शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
2
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
3
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
4
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
5
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
6
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
7
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
8
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
9
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
10
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
11
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
12
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
13
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
14
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
16
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
17
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
18
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
19
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
20
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब

जिल्ह्यात कोरोनाचा चौथा स्तर... पाचव्याकडे कल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा हजाराकडे वाटचाल करत आहे. तर रुग्णवाढीचा दर बारा टक्क्यांच्या पुढे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा हजाराकडे वाटचाल करत आहे. तर रुग्णवाढीचा दर बारा टक्क्यांच्या पुढे गेला आहे. सध्या चौथ्या स्तरात असलेला सातारा जिल्हा कुठल्याही क्षणी पाचव्या स्तरात जाईल तशी भीती आहे. जिल्ह्याच्या जनतेलाच आता प्रयत्नांची पराकाष्ठा करून रुग्ण वाढ रोखणे आवश्यक बनले आहे.

राज्य शासनाने २५ जून रोजी काढलेल्या आदेशानुसार आरटीपीसीआर चाचण्यांच्या आधारे जिल्ह्याचा स्तर ठरविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा असे स्तर या चाचण्यानुसार ठरवले जातात. पाचव्या स्तरांमध्ये कडक निर्बंध घातले जातात. चौथ्या स्तरांमध्ये काही प्रमाणात त्यामध्ये सूट असते तर तिसऱ्या स्तरांमध्ये किराणा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व इतर दुकानांचे व्यवहार सुरू ठेवण्यास परवानगी असते.

सातारा जिल्हादेखील तिसऱ्या स्तरात होता, तेव्हा सकाळी नऊ ते चार यादरम्यान बाजारपेठेतील व्यवहार सुरू होते; परंतु आता जिल्हा चौथ्या सत्रात गेला असल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीव्यतिरिक्त इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शनिवार व रविवार पूर्णपणे संचारबंदी कायम आहे.

कोरोनाच्या रॅपिड ॲक्शन टेस्ट आणि आरटीपीसीआर या दोन चाचण्या केल्या जातात. आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल अचूक येत असल्याचे लक्षात आल्यानंतर शासनाने या चाचण्यांवरच भर दिला आहे, तसेच या चाचण्यांमधून जी रुग्णवाढ होते, त्यानुसारच जिल्ह्याचे स्तर ठरविण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मागील आठवड्यापासून सातारा जिल्हा जरी सहा-सात टक्क्यांमध्ये होता, तरी आरटीपीसीआर चाचण्यांनुसार जिल्ह्यातील रुग्ण वाढले. हे प्रमाण १२ टक्क्यांच्या वर गेले. ही रुग्णवाढ कमी येत नसल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यात चौथ्या स्तरातील निर्बंध जिल्ह्यात लागू केले आहेत.

रुग्णांची संख्या कमी असलेले तालुकेही वेठीस...

संपूर्ण राज्यात जिल्हानिहाय रुग्ण वाढीचे स्तर ठरवले आहेत. वास्तविक, सातारा, कऱ्हाड, कोरेगाव, खटाव ही तालुके वगळता महाबळेश्वर, वाई, जावली, पाटण या तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या कमी आहे. तरीदेखील चौथ्या स्तरातील निर्बंध या तालुक्यामध्ये देखील लागू केलेले आहेत. जिल्ह्याचा निकष लावून स्तर ठरवले गेले असल्याने ज्या तालुक्‍यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या कमी आहे, त्या ठिकाणीदेखील दैनंदिन व्यवहार सुरू ठेवता येत नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी जनतेची अपेक्षा आहे.