शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

मृत्यूदर वाढल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:34 IST

वेळे : वाई तालुक्यात रुग्णवाढीच्या प्रमाणात बरे होण्याचे प्रमाणदेखील चांगले आहे. मात्र, रुग्ण मृत पावण्याचे प्रमाण वाढताना आहे. याकडे ...

वेळे : वाई तालुक्यात रुग्णवाढीच्या प्रमाणात बरे होण्याचे प्रमाणदेखील चांगले आहे. मात्र, रुग्ण मृत पावण्याचे प्रमाण वाढताना आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यामुळे भीती वातावरण पसरले आहे.

वाई तालुक्याच्या पूर्वभागात गेल्यावर्षीपेक्षा रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. काही गावांमध्ये हे प्रमाण अर्धशतकाच्या जवळपास आहे तर काही गावे शतकाच्या उंबरठ्यावर आहेत. वेळे, गुळूंब, चांदक, सुरुर, केंजळ, वाहागाव, कवठे इत्यादी गावांमध्ये गेल्यावर्षी घेतलेल्या काळजीने रुग्णसंख्या आटोक्यात होती. यावर्षी याच गावांमध्ये झपाट्याने रुग्ण संख्या वाढत असताना दिसत आहे.

कोरोनाला थोपविण्यासाठी अनेक गावांनी उपाययोजना केल्या. परंतु, लोकांमध्ये असलेल्या नकारात्मक दृष्टिकोनाने याचा फायदा होताना दिसत नाही. होम आयसोलेशनमध्ये असतानाही रुग्ण किंवा त्यांचे कुटुंबीय गावात फिरल्याने त्यांनी सायलेंट स्पेडरची भूमिका निभावली. त्यामुळेच कदाचित याचा संसर्ग वाढत गेला.

या भागातील अनेक रुग्ण कोरोनाने अत्यवस्थ आहेत. काही रुग्ण घरीच इलाज घेत आहेत. अत्यवस्थ असलेल्या काही रुग्णांना रुग्णालयात बेड मिळत नसल्याने त्यांची खूप परवड होत आहे. अशातच रुग्ण दगावण्याची भीतीदेखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणदेखील वाढताना दिसत आहे. काही ठिकाणी कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार गावातच लपूनछपून करत आहेत. मात्र, स्थानिक प्रशासन उदासीन असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येला आवर घालता येत नसल्याचे चित्र पहावयास मिळते.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उपाययोजनांचा अभाव पाहायला मिळतो. अनेकजण नियमांना बगल देत आहेत. तसेच अनेक गावांमधून ग्रामदक्षता समिती अकार्यक्षम असल्याची खात्री होत आहे. स्थानिक प्रशासन उपाययोजना करण्यात अपयशी ठरत आहे. अनेक गावांमधून औषध फवारणी होताना दिसत नाही. मूलभूत उपाय राबविताना स्थानिक प्रशासनाची दमछाक होत असेल तर हे कोरोना कसे थोपवणार? अशी चर्चादेखील सोशल मीडियातून होत आहे.

चौकट

लोकांनी जबाबदारीने वागणे गरजेचे

जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून येथील स्थानिक प्रशासनाला वेळीच सावध करण्याची गरज निर्माण झाली आहे. लोकांनीही वैयक्तिक जबाबदारी ओळखून प्रशासनास सहकार्य केले पाहिजे. तर आणि तरच कोरोनाशी सामना होवू शकतो. अन्यथा रुग्णांचा वाढता आलेख हा सर्वांनाच धोकादायक ठरणार आहे.