शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

चार आण्याची शेती... बारा आण्याची मजुरी

By admin | Updated: June 19, 2015 00:21 IST

चार आण्याची शेती... बारा आण्याची मजुरी

कोपर्डे हवेली : दिवसेंदिवस वाढत असलेले खताचे दर, उत्पादनाच्या खर्चामध्ये झालेली वाढ, नैसर्गिक आपत्ती, उत्पादनाला बाजारपेठेत मिळणारा नीचांकी दर, मशागतीचा खर्च, बियाणांची दरवाढ, प्रत्येक वर्षी वाढत जाणारी मजुरी आदी कारणांमुळे बागायतदारांना शेती नको वाटू लागली आहे. काही वर्षांपूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, असे समजले जात होते. मात्र, सध्या याच्या उलट स्थिती आहे. शेतकरी चारी बाजूंनी संकटात सापडला असल्याने शेती कनिष्ठ दर्जाची होऊन बसली आहे. बागायती क्षेत्रामध्ये दरवर्षी मजुरांकाडून दरवाढ केली जाते. शहरालगतच्या गावांमध्ये मजुरांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. शेतीच्या कामासाठी ऐनवेळी मजूर उपलब्ध होत नाहीत. परगावाहून स्वखर्चाने त्यांना जादा मजुरी देऊन शेतीकामासाठी आणले जात आहे. शेतीच्या उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य मोबदला मिळत नसल्याने शेती तोट्यात जाऊ लागली आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी उसाला चांगला दर मिळत होता. तर यावर्षी अ‍ॅडव्हान्स म्हणून साखर कारखानदारांनी काही रकमा दिल्या आहेत. पुन्हा दर किती मिळणार, याविषयी यावर्षी अनिश्चितता आहे. शेतकऱ्यांना उसाला दर कमी मिळाला म्हणून मजुरीचे दर कमी होणार नाहीत. शेतकऱ्यांच्या मालाचे दर कमी जास्त होऊ शकतात; पण उत्पादन खर्चामध्ये वाढीचा आलेख उंचावत आहे. शेतीमधून फायदा मिळण्याऐवजी शेतकऱ्यांचा तोटा दिसत आहे. भांगलण, उसाची लागण, टोकणी, औषधे फवारणी, सऱ्यांची तोंडे करणे, उसाची पाचट काढणे आदी कामे मजुरांकडून करून घेतली जातात. प्रत्येक शेतकरी मजुरांवर अवलंबून असतो. काही ठिकाणी मजुरांचा तुटवडा असल्यामुळे शेतीतील कामे वेळेत होत नसल्याने पिकांच्यावर परिणाम होत असून, उत्पादन घटत आहे. (वार्ताहर)सोयाबीनचा उत्पादन खर्चही नाहीजिरायती क्षेत्रामधील शेतकरी खरिपामध्ये सोयाबीन, भुईमूग, घेवडा आदींसह इतर पिकांचे उत्पादन घेतो. जास्त क्षेत्र सोयाबीनचे असते. गेल्या वर्षी सोयाबीनचा क्विंटलचा दर ३ हजारांपासून ३ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचला. उत्पादन घटल्याने अनेकांचा उत्पादन खर्च निघाला नाही. बागायती शेतकरी नावालाच बागायती उरला आहे. मजुरीचा खर्च वाचविण्यासाठी सध्या शेतकऱ्याला स्वत:च शेतीमध्ये कष्ट करणे गरजेचे बनले आहे. तसेच शेतीमध्ये यांत्रिकीकरणही वाढत चालले आहे.माळव्याची पिके घेणारे अडचणीतबागायती क्षेत्रामध्येच मजुरांचा तुटवडा जाणवतो. माळव्याची पिके घेतल्यानंतर कायमच मजुरांची गरज भासते. गेली दोन वर्षे माळव्याच्या पिकांना दर नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.ऊसतोड मजुरांची मनमानीसाखरेला दर कमी असल्यामुळे उसाची शेती धोक्यात आली आहे. त्यामध्ये ऊस कारखाने बंद होत असताना शेवटी ऊसतोड मजुरांना एकरी ७ हजार रुपये पासून १० हजार रुपये शेतकऱ्यांना स्वत:च्या खिशातून द्यावे लागले. मजुरीचे वाढते दर उसाचा पाला काढणे : एकरी ३ हजार ५०० ते ४ हजार टोकणी महिला : प्रतिदिन २०० रुपयेऔषधाची पंप फवारणी : एका पंपासाठी ४० ते ५० रुपयेपुरुषाची दिवसाची हजेरी : प्रतिदिन २५० ते ३०० रुपये पाला काढण्यासाठी महिलेस सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत १५० रुपये तर संपूर्ण दिवस सकाळी ११ ते ५ पर्यंत २०० रुपये आहे.मजुरीसोबत वैरण मोफतपुरुष व महिला शेतमजूर शेतामध्ये कामाला येतात, त्यावेळी जनावरांना चारा घेऊन जातात. काही वेळेस जळण, तसेच शेतातील भाजीपाला शेतकरी मोफत देत असतात. हजेरीबरोबर त्यांचा फायदाही होत असतो. मजुरांच्या दरवाढीने शेतकरी मेटाकुटीलाशेतातून मिळणारा फायदा कमी आणि तोटा जास्त अशीच शेतकऱ्यांची अवस्था झाल्याने दिसून क्षेत्र आहे. ‘चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला,’ अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.