शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

शेतकऱ्यांनी मध संकलन व्यवसायाकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:43 IST

रहिमतपूर : ‘मध संकलन हा कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवून देणारा उद्योग आहे. शेतकऱ्यांनी आर्थिक स्थिरता देणाऱ्या या ...

रहिमतपूर : ‘मध संकलन हा कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवून देणारा उद्योग आहे. शेतकऱ्यांनी आर्थिक स्थिरता देणाऱ्या या शेतीपूरक व्यवसायाकडे वळावे’, असे आवाहन आंतरराष्ट्रीय पर्यावरणतज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे यांनी केले.

रहिमतपूर येथील कवी गिरीश शैक्षणिक सांस्कृतिक केंद्रात मध संचनालय, महाबळेश्वर, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ आणि रहिमतपूर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मधमाशा प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे उपकार्यकारी संचालक बिपिन जगताप होते. यावेळी नगराध्यक्ष आनंदा कोरे, मध संचालनालय, महाबळेश्वरचे संचालक डी. आर. पाटील, अरूण माने उपस्थित होते.

डॉ. राजेंद्र शेंडे म्हणाले, ‘पर्यावरणाचा नाश करून पैसा कमावण्यापेक्षा निसर्गाचा आदर राखून जो पैसा मिळतो त्याचा आनंद वेगळाच असतो. तो आनंद आपल्याला मध संकलनातून मिळवता येईल. शेतकऱ्यांनी बदलत्या परिस्थितीनुसार शेतीपूरक व्यवसाय म्हणून मध संकलन या व्यवसायाकडे पाहणे ही काळाची गरज आहे. महाबळेश्वरनंतर रहिमतपूर येथे उपमध संचनालय होत असून, शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.’

बिपिन जगताप म्हणाले, ‘कोणताही उद्योग करायचा म्हटलं तर त्याला भांडवल, जमीन, पाणी, वीज, कामगार व दळणवळणाची साधने लागतात. मध संचालनालय व्यवसायाला फक्त इच्छाशक्ती लागते. शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ सर्वतोपरी सहकार्य करेल.’

आनंदा कोरे यांनी प्रास्तविक केले. विकास पवार यांनी सूत्रसंचालन केले तर किरण भोसले यांनी आभार मानले.

फोटो : रहिमतपूर येथे मध संकलनाचे प्रात्यक्षिक डॉ. राजेंद्र शेंडे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. (छाया : जयदीप जाधव)