शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
6
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
7
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
8
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
9
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
10
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
11
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
12
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
13
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
14
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
15
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
16
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
17
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
18
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
19
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
20
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाचा चौथा स्तर... पाचव्याकडे कल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा हजाराकडे वाटचाल करत आहे. तर रुग्णवाढीचा दर बारा टक्क्यांच्या पुढे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा हजाराकडे वाटचाल करत आहे. तर रुग्णवाढीचा दर बारा टक्क्यांच्या पुढे गेला आहे. सध्या चौथ्या स्तरात असलेला सातारा जिल्हा कुठल्याही क्षणी पाचव्या स्तरात जाईल तशी भीती आहे. जिल्ह्याच्या जनतेलाच आता प्रयत्नांची पराकाष्ठा करून रुग्ण वाढ रोखणे आवश्यक बनले आहे.

राज्य शासनाने २५ जून रोजी काढलेल्या आदेशानुसार आरटीपीसीआर चाचण्यांच्या आधारे जिल्ह्याचा स्तर ठरविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा असे स्तर या चाचण्यानुसार ठरवले जातात. पाचव्या स्तरांमध्ये कडक निर्बंध घातले जातात. चौथ्या स्तरांमध्ये काही प्रमाणात त्यामध्ये सूट असते तर तिसऱ्या स्तरांमध्ये किराणा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व इतर दुकानांचे व्यवहार सुरू ठेवण्यास परवानगी असते.

सातारा जिल्हादेखील तिसऱ्या स्तरात होता, तेव्हा सकाळी नऊ ते चार यादरम्यान बाजारपेठेतील व्यवहार सुरू होते; परंतु आता जिल्हा चौथ्या सत्रात गेला असल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीव्यतिरिक्त इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शनिवार व रविवार पूर्णपणे संचारबंदी कायम आहे.

कोरोनाच्या रॅपिड ॲक्शन टेस्ट आणि आरटीपीसीआर या दोन चाचण्या केल्या जातात. आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल अचूक येत असल्याचे लक्षात आल्यानंतर शासनाने या चाचण्यांवरच भर दिला आहे, तसेच या चाचण्यांमधून जी रुग्णवाढ होते, त्यानुसारच जिल्ह्याचे स्तर ठरविण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मागील आठवड्यापासून सातारा जिल्हा जरी सहा-सात टक्क्यांमध्ये होता, तरी आरटीपीसीआर चाचण्यांनुसार जिल्ह्यातील रुग्ण वाढले. हे प्रमाण १२ टक्क्यांच्या वर गेले. ही रुग्णवाढ कमी येत नसल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यात चौथ्या स्तरातील निर्बंध जिल्ह्यात लागू केले आहेत.

रुग्णांची संख्या कमी असलेले तालुकेही वेठीस...

संपूर्ण राज्यात जिल्हानिहाय रुग्ण वाढीचे स्तर ठरवले आहेत. वास्तविक, सातारा, कऱ्हाड, कोरेगाव, खटाव ही तालुके वगळता महाबळेश्वर, वाई, जावली, पाटण या तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या कमी आहे. तरीदेखील चौथ्या स्तरातील निर्बंध या तालुक्यामध्ये देखील लागू केलेले आहेत. जिल्ह्याचा निकष लावून स्तर ठरवले गेले असल्याने ज्या तालुक्‍यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या कमी आहे, त्या ठिकाणीदेखील दैनंदिन व्यवहार सुरू ठेवता येत नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी जनतेची अपेक्षा आहे.