शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

एका दाखल्यासाठी पाच खिडक्यांना प्रदक्षिणा

By admin | Updated: June 19, 2015 00:18 IST

तहसील कार्यालयातील स्थिती : चिरीमिरी देणाऱ्यांना मागील दारातून प्रवेश; वेळ वाचविण्यासाठी पालकही मारताहेत ‘शॉर्टकट’

जावेद खान - सातारा -शाळा तसेच महाविद्यालये सुरू झाल्याने प्रवेशासाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठी येथील तहसील कार्यालयाच्या सेतू केंद्रात प्रचंड गर्दी होत आहे. एका दाखल्यासाठी किमान पाच खिडक्यांकडे कागदपत्रे पाठवावी लागत असल्याने दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थी व पाल्यांचा तासन्तास वेळ वाया जात आहे. तहसील कार्यालयात दाखला कमी वेळेत मिळविण्यासाठी ओळखी अन् चिरीमिरी देखील सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या शाळा, महाविद्यालयात प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी जातीचा दाखला, उत्पन्न, नॉन क्रिमिनल आदी दाखल्यांची पूर्तता करावी लागत आहे. त्यामुळे तहसील कार्यायालच्या एकात्मिक नागरी सुविधा केंद्र म्हणजेच सेतू कार्यालयात विद्यार्थी व पालकांची प्रचंड गर्दी होत आहे. दररोज जवळ पास पाचशेहून अधिक नागरिक दाखल्यासाठी अर्ज करीत आहे. परंतु हे दाखले मिळविण्यासाठी नागरिकांच्या नाकीनऊ येत आहे.दाखले मिळविण्यासाठी येथील पाच खिडक्यांना कागदपत्रे फिरवली जात असून, अर्जांची संख्या पाहता या कार्यालयाच्या खिडक्यांची संख्या मात्र अत्यल्प आहे. त्यामुळे दाखले वेळेत मिळविण्यासाठी पालकांची धडपड नजरेस पडत आहे. अर्ज घेण्यापासून प्रतिज्ञा पत्र देईपर्यंत प्रत्येक खिडकीत तासन्तास जात असल्याने दाखल्यासाठी किमान दोन-तीन दिवस हेलपाटे मारावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. यावर पर्याय म्हणून शासनाने किमान जून महिन्यात तरी खिडक्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे. दरम्यान, कमी वेळेत दाखले मिळावेत म्हणून अनेकांची धडपड सुरू आहे. यासाठी सेतू कार्यालयाच्या प्रवेशदारातून अर्ज घेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. खास करून येथील काही मुद्रांक विक्रेते या कार्यालयात दारातून आत प्रवेश करून कामाचा निपटारा करताना दिसत आहे. या कामासाठी संबंधितांकडून अधिक पैसेही घेतले जात आहे. अशा पद्धतीनेही दाखले मिळाले असल्याचे काही विद्यार्थी व पालकांनी सांगितले. एकाच रांगेत पाच-पाच व्यक्तीवेळ अन् पैसा वाचविण्यासाठी काहीनी अनोखी शक्कल लढविली आहे. दाखल्यासाठी एकाच वेळी पाच खिडक्यांवर पाच व्यक्ती नंबर लावतात व एकामागे एक असे करून पाचही खिडक्यांत अर्जाची पूर्तता करतात. त्यामुळे बराचवेळ वाचत असून, अनेकांनी ओळखी-पाळखी करून ही शक्कल लढवित आहेत.निवृत्त तहसीलदारही रांगेतयेथील निवृत्त तहसीलदार प्रमोद पेटकरी हेही दाखल्यासाठी रांगेत होते. पाय दुखत असल्याने त्यांनी नंबर लावून सेतू कार्यालयातील कोपऱ्यात बसले होते. दाखल्यासाठी वाढत असलेली रांगा पाहता जवळपास ५०० हून अधिक जणांचे रोज अर्ज येत असल्यामुळे शासनाने आणखीन खिडक्या वाढवाव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.सध्या विविध कामांसाठी दाखला आवश्यक आहे. त्यामुळे सेतू कार्यालयात प्रचंड गर्दी होत आहे. या सर्वांनाच दाखले मिळतील, असे नाही. शेवटी असणाऱ्याला दाखला मिळविण्यासाठी दुसऱ्या दिवशी हेलपाटा बसतोच.- नितीन कारंडे, विद्यार्थी