शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
5
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
6
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
7
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
8
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
9
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
11
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
12
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
13
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
14
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
15
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
16
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
17
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
18
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
19
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
20
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली

पाच वडांचं गाव.. पाचवड त्याचं नाव!--नावामागची कहाणी-नऊ

By admin | Updated: March 17, 2015 00:09 IST

अध्यात्मिक परंपरा : भक्कम तटबंदी अन् दगडी घाटांचं देखणं वैभव

राहुल तांबोळी -भुर्इंज पुणे-बंगळूर महामार्गावर कृष्णा नदीकाठी वसलेलं टुमदार पाचवड काळाच्या ओघात मोठ्या बाजारपेठेचं गाव झालं आहे. महामार्गावर दिसत असलेलं पाचवड खरं तर या गावाची बाजारपेठ असून या गावाचं देखणेपण महामार्गापासून काही आतमध्ये नदीकाठी आहे. या नदीच्या काठी पूर्वी असणाऱ्या पाच भल्याथोरल्या वडांच्या झाडांमुळे या गावाला पाचवड हे नाव मिळालं. पाचवड गावाला मोठी अध्यात्मिक परंपरा आहे. ते या गावात प्रवेश करताच जाणवतं. कृष्णा नदीकाठी असणारे भव्य आणि देखणे दगडी घाट या गावाचं वैभव आहे. या परिसरातच पाच वडांची झाडं होती. काळाच्या ओघात काही झाडं नष्ट झाली असली तरी त्या झाडांचे रेखीव दगडातील पार त्या झाडांच्या अस्तित्वाची साक्ष देत आहेत.घाटासोबत या गावाला असणारी तटबंदी या गावाचे वेगळेपण दाखवून देते. विशेष म्हणजे या तटबंदीचे आणि तिच्या दरवाजांचे अवशेष अजूनही अस्तित्वात आहेत. आणखीण वैशिष्ट्य म्हणजे गावातील रस्ते पूर्वीच्या काळात मजबूत दगडांच्या साह्याने तयार करण्यात आले होते. आता त्याचे डांबरीकरण केले असले तरी काही ठिकाणी अजूनही मूळ अवशेष दिसून येतात. या गावाची पूर्वीच्या काळातील सांडपाणी व्यवस्थाही किती मजबूत होती हे अजूनही दिसून येते. महामार्ग झाल्यानंतर पाचवड गावाची बाजारपेठ गावापासून काही अंतरावर महामार्गालगत स्थिरावली. वाई, जावळी आणि सातारा तालुक्याचे तीनही रस्ते या ठिकाणी एकत्रित येत असल्याने या बाजारपेठेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.दीड शतकी महोत्सवाची परंपरापाचवड गावाला उज्ज्वल अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. येथे साजरा होणारा कज्जलेश्वर उत्सव यंदा तब्बल १५३ वर्षे पूर्ण करत आहे. या उत्सवात धार्मिक कार्यक्रमासोबत राष्ट्रीय, आंतररष्ट्रीय पातळीवरील ख्यातनाम गायकांचे गायन, व्याख्यान, विविध स्पर्धा असे कार्यक्रम होत असतात. एखाद्या छोट्या गावात सलग १५३ वर्षे चालणारा असा हा आगळावेगळा महोत्सव हे पाचवड गावचे वैशिष्ट्य आहे. - वैशाली भट गावाला उज्ज्वल वारसासरदार नातू यांना हे गाव इनाम मिळाले होते. त्या काळात या गावात त्यांचे पाच वाडेही होते. सरदार नातूंनीच हे गाव वसवले. येथे बांधण्यात आलेले घाट, मंदिरे, तटबंदी, धर्मशाळा, फारसे कुठे न दिसणारे दगडी रस्ते अशा अनेक कामांत सरदार नातूंचे योगदान आहे. या आगळ््या वेगळ्या योगदानातून या गावाला उज्वला वारसा लाभला असून नंतरच्या काळात ग्रामस्थांनी तो वाढवला. - वसंतराव शेंडे