शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

जरंडेश्‍वर डोंगराच्या पायथ्याशी रानगव्यांचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:44 IST

कोरेगाव : जरंडेश्‍वर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पाडळी, जळगाव, भाकरवाडी व ल्हासुर्णे परिसरात गेल्या दोन दिवसांपासून रानगव्यांचे दर्शन होत ...

कोरेगाव : जरंडेश्‍वर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पाडळी, जळगाव, भाकरवाडी व ल्हासुर्णे परिसरात गेल्या दोन दिवसांपासून रानगव्यांचे दर्शन होत आहे. यामुळे शेतमजूर शेतीचे काम करण्यासाठी शेतात जाण्यास धजावत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

कायम दुष्काळी हे बिरुद अंगावर घेऊन अनेक वर्षे पाणीटंचाईशी सामना करणार्‍या कोरेगाव तालुक्यात जलसंधारणाचे काम मोठ्या प्रमाणावर झाले आहे. डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या गावांमध्ये जलसंधारणामुळे पाण्याचे मोठे साठे तयार झाले असून, हिरवळदेखील वाढली आहे. तालुका टँकरमुक्त झाला असून, वनक्षेत्रामध्ये वृक्षारोपण झाल्याने वनक्षेत्रातही वाढ झाली आहे.

एरव्ही पाचगणी-महाबळेश्‍वरच्या पट्ट्यात दिसणारे रानगवे आता कोरेगाव तालुक्यात दर्शन देऊ लागल्याने भीतीचे वातावरण आहे. ल्हासुर्णेमध्ये शनिवारी रात्री रानगव्यांचा कळप फिरत होता, सोमवारी सकाळी जळगावमध्ये जरंडेश्‍वर डोंगराच्या पायथ्याशी हा कळप दिसला. रानगव्यांचा कळप फिरत असल्याची बातमी समजताच, अनेकांनी शेताकडे न जाण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी जर जात नसतील, तर आम्ही कसे जाणार, असा प्रश्न शेतमजूर विचारत आहेत.

(चौकट)

वन विभागाने वाढवली गस्त

अन्नाच्या शोधार्थ हे रानगवे तालुक्यात आल्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली. शेतकर्‍यांच्या याविषयी तक्रारी आल्या असून, वन विभागाने गस्त वाढवल्याचे सांगण्यात आले.

फोटो : १२ कोरेगाव फोटो

जळगाव (ता. कोरेगाव) येथे जरंडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी रानगव्यांचा कळप नजरेस पडत आहे.