शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

पाच वडांचं गाव.. पाचवड त्याचं नाव!--नावामागची कहाणी-नऊ

By admin | Updated: March 17, 2015 00:09 IST

अध्यात्मिक परंपरा : भक्कम तटबंदी अन् दगडी घाटांचं देखणं वैभव

राहुल तांबोळी -भुर्इंज पुणे-बंगळूर महामार्गावर कृष्णा नदीकाठी वसलेलं टुमदार पाचवड काळाच्या ओघात मोठ्या बाजारपेठेचं गाव झालं आहे. महामार्गावर दिसत असलेलं पाचवड खरं तर या गावाची बाजारपेठ असून या गावाचं देखणेपण महामार्गापासून काही आतमध्ये नदीकाठी आहे. या नदीच्या काठी पूर्वी असणाऱ्या पाच भल्याथोरल्या वडांच्या झाडांमुळे या गावाला पाचवड हे नाव मिळालं. पाचवड गावाला मोठी अध्यात्मिक परंपरा आहे. ते या गावात प्रवेश करताच जाणवतं. कृष्णा नदीकाठी असणारे भव्य आणि देखणे दगडी घाट या गावाचं वैभव आहे. या परिसरातच पाच वडांची झाडं होती. काळाच्या ओघात काही झाडं नष्ट झाली असली तरी त्या झाडांचे रेखीव दगडातील पार त्या झाडांच्या अस्तित्वाची साक्ष देत आहेत.घाटासोबत या गावाला असणारी तटबंदी या गावाचे वेगळेपण दाखवून देते. विशेष म्हणजे या तटबंदीचे आणि तिच्या दरवाजांचे अवशेष अजूनही अस्तित्वात आहेत. आणखीण वैशिष्ट्य म्हणजे गावातील रस्ते पूर्वीच्या काळात मजबूत दगडांच्या साह्याने तयार करण्यात आले होते. आता त्याचे डांबरीकरण केले असले तरी काही ठिकाणी अजूनही मूळ अवशेष दिसून येतात. या गावाची पूर्वीच्या काळातील सांडपाणी व्यवस्थाही किती मजबूत होती हे अजूनही दिसून येते. महामार्ग झाल्यानंतर पाचवड गावाची बाजारपेठ गावापासून काही अंतरावर महामार्गालगत स्थिरावली. वाई, जावळी आणि सातारा तालुक्याचे तीनही रस्ते या ठिकाणी एकत्रित येत असल्याने या बाजारपेठेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.दीड शतकी महोत्सवाची परंपरापाचवड गावाला उज्ज्वल अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. येथे साजरा होणारा कज्जलेश्वर उत्सव यंदा तब्बल १५३ वर्षे पूर्ण करत आहे. या उत्सवात धार्मिक कार्यक्रमासोबत राष्ट्रीय, आंतररष्ट्रीय पातळीवरील ख्यातनाम गायकांचे गायन, व्याख्यान, विविध स्पर्धा असे कार्यक्रम होत असतात. एखाद्या छोट्या गावात सलग १५३ वर्षे चालणारा असा हा आगळावेगळा महोत्सव हे पाचवड गावचे वैशिष्ट्य आहे. - वैशाली भट गावाला उज्ज्वल वारसासरदार नातू यांना हे गाव इनाम मिळाले होते. त्या काळात या गावात त्यांचे पाच वाडेही होते. सरदार नातूंनीच हे गाव वसवले. येथे बांधण्यात आलेले घाट, मंदिरे, तटबंदी, धर्मशाळा, फारसे कुठे न दिसणारे दगडी रस्ते अशा अनेक कामांत सरदार नातूंचे योगदान आहे. या आगळ््या वेगळ्या योगदानातून या गावाला उज्वला वारसा लाभला असून नंतरच्या काळात ग्रामस्थांनी तो वाढवला. - वसंतराव शेंडे