शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

जरंडेश्‍वर डोंगराच्या पायथ्याशी रानगव्यांचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:44 IST

कोरेगाव : जरंडेश्‍वर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पाडळी, जळगाव, भाकरवाडी व ल्हासुर्णे परिसरात गेल्या दोन दिवसांपासून रानगव्यांचे दर्शन होत ...

कोरेगाव : जरंडेश्‍वर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पाडळी, जळगाव, भाकरवाडी व ल्हासुर्णे परिसरात गेल्या दोन दिवसांपासून रानगव्यांचे दर्शन होत आहे. यामुळे शेतमजूर शेतीचे काम करण्यासाठी शेतात जाण्यास धजावत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

कायम दुष्काळी हे बिरुद अंगावर घेऊन अनेक वर्षे पाणीटंचाईशी सामना करणार्‍या कोरेगाव तालुक्यात जलसंधारणाचे काम मोठ्या प्रमाणावर झाले आहे. डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या गावांमध्ये जलसंधारणामुळे पाण्याचे मोठे साठे तयार झाले असून, हिरवळदेखील वाढली आहे. तालुका टँकरमुक्त झाला असून, वनक्षेत्रामध्ये वृक्षारोपण झाल्याने वनक्षेत्रातही वाढ झाली आहे.

एरव्ही पाचगणी-महाबळेश्‍वरच्या पट्ट्यात दिसणारे रानगवे आता कोरेगाव तालुक्यात दर्शन देऊ लागल्याने भीतीचे वातावरण आहे. ल्हासुर्णेमध्ये शनिवारी रात्री रानगव्यांचा कळप फिरत होता, सोमवारी सकाळी जळगावमध्ये जरंडेश्‍वर डोंगराच्या पायथ्याशी हा कळप दिसला. रानगव्यांचा कळप फिरत असल्याची बातमी समजताच, अनेकांनी शेताकडे न जाण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी जर जात नसतील, तर आम्ही कसे जाणार, असा प्रश्न शेतमजूर विचारत आहेत.

(चौकट)

वन विभागाने वाढवली गस्त

अन्नाच्या शोधार्थ हे रानगवे तालुक्यात आल्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली. शेतकर्‍यांच्या याविषयी तक्रारी आल्या असून, वन विभागाने गस्त वाढवल्याचे सांगण्यात आले.

फोटो : १२ कोरेगाव फोटो

जळगाव (ता. कोरेगाव) येथे जरंडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी रानगव्यांचा कळप नजरेस पडत आहे.