शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
3
कोण आहे बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
4
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
5
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
6
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
7
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
8
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता
9
हिरो डॉग! मालकाला वाचवण्यासाठी जळते डायनामाइट तोंडात धरले अन्..; Video पाहून भावूक झाले लोक
10
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
11
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
12
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
13
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
14
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
15
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
16
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
17
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
18
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
19
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
20
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट

ओढ्यातून काढला पाचशे ट्रॉली गाळ!

By admin | Updated: September 11, 2016 23:46 IST

कात्रेश्वर मंडळाचा उपक्रम : कातरखटावमधील दुष्काळ हटविण्यासाठी एक पाऊल पुढे

कातरखटाव : ‘केल्याने होत आहे, आधी केलेची पाहिजे’ या प्रमाणे कातरखटाव येथील कात्रेश्वर मंडळाने ‘एक गाव, एक गणपती,’ उपक्रम राबवत गावाला उन्हाळ्यात भेडसावणारा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मंडळाने जेसीबी, ट्रॅक्टरच्या साह्याने ओढ्यातील पाचशे ट्रॉली गाळ काढला. कात्रेश्वर मंडळाने राबविलेल्या उपक्रमामुळे बंधाऱ्यात जादा पाणीसाठा होण्यास मदत होणार आहे. पाच दिवस जेसीबी आणि चार ट्रॅक्टरच्या मदतीने चाललेल्या कामात चारशे ते पाचशे खेपा गाळ उचलला आहे. हा गाळ गरजू शेतक ऱ्यांच्या रानात टाकला आहे. गणेशोत्सवातील वीस हजार मंडळाने सामाजिक बांधिलकी म्हणून वापरला आहे. १९८३ पासून गेली ३३ वर्ष झाली हे मंडळ सामाजिक बांधिलकीसह नवनवीन उपक्रम राबवत आहे. खर्चाला फाटा देत उन्हाळ्यातला पाणी प्रश्न लक्षात घेता ओढ्यातील गाळ काढणे, गरजू रुग्णांना मदत करणे, प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, स्लो सायकल स्पर्धा घेतल्या जातात. वह्या-पुस्तकांचे वाटप केले जाते. कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून कात्रेश्वर बेंगलोर ग्रुप, कात्रेश्वर मुंबई ग्रुप या दोन शाखा निर्माण केले आहेत. (वार्ताहर) डॉल्बीमुक्तीसाठी जनजागृती... कातरखटावसह परिसरातील मंडळांनी ‘डॉल्बीमुक्त मंडळ’ करून एक आदर्श निर्माण करणे गरजेचे आहे. अन्य मंडळे कर्कश आवाजात गाणी लावून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आवाज वाढवून टाहो फोडताना दिसत आहेत. त्यामुळे भागातील मंडळांनी आदर्श निर्माण करण्याची गरज आहे. कात्रेश्वर मंडळाचा इतरांनी आदर्श घेतल्यास खऱ्या अर्थाने क्रांती घडणार आहे. शैक्षणिक साहित्य... या गणेशोत्सवात आम्ही मंडळाच्या वतीने हायस्कूलच्या मुला-मुलीनां शैक्षणिक साहित्याचे वाटप करणार आहोत. मंडळातर्फे सामाजिक बांधिलकी म्हणून लोकसहभागातून जमणाऱ्या निधीतून चांगले उपक्रम राबविले जातील. - विक्रम बागल, अध्यक्ष, कात्रेश्वर मंडळ