केले.

काहीवेळेस आठ-आठ दिवस बाहेर पडता येत नव्हते. तेव्हा कडधान्यापासून भाजी करून गृहिणींनी वेळ निभावून नेली. पण मूळचे शेतकरी असलेले, गावाकडे बालपण गेलेल्यांनी रिकाम्या वेळेत अंगणात, टेरेसवर, तर काहींनी बाल्कनीत भाज्या पिकविण्याचा निर्णय घेतला. यासाठी ओळखीच्या लोकांकडून रात्रीच्यावेळी रोपं, बियाणं, तर काही वेळेस खतं आणून जागा उपलब्ध असेल अशा ठिकाणी पिकवली. या काळात कंपन्या, शासकीय, निमशासकीय कार्यालये बंदच होती. त्यामुळे कामही फारसे नसल्याने अनेकांकडे वेळच वेळ होता. या वेळेत त्यांनी पाणी वेळेवर देणे, गवत काढणे असली कामे केली. त्यामुळे या भाज्याही चांगल्या उगवल्या. काही महिन्यात त्याची भाजी करता येईल एवढी वाढ झाली.

यातून स्वनिर्मितीचा आनंद घेता आला. ग्रामीण भागात किंवा शहरातही ज्यांच्या दारात जागा मोठी आहे, त्यांनी झाडवर्गातील शेंगभाजीची लागवड केली. यामध्ये शेवगा लावला. ज्यांनी अगोदरच हे झाड लावलेले होतं, ते या काळात एकमेकांना मदतीला धावून आले. शेजारधर्म निभावत ते आठ दिवसाला वेगवेगळ्या शेजाऱ्यांना एक-दोन भाज्या होतील एवढ्या शेंगा देत होते.

शहरातील माणसांनी मात्र या काळात कल्पकतेला दाद देत शेतीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शहरात वन बीएचके, टू-बीएचके जागेत राहणाऱ्या सिमेंटच्या जंगलातील माणसांकडे कोठून आले अंगण. त्यांनी टेरेसवर, तर काहींनी बाल्कनीत भाज्या पिकवल्या. लाॅकडाऊन काळातही सुरुवातीस सायंकाळच्या वेळेस असंख्य सातारकर फिरायला महादरे, कुरणेश्वर परिसरात जात होते. जाताना रिकाम्या पिशव्या किंवा पोते घेऊन जात होते. येताना शेतातील काळी माती आणत होते.