शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

कैलास स्मशानभूमीत सातारा पालिकेकडून चार अग्निकुंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:39 IST

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असताना मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणही आता वाढले आहे. त्यामुळे संगममाहुली येथील कैलास ...

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असताना मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणही आता वाढले आहे. त्यामुळे संगममाहुली येथील कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार व्यवस्थेवर प्रचंड ताण पडू लागला आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या आदेशाने स्मशानभूमीत उपलब्ध वीस अग्निकुंडांव्यतिरिक्त स्वतंत्र चार अग्निकुंड पत्र्याच्या शेडसह बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली.

सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. दररोज एक ते दीड हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत तर तीस ते चाळीस रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. कोरोनामुळे दगावणाऱ्या बाधितांवर साताऱ्यातील संगममाहुली येथील कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. अंत्यसंस्काराची जबाबदारी सातारा पालिकेच्या खांद्यावर असून, सध्या बळींचे प्रमाण वाढल्याने अग्निसंस्काराच्या एकूणच व्यवस्थेवर प्रचंड ताण पडत आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी अंत्यसंस्कार व्यवस्थेवरील हा ताण कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उदयनराजे यांनी कैलास स्मशानभूमीत स्वतंत्र चार अग्निकुंड संपूर्ण व्यवस्थेसह बसविण्याचे पालिका प्रशासनाला आदेश दिले आहेत. त्यानुसार उपनगराध्यक्ष मनोज शेंडे व मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी तत्काळ कैलास स्मशानभूमीला भेट देऊन यंत्रणा कामाला लावली. सध्या स्मशानभूमीत वीस अग्निकुंड आहेत. यापैकी दहा अग्निकुंड कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी राखीव आहेत. मात्र कोरोना बळींचा आकडा पन्नाशीच्या दिशेने निघाल्याने अंत्यसंस्कारासाठी तिष्ठत राहणे आणि शिवाय कुटुंबियांना मनस्ताप असे अनुभव सध्या येत आहेत. याच गैरसोयीवर जादा अग्निकुंड बसविण्याचा तोडगा खा. उदयनराजे यांनी काढत तो तत्काळ अंमलात येईल याची व्यवस्था केली आहे.

उपलब्ध अग्निकुंडांपासून समान अंतरावर सहा नवीन अग्निकुंड पत्र्याच्या शेडसह बसविण्याचे काम प्रगतीपथावर असून यातील चार अग्निकुंड युद्धपातळीवर बसविण्यात आल्याचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी सांगितले. हा सर्व खर्च नगरपालिका फंडातून करण्यात येणार आहे. पालिकेच्या चार अग्निकुंडांमुळे कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी एकूण चौदा अग्निकुंड उपलब्ध होणार आहेत. पुढील टप्प्यात स्मशानभूमीसाठी स्वतंत्र गॅस दाहिनी बसविण्याची योजना सातारा पालिकेने आखली असून, याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.