शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

पहिली उचल जाहीर करावी

By admin | Updated: November 3, 2016 23:52 IST

अन्यथा गनिमी कावा : बळीराजा संघटनेचा आंदोलनाचा इशारा

 सातारा : ‘सरकारने ५ नोव्हेंबरपासून साखर कारखान्यांना कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. उसाची उपलब्धता आणि साखरेचे दर पाहता कारखाना सुरू होण्यापूर्वी कारखानदारांनी उसाला प्रतिटन एक रकमी ३५०० रुपये दर द्यावा तसेच मागील बिलापोटी ५०० रुपये द्यावेत अन्यथा गनिमी काव्याने आंदोलन करणार आहे,’ असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी पंजाबराव पाटील म्हणाले, ‘सर्वत्र दिवाळी झाली असली तरी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या घरी मात्र दिवाळी झाली नाही. गेल्या काही वर्षांपासून दिवाळीच्या तोंडावर कारखानदारांकडून ऊस बिलापोटी हप्ता देण्यात येत असे; परंतु यावर्षी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि शेतकऱ्यांचा कळवळा असे म्हणणारे सरकारमध्ये सामील झाल्याने कारखानदारांनी यावर्षी दिवाळीपूर्वी हप्ता दिलेला नाही. यावर्षी ऊस कमी असून, गाळप करण्यासाठी कारखानदारांमध्ये चढाओढ सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जागृत आणि एकत्र येऊन जोपर्यंत प्रतिटन ३५०० रुपये एक रकमी आणि मागील बिलापोटी ५०० रुपये प्रतिटन देत नाही, तोपर्यंत उसाला तोड देऊ नये. गेल्यावर्षी साखरेचे दर कमी असल्याचे सांगत दर कमी देण्यात आला. परंतु यावर्षी साखरेला दर असून, केंद्र सरकारने निर्यात बंदी उठवली तर आणखी साखरेचा दर वाढणार आहे. गुऱ्हाळामध्ये उसाला २८०० रुपये प्रतिटन रोख दर मिळत असून, कारखानदार तर उपपदार्थापासूनही पैसा मिळवतात त्यामुळे ३५०० रुपये दर देण्यास काही अडचण नाही. (प्रतिनिधी) ..तर फिरू देणार नाही.! जर कारखानदारांनी दर जाहीर केला नाही तर कारखानदारांचे अध्यक्ष आणि मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही त्याचप्रमाणे गनिमी काव्याने आंदोलन करण्यात येईल.’ याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना देण्यात आले आहे.