शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात विनामास्क लोकांचा मुक्तसंचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:45 IST

वेळे : सगळीकडे कोरोनाचे संकट वाढतच चालले आहे. त्याला कसाबसा आवर घालण्यासाठी प्रयत्न होत असतानाच दिवसेंदिवस त्यात भरच पडत ...

वेळे : सगळीकडे कोरोनाचे संकट वाढतच चालले आहे. त्याला कसाबसा आवर घालण्यासाठी प्रयत्न होत असतानाच दिवसेंदिवस त्यात भरच पडत आहे. वाई तालुक्यातदेखील कोरोनाचे संकट वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील ग्रामीण भागात पूर्वीप्रमाणेच सर्व काही सुरळीत चालले आहे. कोरोना अजून हद्दपार झालेला नाही, तो पुन्हा येईल, याचा विसरच येथील जनतेला पडला आहे.

गेल्या वर्षी कोरोनाचा उद्रेक होताहोता कमी झाला. याचे मुख्य कारण म्हणजे प्रत्येकाच्या तोंडावर मास्क होते. मास्क न घालणाऱ्या लोकांवर कारवाई होत होती. परंतु, सध्या ग्रामीण भागातील चित्र हे वेगळे आहे. ग्रामीण भागात सर्रासपणे मास्क नसलेल्या व्यक्ती अगदी मुक्तसंचार करताना दिसत आहेत.

गेल्या वर्षी विनामास्क फिरणाऱ्यांवर गावचे पोलीसपाटील, ग्रामपंचायत प्रशासन, ग्राम दक्षता समिती यांच्यामार्फत कारवाई होत होती. मात्र, आता बऱ्याच गावांमधून ग्राम दक्षता समिती अकार्यक्षम असल्याची दिसत आहे. सरकारने घालून दिलेले निर्बंध काही अंशी शिथिल केले. त्यामुळे जनजीवन पुन्हा रुळांवर येत होते. अनेक मोठे समारंभ, लग्नकार्य यामध्ये अनेक ठिकाणांहून लोक एकत्र येत होते. सरकारने घालून दिलेली मर्यादा ही फक्त कागदावरच असल्याची खात्री त्यानिमित्त अधोरेखित होत होती. लोक नियमांना डावलून आपले कार्य पार पाडत होते. ग्रामीण भागातील लोक या-ना त्या निमित्ताने वावरत असतात. यात काहींच्या तोंडावर तर काहींच्या गळ्यात व हातात मास्क असतो. त्यांच्यावरदेखील कारवाई होताना दिसत नाही. सर्वांनीच नियमांची अंमलबजावणी केली, तर आपण कोरोनापासून वाचू शकतो.

(चाैकट)

कारवाईत राजकारण नको...

प्रशासकीय यंत्रणा, ग्राम दक्षता समितीने विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर वेळीच कारवाई केली, तर हे कोरोना संकट आटोक्यात येऊ शकते. नाहीतर, आपल्याला पुन्हा एकदा लॉकडाऊनचा सामना करावा लागेल, यात तीळमात्र शंका नाही. अशा या मोकाट व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक गावाने पुन्हा एकदा पुढाकार घेतला पाहिजे. स्थानिक प्रशासन, पोलीसपाटील व ग्राम दक्षता समितीने याची अंमलबजावणी केली पाहिजे. हा माझ्याजवळचा, हा माझा नातेवाईक, हा माझा मतदार असे न करता सामाजिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. राजकारणविरहित कारवाई केली, तर यातच सर्वांचे सौख्य असेल, याचे भान ठेवून ही यंत्रणा नक्की कारवाई करतेय का, यावर जिल्हा प्रशासनाने लक्ष ठेवले पाहिजे.