शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाने घाईगडबडीत येरळवाडीचे बारसं घातलं ‘येराळवाडी’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:45 IST

वडूज : येरळवाडी मध्यम प्रकल्प हा सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील खटाव तालुक्यामध्ये येरळा नदीवर आहे. या क्षेत्राची मालकी कृष्णा ...

वडूज : येरळवाडी मध्यम प्रकल्प हा सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील खटाव तालुक्यामध्ये येरळा नदीवर आहे. या क्षेत्राची मालकी कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांच्याकडे आहे. मात्र, मायणी पक्षी संवर्धन राखीव या नावाने ओळखले जाणारे संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्याची अधिसूचना १५ मार्च रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली. येरळवाडीसह अन्य गावांना विचारात न घेतल्याने आंदोलने झाली; परंतु राजपत्रित आदेशानुसार हे क्षेत्र वनविभागाने काही अटींवर ताब्यात ठेवले. वनविभागाच्या घाईगडबडीने ‘येराळवाडी- मायणी’ पक्षी संवर्धन राखीव वनविभाग, सातारा’ या प्रसिद्धपत्रकांमुळे खटाव तालुक्यात वनविभागाविरोधात पुन्हा एकदा राळ उठली आहे.

मायणी समूह संवर्धन राखीव क्षेत्राच्या अधिसूचनेतून येरळवाडी मध्यम प्रकल्प वगळण्यात यावा, यासाठी १५ जूनपासून बेमुदत उपोषण येरळवाडी जलाशय पाणी उपसा संस्था व पाणी उपसा शेतकऱ्यांनी सुरू केले. प्रशासनाच्या मध्यस्थीने हे उपोषण स्थगित केले. हा प्रकल्प अवर्षणप्रवण क्षेत्रात समाविष्ट असून मुख्य धरण हे मातीचे आहे. धरणातील पाणीसाठ्याचा वापर हा कालवा व उपसा सिंचनासाठी आणि परिसरातील गावाच्या पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी होत आहे. खटाव तालुक्यातील या धरणाचे ठिकाण अवर्षणप्रवण क्षेत्रात समाविष्ट असल्याने सिंचनासाठी व पिण्यासाठी पाण्याची मागणी कायमस्वरूपी येत आहे. मूळ प्रकल्प मंजुरी नियोजनानुसार ही फक्त सिंचनासाठी असून पिण्यासाठी व औद्योगिक प्रयोजनार्थ कोणतीही तरतूद नाही. कालांतराने आवश्यकतेनुसार येरळवाडी प्रकल्पातून वडूज, मायणी, अंबवडे, कातरखटाव या शहर व आसपासच्या गावांना काही प्रमाणात मंजुरी देण्यात आली. टंचाई कालावधीत तालुक्यातील खेड्यांना टँकरद्वारे पिण्यासाठी पाणीपुरवठाही करण्यात येतो. या जलाशयातून मासेमारी व्यवसायाचा ठेकाही देण्यात आला आहे.

दुष्काळ घोषित झाल्यानंतर जनावरांना चारा उपलब्ध होण्यासाठी चारा पिके घेण्याकरिता राष्ट्रीय कृषी विकास योजनाअंतर्गत विनामूल्य बियाणे जलाशयातील उपलब्ध जमीन गाळपेरासाठी उपलब्ध करून देण्यात येते. सर्व बाबी असतानाही वनविभागाने हे क्षेत्र राखीव वनक्षेत्र म्हणून ताब्यात घेतले. आंदोलनकर्ते, प्रशासन यांच्यातील मुंबई येथील बैठक पार पडली. काही जाचक अटी शिथिल करून मध्य मार्ग निघाला, पण ते तोंडी स्वरूपातीलच ठरले.

वनविभागाने मोठे युद्ध जिंकल्याच्या आविर्भावात प्रसिद्ध केलेल्या पत्रकात येरळवाडीचे नाव येराळवाडी करून तालुक्यात राळ तर उठवलीच आहे. मात्र, पत्रकातील लागू कलम प्रसिद्ध करून तेथील लोकांना भयभीत केले आहे. वास्तविक मुंबई येथील बैठकीत सद्य:स्थितीतील वास्तव पाहणी करून व तेथील ग्रामस्थांशी चर्चा विनिमय करूनच संबंधित विभागाकडे अहवाल सादर केल्यानंतर पुढील मार्ग सुकर करण्यासाठी हालचाली होणार असल्याचे संकेत असताना वनविभागाच्या या पत्रक गडबडीने नेमके काय साध्य केले हे येणारा काळच निश्चित करेल.

फोटो :

येरळवाडीसंदर्भात वनविभागाने अशा पद्धतीने चुकीचे पत्रक काढून संभ्रमावस्था निर्माण केली आहे. (छाया : शेखर जाधव )