शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

चार नगराध्यक्ष बिनविरोध

By admin | Updated: July 10, 2014 00:35 IST

राजकारण तापले : सातारा, फलटण, म्हसवड, रहिमतपूरमध्ये एकच अर्ज

सातारा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या नगराध्यक्ष निवडीमुळे जिल्ह्यातील राजकारण भलतेच तापले आहे. सातारा, फलटण, म्हसवड व रहिमतपूरमध्ये नगराध्यक्षपद बिनविरोध करण्यात स्थानिक नेत्यांना यश मिळाले आहे, तर वाई, पाचगणी, महाबळेश्वर, कऱ्हाड पालिकांच्या नगराध्यक्ष निवडीत एकापेक्षा जास्त अर्ज दाखल झाल्याने चुरस निर्माण झाली आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण बदलले असल्याने या निवडी कराव्या लागल्या आहेत. सचिन सारस (सातारा), उज्ज्वला माने (रहिमतपूर), विजय सिन्हा (म्हसवड), सारिका जाधव (फलटण) यांचा त्या-त्या ठिकाणी एकमेव अर्ज दाखल झाला असल्याने त्यांची नगराध्यक्षपदावरील निवड निश्चित झाली आहे. याउलट कऱ्हाडमध्ये सत्ताधारी लोकशाही आघाडीच्या विद्याराणी साळुंखे व विरोधी जनशक्ती आघाडीच्या अरुणा शिंदे यांचे अर्ज दाखल झाले. महाबळेश्वरमधून लोकमित्र जनसेवा आघाडीच्या सुनीता आखाडे, तर आमदार मकरंद पाटील यांच्या गटातून उज्ज्वला तोष्णिवाल यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. पाचगणीतून विद्यमान नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर, विरोधी गटातील महेश चौरासिया व उज्ज्वला महाडिक यांनी अर्ज भरले आहेत. वाईतून जनकल्याण आघाडीचे नंदकुमार खामकर, शोभा शिंदे, तीर्थक्षेत्र आघाडीचे भूषण गायकवाड या तिघांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले आहेत. कऱ्हाडमधून आमदार बाळासाहेब पाटील विरोधातील जाधव गटाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे, तर वाई-महाबळेश्वर-पाचगणीची सत्ता खेचण्यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी तयारी केली आहे. या निवडीमुळे कऱ्हाड तसेच वाई मतदारसंघांतील राजकारण तापले आहे. (प्रतिनिधी)