शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पहिली उचल जाहीर करावी

By admin | Updated: November 3, 2016 23:52 IST

अन्यथा गनिमी कावा : बळीराजा संघटनेचा आंदोलनाचा इशारा

 सातारा : ‘सरकारने ५ नोव्हेंबरपासून साखर कारखान्यांना कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. उसाची उपलब्धता आणि साखरेचे दर पाहता कारखाना सुरू होण्यापूर्वी कारखानदारांनी उसाला प्रतिटन एक रकमी ३५०० रुपये दर द्यावा तसेच मागील बिलापोटी ५०० रुपये द्यावेत अन्यथा गनिमी काव्याने आंदोलन करणार आहे,’ असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी पंजाबराव पाटील म्हणाले, ‘सर्वत्र दिवाळी झाली असली तरी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या घरी मात्र दिवाळी झाली नाही. गेल्या काही वर्षांपासून दिवाळीच्या तोंडावर कारखानदारांकडून ऊस बिलापोटी हप्ता देण्यात येत असे; परंतु यावर्षी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि शेतकऱ्यांचा कळवळा असे म्हणणारे सरकारमध्ये सामील झाल्याने कारखानदारांनी यावर्षी दिवाळीपूर्वी हप्ता दिलेला नाही. यावर्षी ऊस कमी असून, गाळप करण्यासाठी कारखानदारांमध्ये चढाओढ सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जागृत आणि एकत्र येऊन जोपर्यंत प्रतिटन ३५०० रुपये एक रकमी आणि मागील बिलापोटी ५०० रुपये प्रतिटन देत नाही, तोपर्यंत उसाला तोड देऊ नये. गेल्यावर्षी साखरेचे दर कमी असल्याचे सांगत दर कमी देण्यात आला. परंतु यावर्षी साखरेला दर असून, केंद्र सरकारने निर्यात बंदी उठवली तर आणखी साखरेचा दर वाढणार आहे. गुऱ्हाळामध्ये उसाला २८०० रुपये प्रतिटन रोख दर मिळत असून, कारखानदार तर उपपदार्थापासूनही पैसा मिळवतात त्यामुळे ३५०० रुपये दर देण्यास काही अडचण नाही. (प्रतिनिधी) ..तर फिरू देणार नाही.! जर कारखानदारांनी दर जाहीर केला नाही तर कारखानदारांचे अध्यक्ष आणि मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही त्याचप्रमाणे गनिमी काव्याने आंदोलन करण्यात येईल.’ याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना देण्यात आले आहे.