शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूदर वाढल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:34 IST

वेळे : वाई तालुक्यात रुग्णवाढीच्या प्रमाणात बरे होण्याचे प्रमाणदेखील चांगले आहे. मात्र, रुग्ण मृत पावण्याचे प्रमाण वाढताना आहे. याकडे ...

वेळे : वाई तालुक्यात रुग्णवाढीच्या प्रमाणात बरे होण्याचे प्रमाणदेखील चांगले आहे. मात्र, रुग्ण मृत पावण्याचे प्रमाण वाढताना आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यामुळे भीती वातावरण पसरले आहे.

वाई तालुक्याच्या पूर्वभागात गेल्यावर्षीपेक्षा रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. काही गावांमध्ये हे प्रमाण अर्धशतकाच्या जवळपास आहे तर काही गावे शतकाच्या उंबरठ्यावर आहेत. वेळे, गुळूंब, चांदक, सुरुर, केंजळ, वाहागाव, कवठे इत्यादी गावांमध्ये गेल्यावर्षी घेतलेल्या काळजीने रुग्णसंख्या आटोक्यात होती. यावर्षी याच गावांमध्ये झपाट्याने रुग्ण संख्या वाढत असताना दिसत आहे.

कोरोनाला थोपविण्यासाठी अनेक गावांनी उपाययोजना केल्या. परंतु, लोकांमध्ये असलेल्या नकारात्मक दृष्टिकोनाने याचा फायदा होताना दिसत नाही. होम आयसोलेशनमध्ये असतानाही रुग्ण किंवा त्यांचे कुटुंबीय गावात फिरल्याने त्यांनी सायलेंट स्पेडरची भूमिका निभावली. त्यामुळेच कदाचित याचा संसर्ग वाढत गेला.

या भागातील अनेक रुग्ण कोरोनाने अत्यवस्थ आहेत. काही रुग्ण घरीच इलाज घेत आहेत. अत्यवस्थ असलेल्या काही रुग्णांना रुग्णालयात बेड मिळत नसल्याने त्यांची खूप परवड होत आहे. अशातच रुग्ण दगावण्याची भीतीदेखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणदेखील वाढताना दिसत आहे. काही ठिकाणी कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार गावातच लपूनछपून करत आहेत. मात्र, स्थानिक प्रशासन उदासीन असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येला आवर घालता येत नसल्याचे चित्र पहावयास मिळते.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उपाययोजनांचा अभाव पाहायला मिळतो. अनेकजण नियमांना बगल देत आहेत. तसेच अनेक गावांमधून ग्रामदक्षता समिती अकार्यक्षम असल्याची खात्री होत आहे. स्थानिक प्रशासन उपाययोजना करण्यात अपयशी ठरत आहे. अनेक गावांमधून औषध फवारणी होताना दिसत नाही. मूलभूत उपाय राबविताना स्थानिक प्रशासनाची दमछाक होत असेल तर हे कोरोना कसे थोपवणार? अशी चर्चादेखील सोशल मीडियातून होत आहे.

चौकट

लोकांनी जबाबदारीने वागणे गरजेचे

जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून येथील स्थानिक प्रशासनाला वेळीच सावध करण्याची गरज निर्माण झाली आहे. लोकांनीही वैयक्तिक जबाबदारी ओळखून प्रशासनास सहकार्य केले पाहिजे. तर आणि तरच कोरोनाशी सामना होवू शकतो. अन्यथा रुग्णांचा वाढता आलेख हा सर्वांनाच धोकादायक ठरणार आहे.