शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूदर वाढल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:34 IST

वेळे : वाई तालुक्यात रुग्णवाढीच्या प्रमाणात बरे होण्याचे प्रमाणदेखील चांगले आहे. मात्र, रुग्ण मृत पावण्याचे प्रमाण वाढताना आहे. याकडे ...

वेळे : वाई तालुक्यात रुग्णवाढीच्या प्रमाणात बरे होण्याचे प्रमाणदेखील चांगले आहे. मात्र, रुग्ण मृत पावण्याचे प्रमाण वाढताना आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यामुळे भीती वातावरण पसरले आहे.

वाई तालुक्याच्या पूर्वभागात गेल्यावर्षीपेक्षा रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. काही गावांमध्ये हे प्रमाण अर्धशतकाच्या जवळपास आहे तर काही गावे शतकाच्या उंबरठ्यावर आहेत. वेळे, गुळूंब, चांदक, सुरुर, केंजळ, वाहागाव, कवठे इत्यादी गावांमध्ये गेल्यावर्षी घेतलेल्या काळजीने रुग्णसंख्या आटोक्यात होती. यावर्षी याच गावांमध्ये झपाट्याने रुग्ण संख्या वाढत असताना दिसत आहे.

कोरोनाला थोपविण्यासाठी अनेक गावांनी उपाययोजना केल्या. परंतु, लोकांमध्ये असलेल्या नकारात्मक दृष्टिकोनाने याचा फायदा होताना दिसत नाही. होम आयसोलेशनमध्ये असतानाही रुग्ण किंवा त्यांचे कुटुंबीय गावात फिरल्याने त्यांनी सायलेंट स्पेडरची भूमिका निभावली. त्यामुळेच कदाचित याचा संसर्ग वाढत गेला.

या भागातील अनेक रुग्ण कोरोनाने अत्यवस्थ आहेत. काही रुग्ण घरीच इलाज घेत आहेत. अत्यवस्थ असलेल्या काही रुग्णांना रुग्णालयात बेड मिळत नसल्याने त्यांची खूप परवड होत आहे. अशातच रुग्ण दगावण्याची भीतीदेखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणदेखील वाढताना दिसत आहे. काही ठिकाणी कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार गावातच लपूनछपून करत आहेत. मात्र, स्थानिक प्रशासन उदासीन असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येला आवर घालता येत नसल्याचे चित्र पहावयास मिळते.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उपाययोजनांचा अभाव पाहायला मिळतो. अनेकजण नियमांना बगल देत आहेत. तसेच अनेक गावांमधून ग्रामदक्षता समिती अकार्यक्षम असल्याची खात्री होत आहे. स्थानिक प्रशासन उपाययोजना करण्यात अपयशी ठरत आहे. अनेक गावांमधून औषध फवारणी होताना दिसत नाही. मूलभूत उपाय राबविताना स्थानिक प्रशासनाची दमछाक होत असेल तर हे कोरोना कसे थोपवणार? अशी चर्चादेखील सोशल मीडियातून होत आहे.

चौकट

लोकांनी जबाबदारीने वागणे गरजेचे

जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून येथील स्थानिक प्रशासनाला वेळीच सावध करण्याची गरज निर्माण झाली आहे. लोकांनीही वैयक्तिक जबाबदारी ओळखून प्रशासनास सहकार्य केले पाहिजे. तर आणि तरच कोरोनाशी सामना होवू शकतो. अन्यथा रुग्णांचा वाढता आलेख हा सर्वांनाच धोकादायक ठरणार आहे.