शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

ाहिल्याच सभेत खरे-खोट्याचे नाट्य

By admin | Updated: February 27, 2017 23:29 IST

कऱ्हाड पालिका सभा : अन्यायकारक करवसुली व निर्णयावरून खडाजंगी; ४० पैकी ३८ विषयांना मंजुरी

कऱ्हाड : ‘अनेक महिन्यांपासून मुख्याधिकारी औंधकर यांनी एका आदेशावरून भोगवटधारकांना असेसमेन्टचे उतारे देणे बंद केले आहे. त्यामुळे व्यापारी व घरमालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या निर्णयाबाबत त्यांच्याकडून समाधानकारक खुलासाही केला जात नाही. मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी व कारभारामुळे नागरिकांची गैरसोय होत आहेच परंतु पालिकेचेही नुकसान होत आहे. त्यांच्याकडून केला जात असलेला अन्याय खपवून घेतला जाणार नाही,’ अशी टीका नगरसेवक विनायक पावसकर व उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी केली.कऱ्हाड नगरपालिका सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रोहिणी शिंंदे होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील व मुख्याधिकारी विनायक औंधकर उपस्थित होते. नगरपालिकेच्या नवीन सभागृहात पहिल्याच सभेत मुख्याधिकारी यांच्या कामकाजावर नगरसेवकांकडून जोरदार टीकाटिप्पणी करण्यात आली. सत्ताधारी तसेच विरोधी नगरसेवकांनी मुख्याधिकारी औंधकर यांच्या कामकाजावर आक्षेप घेतले.सभेच्या सुरुवातीस विनायक पावसकर यांनी भोगवटदारांना नगरपालिकेकडून असेसमेन्टचे उतारे देणे बंद केल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी पावसकर म्हणाले, ‘मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत काढलेल्या कार्यालयीन आदेशामुळे नागरिकांना आवश्यक परवाने तसेच कर्ज प्रकरणे करण्यासाठी इतर दाखले मिळणे अडचणीत आले आहेत. शहरातील सत्तर टक्के नागरिकांना यावर्षी शॉप्ट परवाने मिळालेले नाहीत. त्यामुळे पालिकेचेही नुकसान होत आहे. याबाबत विचारणा करूनही याबाबत खुलासा केला जात नाही. मुख्याधिकाऱ्यांनी कोणत्या कायद्यानुसार भोगवटधारकांची नावे असेसमेन्ट उताराऱ्यावरून नावे काढून टाकली आहेत.’ याबाबत मुख्याधिकारी यांनी खुलासा करावा, अशी मागणी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, सौरभ पाटील, हणमंत पवार, विजय वाटेगावकर यांनी मागणी केली. याबाबत स्पष्टीकरण देताना मुख्याधिकारी औंधकर यांनी सांगितले ‘रजिस्टर परवानाधारक किंवा कोर्टकेस, संदर्भात कागदपत्रे सादर केल्यास संबंधित भोगवटधारकाला असेसमेन्ट उतारा दिला जात आहे. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या खुलाशावर संबंधित नगरसेवकांचे समाधान झाले नाही. अखेर मुख्याधिकारी यांनी कोणत्या कारणावरून भोगवटधारकांची नावे वगळण्यात आली आहेत. याची माहिती सात दिवसांच्या आत नगराध्यक्षांकडे सादर करण्याचे आश्वासन दिले.’ सभेत ४० पैकी ३८ विषयांना मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)