शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

ऊसतोडणीसाठी शेतकऱ्यांना मोजावे लागतात पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:13 IST

कुडाळ : कुडाळ आणि परिसरात अजून बऱ्याच क्षेत्रातील ऊस शेतातच उभा आहे. त्यातच उसाला तुरे फुटून मोडलेले आहेत. ऊसतोडणीसाठी ...

कुडाळ : कुडाळ आणि परिसरात अजून बऱ्याच क्षेत्रातील ऊस शेतातच उभा आहे. त्यातच उसाला तुरे फुटून मोडलेले आहेत. ऊसतोडणीसाठी शेतकरी अडचणीत असून टोळीवाल्यांकडून वाढेबांधणीच्या नावाखाली प्रतिटन ७० ते ८० रुपयांची मागणी होताना दिसत आहे. आधीच ऊसतोड होईना यामुळे त्रासलेल्या ऊस उत्पादकांना याचा आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे.

कोरोनाच्या स्थितीमुळे यावर्षी कारखान्यांचा गळीत हंगाम उशिराने सुरू झाला होता. तसेच तोडणी यंत्रणेच्या कमतरतेने परिसरातील ऊसतोडणीस विलंब झाला. यामुळे उसाला लवकर तोड मिळावी यासाठी शेतकरी प्रयत्न करत असून, ऊसतोडणीसाठी मजुरांकडून अधिक मजुरीची मागणी केली जात असल्याने शेतकऱ्यांना या भुरदंड सोसावा लागत आहे. यामुळे शेतात ऊस उभा राहण्यापेक्षा मिळेल ते गोड समजून शेतकरी आर्थिक फटका सहन करीत आहे.

आजही कुडाळ आणि परिसरात किसनवीर, अजिंक्यतारा, शरयू, जरंडेश्वर या कारखान्यांच्या टोळ्या ऊसतोडणी करत आहेत. तरीही भागात अजून बऱ्याच ठिकाणी ऊस शिल्लक राहिलेला दिसत आहे.

आधीच ऊसतोडणीला उशीर होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आाहे. ऊसतोड मजुरांकडून तोडणीसाठी टनामागे ठरावीक रक्कम ठरवून दिल्याखेरीच तोडणीही होत नाही. यामुळे शेतकरी ऊसतोडणीसाठी स्लिप बॉय, टोळीच्या मुकादमाकडे हेलपाटे घेत आहेत. वेळेत उसाची तोड मिळत नसल्याने वजनात घट होऊन शेतकऱ्यांनाही याचा मोठा फटका बसणार आहे. अशातच कोरोना पुन्हा डोके वर काढू लागल्याने टोळीवाल्यांना स्वगृही परतण्याचे वेध लागले आहेत.

(कोट)

ऊसतोडणीसाठी मुळातच उशीर झाल्याने ऊसतोड कधी होणार, याची वाट पाहत बसावी लागत आहे. अशातच ऊसतोडणीकरिता मजुरांकडूनही काही ठरावीक रकमेची मागणी होत असून, वाहतुकीसाठीसुद्धा पैसे मोजावे लागत आहेत. याबाबत कारखान्याच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता शेतकऱ्यांकडून ऊसतोडणीसाठी अशी कोणतीही रक्कम घेऊ-येऊ नये असे स्पष्ट केले आहे. तरीही शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कारखान्यांनी शेतकऱ्यांची व्यथा समजून घेऊन लक्ष देण्याची गरज आहे.

- कृष्णा मोरे, शेतकरी