शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रुग्णालयातील पाच जागा दोन वर्षे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:41 IST

महाबळेश्वर : येथील ग्रामीण रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिका अशा पाच जागा दोन वर्षे रिक्त आहेत. त्यामुळे ...

महाबळेश्वर : येथील ग्रामीण रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिका अशा पाच जागा दोन वर्षे रिक्त आहेत. त्यामुळे महाबळेश्वरच्या नागरिकांची आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर आहे.

पालकमंत्री व गृहराज्यमंत्री जिल्हाभर फिरत आहेत परंतु महाबळेश्वरकडे त्यांचे अद्याप लक्ष गेले नाही. त्यामुळे शहरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी येथे ग्रामीण रुग्णालय आहे. या रुग्णालयातील आरोग्य सेवेचे बारा वाजले होते म्हणून दोन वर्षांपूर्वी ग्रामीण रुग्णालय काही अटी आणि शर्थींवर रेडक्राॅस संचलित बेल एअरकडे हस्तांतरीत केले. रुग्णालय ताब्यात घेताना संस्थेने अनेक अटी मान्य केल्या; परंतु त्यानंतर विसर पडला. रुग्णालयात आलेल्या रुग्णांवर उपचाराबरोबर राज्य व केंद्र सरकारच्या सर्व आरोग्य योजनांची अंमलबजावणी करण्याचे संस्थेने मान्य केले होते. घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करणे, कोणत्या घरातील व्यक्तीला कोणता रोग आहे याची नोंद करणे

माता संगोपन, कुपोषण, रोग निमुर्लन, लसीकरण, आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याची जबाबदारी ग्रामीण रुग्णालयाची आहे; परंतु सर्व उपक्रम ग्रामीण रुग्णालयाने गुंडाळून ठेवले आहेत. ज्यांना आरोग्य सुविधा हवी त्यांनी रुग्णालयात यावे, आम्ही घरी येणार नाही, असा पवित्रा ग्रामीण रुग्णालय चालविण्यासाठी घेतलेल्या बेल एअर या संस्थेने घेतल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने राबविण्यात येणारे हे उपक्रम कोण राबविणार, असा प्रश्न आहे.

सध्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. कोरोनाबाधितांना तालुक्यात कुठेच बेड उपलब्ध नाही. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर उपलब्ध नाही, अशी स्थिती आहे. अशावेळी बाहेरगावी रुग्ण पाठविताना ग्रामीण रुग्णालयाचे पत्र लागते. तेही वेळेवर मिळत नसल्याने रुग्ण व नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मंगळवारी एका ७६ वर्षीय महिला रुग्णाची उपचारांअभावी हेळसांड झाली. उशिरा का होईना वृद्धेला रुग्णवाहिकेमधील ऑक्सिजन देण्यात आल्याने रुग्णाचा जीव वाचला.

ग्रामीण रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकारी व तीन नर्स यांच्या जागा रिक्त असल्याने आम्ही शहरात काम करू शकत नाही, असा खुलासा बेल एअरच्या फादर टाॅमी यांनी केला; परंतु आम्ही ग्रामीण भागात सार्वजनिक आरोग्य विभागाचे सर्व उपक्रम चांगल्या प्रकारे राबवत आहे, असा दावाही फादर टाॅमी यांनी केला आहे. रिक्त जागांसंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांशी वारंवार चर्चा झाली आहे. पत्रव्यवहारही केला आहे. परंतु कोणी गांभीर्याने पाहत नाही, असेही फादर टाॅमी यांनी सांगितले.

चौकट

मंत्री खासगी दौऱ्यावर

पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई तालुकास्तरावर अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सर्वत्र कारोनाची स्थितीचा आढावा घेत आहेत. बैठकावर बैठका घेऊन दमल्यानंतर केवळ विश्रांतीसाठी महाबळेश्वरला येतात. येथे आल्यानंतर पत्रकारांनी विचारले तर ते खासगी दौऱ्यावर आहेत एवढेच सांगितले जाते.