शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
6
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
7
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
8
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
9
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
10
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
11
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
12
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
13
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
14
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
15
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
16
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
17
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
18
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
19
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
20
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

ग्रामीण भागात विनामास्क लोकांचा मुक्तसंचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:45 IST

वेळे : सगळीकडे कोरोनाचे संकट वाढतच चालले आहे. त्याला कसाबसा आवर घालण्यासाठी प्रयत्न होत असतानाच दिवसेंदिवस त्यात भरच पडत ...

वेळे : सगळीकडे कोरोनाचे संकट वाढतच चालले आहे. त्याला कसाबसा आवर घालण्यासाठी प्रयत्न होत असतानाच दिवसेंदिवस त्यात भरच पडत आहे. वाई तालुक्यातदेखील कोरोनाचे संकट वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील ग्रामीण भागात पूर्वीप्रमाणेच सर्व काही सुरळीत चालले आहे. कोरोना अजून हद्दपार झालेला नाही, तो पुन्हा येईल, याचा विसरच येथील जनतेला पडला आहे.

गेल्या वर्षी कोरोनाचा उद्रेक होताहोता कमी झाला. याचे मुख्य कारण म्हणजे प्रत्येकाच्या तोंडावर मास्क होते. मास्क न घालणाऱ्या लोकांवर कारवाई होत होती. परंतु, सध्या ग्रामीण भागातील चित्र हे वेगळे आहे. ग्रामीण भागात सर्रासपणे मास्क नसलेल्या व्यक्ती अगदी मुक्तसंचार करताना दिसत आहेत.

गेल्या वर्षी विनामास्क फिरणाऱ्यांवर गावचे पोलीसपाटील, ग्रामपंचायत प्रशासन, ग्राम दक्षता समिती यांच्यामार्फत कारवाई होत होती. मात्र, आता बऱ्याच गावांमधून ग्राम दक्षता समिती अकार्यक्षम असल्याची दिसत आहे. सरकारने घालून दिलेले निर्बंध काही अंशी शिथिल केले. त्यामुळे जनजीवन पुन्हा रुळांवर येत होते. अनेक मोठे समारंभ, लग्नकार्य यामध्ये अनेक ठिकाणांहून लोक एकत्र येत होते. सरकारने घालून दिलेली मर्यादा ही फक्त कागदावरच असल्याची खात्री त्यानिमित्त अधोरेखित होत होती. लोक नियमांना डावलून आपले कार्य पार पाडत होते. ग्रामीण भागातील लोक या-ना त्या निमित्ताने वावरत असतात. यात काहींच्या तोंडावर तर काहींच्या गळ्यात व हातात मास्क असतो. त्यांच्यावरदेखील कारवाई होताना दिसत नाही. सर्वांनीच नियमांची अंमलबजावणी केली, तर आपण कोरोनापासून वाचू शकतो.

(चाैकट)

कारवाईत राजकारण नको...

प्रशासकीय यंत्रणा, ग्राम दक्षता समितीने विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर वेळीच कारवाई केली, तर हे कोरोना संकट आटोक्यात येऊ शकते. नाहीतर, आपल्याला पुन्हा एकदा लॉकडाऊनचा सामना करावा लागेल, यात तीळमात्र शंका नाही. अशा या मोकाट व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक गावाने पुन्हा एकदा पुढाकार घेतला पाहिजे. स्थानिक प्रशासन, पोलीसपाटील व ग्राम दक्षता समितीने याची अंमलबजावणी केली पाहिजे. हा माझ्याजवळचा, हा माझा नातेवाईक, हा माझा मतदार असे न करता सामाजिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. राजकारणविरहित कारवाई केली, तर यातच सर्वांचे सौख्य असेल, याचे भान ठेवून ही यंत्रणा नक्की कारवाई करतेय का, यावर जिल्हा प्रशासनाने लक्ष ठेवले पाहिजे.