शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

पाच वडांचं गाव.. पाचवड त्याचं नाव!--नावामागची कहाणी-नऊ

By admin | Updated: March 17, 2015 00:09 IST

अध्यात्मिक परंपरा : भक्कम तटबंदी अन् दगडी घाटांचं देखणं वैभव

राहुल तांबोळी -भुर्इंज पुणे-बंगळूर महामार्गावर कृष्णा नदीकाठी वसलेलं टुमदार पाचवड काळाच्या ओघात मोठ्या बाजारपेठेचं गाव झालं आहे. महामार्गावर दिसत असलेलं पाचवड खरं तर या गावाची बाजारपेठ असून या गावाचं देखणेपण महामार्गापासून काही आतमध्ये नदीकाठी आहे. या नदीच्या काठी पूर्वी असणाऱ्या पाच भल्याथोरल्या वडांच्या झाडांमुळे या गावाला पाचवड हे नाव मिळालं. पाचवड गावाला मोठी अध्यात्मिक परंपरा आहे. ते या गावात प्रवेश करताच जाणवतं. कृष्णा नदीकाठी असणारे भव्य आणि देखणे दगडी घाट या गावाचं वैभव आहे. या परिसरातच पाच वडांची झाडं होती. काळाच्या ओघात काही झाडं नष्ट झाली असली तरी त्या झाडांचे रेखीव दगडातील पार त्या झाडांच्या अस्तित्वाची साक्ष देत आहेत.घाटासोबत या गावाला असणारी तटबंदी या गावाचे वेगळेपण दाखवून देते. विशेष म्हणजे या तटबंदीचे आणि तिच्या दरवाजांचे अवशेष अजूनही अस्तित्वात आहेत. आणखीण वैशिष्ट्य म्हणजे गावातील रस्ते पूर्वीच्या काळात मजबूत दगडांच्या साह्याने तयार करण्यात आले होते. आता त्याचे डांबरीकरण केले असले तरी काही ठिकाणी अजूनही मूळ अवशेष दिसून येतात. या गावाची पूर्वीच्या काळातील सांडपाणी व्यवस्थाही किती मजबूत होती हे अजूनही दिसून येते. महामार्ग झाल्यानंतर पाचवड गावाची बाजारपेठ गावापासून काही अंतरावर महामार्गालगत स्थिरावली. वाई, जावळी आणि सातारा तालुक्याचे तीनही रस्ते या ठिकाणी एकत्रित येत असल्याने या बाजारपेठेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.दीड शतकी महोत्सवाची परंपरापाचवड गावाला उज्ज्वल अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. येथे साजरा होणारा कज्जलेश्वर उत्सव यंदा तब्बल १५३ वर्षे पूर्ण करत आहे. या उत्सवात धार्मिक कार्यक्रमासोबत राष्ट्रीय, आंतररष्ट्रीय पातळीवरील ख्यातनाम गायकांचे गायन, व्याख्यान, विविध स्पर्धा असे कार्यक्रम होत असतात. एखाद्या छोट्या गावात सलग १५३ वर्षे चालणारा असा हा आगळावेगळा महोत्सव हे पाचवड गावचे वैशिष्ट्य आहे. - वैशाली भट गावाला उज्ज्वल वारसासरदार नातू यांना हे गाव इनाम मिळाले होते. त्या काळात या गावात त्यांचे पाच वाडेही होते. सरदार नातूंनीच हे गाव वसवले. येथे बांधण्यात आलेले घाट, मंदिरे, तटबंदी, धर्मशाळा, फारसे कुठे न दिसणारे दगडी रस्ते अशा अनेक कामांत सरदार नातूंचे योगदान आहे. या आगळ््या वेगळ्या योगदानातून या गावाला उज्वला वारसा लाभला असून नंतरच्या काळात ग्रामस्थांनी तो वाढवला. - वसंतराव शेंडे