शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

अंगणवाडी इमारतीचा पाया पावसामुळे खचला!

By admin | Updated: June 25, 2015 21:30 IST

टोणपेवाडीत धोका : व्हरांड्यात बसून चिमुरडी घेताहेत शिक्षण

कुडाळ : जावळी तालुक्यात संततधार पाऊस सुरूच असून, या पावसामुळे टोणपेवाडी येथील अंगणवाडीच्या इमारतीची भिंत खचली आहे. त्यामुळे इमारतीला धोका निर्माण झाला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी अंगणवाडी प्रकल्पाधिकारी, महसूल विभागाचा एकही कर्मचारी अद्याप पोहोचलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना व्हरांड्यातच बसवून शिक्षण द्यावे लागत आहे. जावळी तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोसाट्याचा वारा वाहत असल्याने अनेक झाडे रस्त्यात पडले असून, मुसळधार पावसामुळे अनेक घरे पडले आहेत. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.जावळी तालुक्यातील टोणपेवाडी या गावातील अंगणवाडी इमारतीजवळ असलेल्या दगडीताल ढासळल्याने इमारतीची भिंत खचली आहे. हा पाऊस आणखी काही दिवस असाच राहिला तर इमारत कधीही ढासळू शकते, असा धोका निर्माण झाला आहे.इमारतीलगत असलेल्या घरांनाही शेतातील दगडीताल वाहून गेल्याने धोका अधिक वाढला आहे. याची तालुका व जिल्हा प्रशासनाने गांभीर्यांने दखल घेऊन उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. यामुळे लहान मुलांबरोबरच पालकांमध्येही भितीचे वातावरण आहे. त्यामुळे काहीजण मुलांना शाळेत पाठविण्यास तयार होत नाहीत. उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)