शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

दराअभावी शेतकऱ्यांना बाजरी लागणार कडू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:38 IST

आदर्की : फलटण तालुका रब्बीचा असला तरी खरीप हंगामात बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते; परंतु गतवर्षी उत्पादनात वाढ ...

आदर्की : फलटण तालुका रब्बीचा असला तरी खरीप हंगामात बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते; परंतु गतवर्षी उत्पादनात वाढ व बाजरीचे निर्यात न झाल्याने बाजरीचा दर कवडीमोलच असल्याने या वर्षी फलटण तालुक्यात बाजरी पेरणी कमी झाली, नवीन बाजरी काढणीस आली तरी बाजरीचे दर जैसे थे असल्याने ग्राहकांना बाजरी गोड तर शेतकऱ्यांचे तोंड कडू होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, खंडाळा, फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागात खरीप हंगामात बाजरी पीक मोठ्या प्रमाणात घेतली जात होते; पण शेतकरी नगदी पिकाकडे वळला आहे तर फलटण-खंडाळा तालुक्यात धोम-बलकवडीच्या पाण्यामुळे ऊसक्षेत्रात वाढ झाली आहे.

गत सात वर्षांत संकरित बाजरी बियाणे उपलब्ध झाल्याने कमी क्षेत्रात जादा उत्पादन मिळू लागले. गतवर्षी फलटण तालुक्यातील साखर कारखान्यांनी ऊसबिले वेळेत दिली नाहीत. त्यामुळे ऊसक्षेत्र कमी होऊन शेतकऱ्यांनी भाजीपाला, कांदा व बाजरीची पेरणी केली. तसेच पाऊसही वेळेवर पडल्यामुळे बाजरी पिके जोमात येऊन उत्पादन चांगले मिळाले.

कोरोना महामारीमुळे बाहेरच्या देशातील निर्यात बंद राहिल्याने शेतकऱ्याकडे बाजरी मोठ्या प्रमाणात पडून राहिली. स्थानिक बाजारपेठा, आठवडा बाजार बंद आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक वाढल्याने दर मिळत नाही याचा विचार करून शेतकऱ्याने या वर्षी बाजरी पिकाची पेरणी कमी प्रमाणात केली असली तरी गतवर्षीची बाजरी पडून आहे. त्यामुळे या वर्षीही बाजरी उत्पादन होणार आहे. मात्र बाजरीला दर मिळणार नसल्याने ग्राहकांना बाजरी गोड लागणार असली तरी शेतकऱ्यांना दराअभावी कडू लागणार असल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे.

कोट..

बाजरीला दर नसल्याने गतवर्षीची बाजरी शिल्लक आहे. या वर्षी संकरित बाजरी एक पिशवी पेरली. तिची उगवण चांगली झाली. ऐनवेळच्या पावसामुळे पाणी देण्याची गरज भासली नाही. उत्पादन चांगले मिळाले; पण नांगरणी, पेरणी, खते, काढणी, मळणी, मजुरीचा खर्च व लॉकडाऊनमुळे दर नाही. त्यामुळे उत्पादन जादा मिळूनही दर नसल्याने बाजरी पीक परवत नाही.

-हणंमतराव मुळीक, शेतकरी, मुळीकवाडी

१२आदर्की

फोटो -आदर्की परिसरात बाजरी पीक काढणीस आली आहे.