शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

अंगणवाडी इमारतीचा पाया पावसामुळे खचला!

By admin | Updated: June 25, 2015 21:30 IST

टोणपेवाडीत धोका : व्हरांड्यात बसून चिमुरडी घेताहेत शिक्षण

कुडाळ : जावळी तालुक्यात संततधार पाऊस सुरूच असून, या पावसामुळे टोणपेवाडी येथील अंगणवाडीच्या इमारतीची भिंत खचली आहे. त्यामुळे इमारतीला धोका निर्माण झाला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी अंगणवाडी प्रकल्पाधिकारी, महसूल विभागाचा एकही कर्मचारी अद्याप पोहोचलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना व्हरांड्यातच बसवून शिक्षण द्यावे लागत आहे. जावळी तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोसाट्याचा वारा वाहत असल्याने अनेक झाडे रस्त्यात पडले असून, मुसळधार पावसामुळे अनेक घरे पडले आहेत. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.जावळी तालुक्यातील टोणपेवाडी या गावातील अंगणवाडी इमारतीजवळ असलेल्या दगडीताल ढासळल्याने इमारतीची भिंत खचली आहे. हा पाऊस आणखी काही दिवस असाच राहिला तर इमारत कधीही ढासळू शकते, असा धोका निर्माण झाला आहे.इमारतीलगत असलेल्या घरांनाही शेतातील दगडीताल वाहून गेल्याने धोका अधिक वाढला आहे. याची तालुका व जिल्हा प्रशासनाने गांभीर्यांने दखल घेऊन उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. यामुळे लहान मुलांबरोबरच पालकांमध्येही भितीचे वातावरण आहे. त्यामुळे काहीजण मुलांना शाळेत पाठविण्यास तयार होत नाहीत. उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)