शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
4
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
5
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
6
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
7
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
8
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
9
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
10
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
11
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
12
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
13
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
14
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
15
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
16
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
17
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
18
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
19
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
20
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर

‘लव्ह जिहाद’ ही काल्पनिक कथा

By admin | Updated: June 1, 2016 00:59 IST

इसाक सवार : कऱ्हाडात बेकायदेशीर मोर्चा काढणाऱ्या आंदोलकांची चौकशी करा

 कऱ्हाड : ‘लव्ह जिहाद म्हणजे काल्पनिक कथा आहे. असे असताना काहींनी ‘लव्ह जिहाद’विरोधी मोर्चा काढला. त्यात विशिष्ट समाजाला टार्गेट करून बदनाम करण्यात आले. धर्मगुरुंवरही चुकीचे आरोप केले. याबाबात आंदोलकांनी माफी मागावी,’ असे आवाहन माजी नगरसेवक इसाक सवार यांनी केले.येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बशीर कारभारी, हाजी कच्छी, हरुण मणेर, माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार, इरफान सय्यद आदी उपस्थीत होते. सवार म्हणाले, ‘प्रेम विवाह किंवा आंतरजातीय विवाह हा दोन व्यक्ती व दोन कुंटुबांचा प्रश्न आहे. त्यात समाजाला ओढण्याचा केवीलवाणा प्रकार होत आहे. शनिवारी काढलेल्या मोर्चातून विशिष्ट समाजाला टार्गेट करून केलेले आरोप अत्यंत वाईट आहेत. मुलींची छेडछाड करणारा तरुण फक्त ठराविक समाजातच असतो असे नाही. आंतरजातीय विवाह हा सगळ्याच समाजाला भेडसवणारा प्रश्न आहे. मात्र आंतरजातीय विवाहाला शासनाने मान्यता व प्रोत्साहनही दिले आहे. त्यामुळे आपण काढलेला मोर्चा संविधानाला धरून आहे, असे वाटत नाही. वास्तविक, ‘लव्ह जिहाद’ हेच खरे काल्पनिक आहे. त्याला कोणताही आधार नाही. मात्र तरीही विनाकारण त्याला घेऊन होणारी चर्चा निराधार आहे.’‘पोलिसांना निवेदन देण्यासाठी जो जमाव जमला होता, तोही बेकायदेशीर होता. त्या सगळ्याचीच सखोल चौकशी करावी. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. आंदोलकांनी दिलेल्या निवेदनानुसार त्यांनी त्यात धर्मगुरुंची बदनामी होईल, अशा शब्दात त्यांचा उल्लेख केला आहे. तो अत्यंत चुकीचा आहे. यापुढे धर्मगुरुंची अशी बदनामी सहन केली जाणार नाही. आम्ही त्याचा निषेध करतो. आमचा निषेध हा केवळ शनिवारी मोर्चावेळी दिलेल्या निवेदनाबाबतच आहे. अन्य कोणत्याही व्यक्ती अथवा धर्माबाबत आमचे काहीही म्हणणे नाही. त्यामुळे धर्मगुरुंबाबत केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी धर्मगुरुंची जाहीर माफी मागावी. सामाजिक तेढ निर्माण करू पाहणाऱ्या शक्तींवर पोलिसांनी कडक कारवाई करावी,’ अशी मागणीही सवार यांनी केली. (प्रतिनिधी)