शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चार आण्याची शेती... बारा आण्याची मजुरी

By admin | Updated: June 19, 2015 00:21 IST

चार आण्याची शेती... बारा आण्याची मजुरी

कोपर्डे हवेली : दिवसेंदिवस वाढत असलेले खताचे दर, उत्पादनाच्या खर्चामध्ये झालेली वाढ, नैसर्गिक आपत्ती, उत्पादनाला बाजारपेठेत मिळणारा नीचांकी दर, मशागतीचा खर्च, बियाणांची दरवाढ, प्रत्येक वर्षी वाढत जाणारी मजुरी आदी कारणांमुळे बागायतदारांना शेती नको वाटू लागली आहे. काही वर्षांपूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, असे समजले जात होते. मात्र, सध्या याच्या उलट स्थिती आहे. शेतकरी चारी बाजूंनी संकटात सापडला असल्याने शेती कनिष्ठ दर्जाची होऊन बसली आहे. बागायती क्षेत्रामध्ये दरवर्षी मजुरांकाडून दरवाढ केली जाते. शहरालगतच्या गावांमध्ये मजुरांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. शेतीच्या कामासाठी ऐनवेळी मजूर उपलब्ध होत नाहीत. परगावाहून स्वखर्चाने त्यांना जादा मजुरी देऊन शेतीकामासाठी आणले जात आहे. शेतीच्या उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य मोबदला मिळत नसल्याने शेती तोट्यात जाऊ लागली आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी उसाला चांगला दर मिळत होता. तर यावर्षी अ‍ॅडव्हान्स म्हणून साखर कारखानदारांनी काही रकमा दिल्या आहेत. पुन्हा दर किती मिळणार, याविषयी यावर्षी अनिश्चितता आहे. शेतकऱ्यांना उसाला दर कमी मिळाला म्हणून मजुरीचे दर कमी होणार नाहीत. शेतकऱ्यांच्या मालाचे दर कमी जास्त होऊ शकतात; पण उत्पादन खर्चामध्ये वाढीचा आलेख उंचावत आहे. शेतीमधून फायदा मिळण्याऐवजी शेतकऱ्यांचा तोटा दिसत आहे. भांगलण, उसाची लागण, टोकणी, औषधे फवारणी, सऱ्यांची तोंडे करणे, उसाची पाचट काढणे आदी कामे मजुरांकडून करून घेतली जातात. प्रत्येक शेतकरी मजुरांवर अवलंबून असतो. काही ठिकाणी मजुरांचा तुटवडा असल्यामुळे शेतीतील कामे वेळेत होत नसल्याने पिकांच्यावर परिणाम होत असून, उत्पादन घटत आहे. (वार्ताहर)सोयाबीनचा उत्पादन खर्चही नाहीजिरायती क्षेत्रामधील शेतकरी खरिपामध्ये सोयाबीन, भुईमूग, घेवडा आदींसह इतर पिकांचे उत्पादन घेतो. जास्त क्षेत्र सोयाबीनचे असते. गेल्या वर्षी सोयाबीनचा क्विंटलचा दर ३ हजारांपासून ३ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचला. उत्पादन घटल्याने अनेकांचा उत्पादन खर्च निघाला नाही. बागायती शेतकरी नावालाच बागायती उरला आहे. मजुरीचा खर्च वाचविण्यासाठी सध्या शेतकऱ्याला स्वत:च शेतीमध्ये कष्ट करणे गरजेचे बनले आहे. तसेच शेतीमध्ये यांत्रिकीकरणही वाढत चालले आहे.माळव्याची पिके घेणारे अडचणीतबागायती क्षेत्रामध्येच मजुरांचा तुटवडा जाणवतो. माळव्याची पिके घेतल्यानंतर कायमच मजुरांची गरज भासते. गेली दोन वर्षे माळव्याच्या पिकांना दर नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.ऊसतोड मजुरांची मनमानीसाखरेला दर कमी असल्यामुळे उसाची शेती धोक्यात आली आहे. त्यामध्ये ऊस कारखाने बंद होत असताना शेवटी ऊसतोड मजुरांना एकरी ७ हजार रुपये पासून १० हजार रुपये शेतकऱ्यांना स्वत:च्या खिशातून द्यावे लागले. मजुरीचे वाढते दर उसाचा पाला काढणे : एकरी ३ हजार ५०० ते ४ हजार टोकणी महिला : प्रतिदिन २०० रुपयेऔषधाची पंप फवारणी : एका पंपासाठी ४० ते ५० रुपयेपुरुषाची दिवसाची हजेरी : प्रतिदिन २५० ते ३०० रुपये पाला काढण्यासाठी महिलेस सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत १५० रुपये तर संपूर्ण दिवस सकाळी ११ ते ५ पर्यंत २०० रुपये आहे.मजुरीसोबत वैरण मोफतपुरुष व महिला शेतमजूर शेतामध्ये कामाला येतात, त्यावेळी जनावरांना चारा घेऊन जातात. काही वेळेस जळण, तसेच शेतातील भाजीपाला शेतकरी मोफत देत असतात. हजेरीबरोबर त्यांचा फायदाही होत असतो. मजुरांच्या दरवाढीने शेतकरी मेटाकुटीलाशेतातून मिळणारा फायदा कमी आणि तोटा जास्त अशीच शेतकऱ्यांची अवस्था झाल्याने दिसून क्षेत्र आहे. ‘चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला,’ अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.