शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

अख्ख्या लाॅकडाऊनमध्ये खाल्ली ताजी-ताजी भाजी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:45 IST

माणसाला कोरोनानं खूप काही शिकवलं. काम, पैशाच्या मागे लागल्याने माणूस आपली माणसं, त्यांची सुख-दु:ख विसरला होता. पोरांच्याही आठ-आठ दिवस ...

माणसाला कोरोनानं खूप काही शिकवलं. काम, पैशाच्या मागे लागल्याने माणूस आपली माणसं, त्यांची सुख-दु:ख विसरला होता. पोरांच्याही आठ-आठ दिवस भेटीगाठी होत नव्हत्या. पण याचं कोणालाच विशेष वाटत नव्हतं. कामाच्या व्यापात माणूस आवडी, छंदही हरवून बसला होता. याच माणसाला जमिनीवर आणण्याचे काम कोरोनाने केले.

कोरोनाचा शिरकाव भारतात मार्च २०२० मध्ये झाला. सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाविषयी प्रशासन, आरोग्य विभागालाही फारशी माहिती नव्हती. त्यामुळे कडकडीत संचारबंदी लागू केली होती. शहरातील प्रमुख रस्ते बॅरिकेट, कळक (बांबू) लावून बंद केले होते; तर काही गावांमध्ये येणाऱ्या रस्त्यावर चर खोदून, काटे टाकून कोणी येणार नाही, याची खबरदारी घेतली जात होती. शहरात कोणी रस्त्यावर फिरताना दिसला, तर पोलीस बदडून काढत होते. त्यामुळेच माणसांना घरातच थांबावे लागत होते. नागरिकांची होणारी अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने पुढे दारापर्यंत फळे, भाजी विक्रेते येतील याचे नियोजन केले.

काहीवेळेस आठ-आठ दिवस बाहेर पडता येत नव्हते. तेव्हा कडधान्यापासून भाजी करून गृहिणींनी वेळ निभावून नेली. पण मूळचे शेतकरी असलेले, गावाकडे बालपण गेलेल्यांनी रिकाम्या वेळेत अंगणात, टेरेसवर, तर काहींनी बाल्कनीत भाज्या पिकविण्याचा निर्णय घेतला. यासाठी ओळखीच्या लोकांकडून रात्रीच्यावेळी रोपं, बियाणं, तर काही वेळेस खतं आणून जागा उपलब्ध असेल अशा ठिकाणी पिकवली. या काळात कंपन्या, शासकीय, निमशासकीय कार्यालये बंदच होती. त्यामुळे कामही फारसे नसल्याने अनेकांकडे वेळच वेळ होता. या वेळेत त्यांनी पाणी वेळेवर देणे, गवत काढणे असली कामे केली. त्यामुळे या भाज्याही चांगल्या उगवल्या. काही महिन्यात त्याची भाजी करता येईल एवढी वाढ झाली.

यातून स्वनिर्मितीचा आनंद घेता आला. ग्रामीण भागात किंवा शहरातही ज्यांच्या दारात जागा मोठी आहे, त्यांनी झाडवर्गातील शेंगभाजीची लागवड केली. यामध्ये शेवगा लावला. ज्यांनी अगोदरच हे झाड लावलेले होतं, ते या काळात एकमेकांना मदतीला धावून आले. शेजारधर्म निभावत ते आठ दिवसाला वेगवेगळ्या शेजाऱ्यांना एक-दोन भाज्या होतील एवढ्या शेंगा देत होते.

शहरातील माणसांनी मात्र या काळात कल्पकतेला दाद देत शेतीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शहरात वन बीएचके, टू-बीएचके जागेत राहणाऱ्या सिमेंटच्या जंगलातील माणसांकडे कोठून आले अंगण. त्यांनी टेरेसवर, तर काहींनी बाल्कनीत भाज्या पिकवल्या. लाॅकडाऊन काळातही सुरुवातीस सायंकाळच्या वेळेस असंख्य सातारकर फिरायला महादरे, कुरणेश्वर परिसरात जात होते. जाताना रिकाम्या पिशव्या किंवा पोते घेऊन जात होते. येताना शेतातील काळी माती आणत होते.