शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
4
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
5
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
6
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
7
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
8
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
9
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
10
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
11
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
12
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
13
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
14
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
15
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
16
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
17
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
18
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
19
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
20
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....

कोरोनाकाळात मोफत धान्याने दिला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पिंपोडे बुद्रुक : ‘राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत, जिल्ह्यातील लाभार्थ्यांना रेशन धान्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपोडे बुद्रुक : ‘राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत, जिल्ह्यातील लाभार्थ्यांना रेशन धान्य दिले जाते. जिल्ह्यात होणाऱ्या धान्यवाटपात कोरेगाव तालुका अग्रेसर असल्याचे त्यांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. कोरोनाकाळात रेशनचे धान्य गोरगरीब जनतेला मोठा आधार ठरले आहे.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते यांच्या सूचनेनुसार कोरेगावचे तहसीलदार अमोल कदम व नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे यांच्या सूचनेवरून सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यात जवळपास ९७ टक्के वाटप झाले. ते पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले असल्याचे तालुका पुरवठा अधिकारी सुनील बोतालजी यांनी सांगितले.

कोरेगाव तालुक्यात राष्ट्रीय सुरक्षा व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत ३१,६३८ शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करण्यात येते. त्यापैकी तालुक्यातील ३०,५०३ शिधापत्रिकाधारकांना धान्यवाटप होऊन ते पूर्णत: लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत कोरेगाव तालुका ऑनलाईन वाटपामध्ये सर्वात जास्त अग्रेसर आहे. आजपर्यंत ९७ टक्के वाटप पूर्ण झाले आहे. जून महिन्यात अंत्योदय अन्न योजना प्रतिकार्ड २५ किलो गहू, १० किलो तांदूळ, प्राधान्य कुटुंब लाभार्थी प्रतिमाणसी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ दिला जातो. त्यामध्ये दोन रुपये गहू प्रतिकिलो, तांदूळ तीन रुपये प्रतिकिलो या दराने वितरित करण्यात येत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या धान्याव्यतिरिक्त प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना व अंत्योदय योजना कुटुंबातील सदस्यांना, तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ देण्यात येत आहे. कोरेगाव तालुक्यातील ३१,६३८ कार्डधारकांना व १,३२,६१५ प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना रेशन धान्याचे वितरण रास्त भाव दुकानातून ई पॉस मशिनद्वारे करण्यात येत आहे,’ अशी माहिती तालुका पुरवठा निरीक्षक एस. जी. पवार यांनी दिली.

चौकट

लाभार्थी, विक्रेत्यांमध्ये समन्वय

कोरेगाव तालुक्यातील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत धान्यवाटपाची अतिशय प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. रेशन धान्य दुकानातून गावपातळीवर याचे वाटप व्यवस्थित सुरू आहे. केंद्र व राज्य शासनामार्फत धान्य गरिबांना दिले जात आहे. तहसील कार्यालय लाभार्थी व रास्त धान्य विक्रेते यांच्यात समन्वय ठेवत वेळोवेळी सहकार्य करत असतात, अशी माहिती स्वस्त भाव दुकानदार धनंजय धुमाळ यांनी दिली.