शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

शेतकऱ्यांना जाणवेना उसाचा गोडवा

By admin | Updated: December 23, 2014 23:51 IST

फलटण तालुक्यातील स्थिती : दराची घोषणा हवेत; कारखानदार चिडीचूप

फलटण : तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र वाढले असताना ऊसदराचा प्रश्न मात्र अजूनही बाजूलाच राहिला आहे. कारखानदार उसाची पहिली उचल देण्यास तयार नसल्याने तालुक्यातील सर्वच शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. शेतकऱ्यांच्या ऊसदराकडे नजरा लागून राहिल्या आहेत.शासन निर्णयानुसार ऊस गाळपासाठी गेल्यानंतर १४ दिवसांत उसाची ‘एफआरपी’प्रमाणे होणारी किंमत ऊसउत्पादकाला देणे साखर कारखान्यांना बंधनकारक आहे. दुसरीकडे साखरेचे दर प्रतिक्विंटल २३०० ते २४०० रुपयांपर्यंत कमी झाल्याने ‘एफआरपी’प्रमाणे होणारी उसाची किंमत देणे साखर कारखान्यांना शक्य होत नाही. त्याबाबत योग्य तोडगा काढण्याऐवजी साखर आयुक्त किंवा प्रशासनाने उसाचे पेमेंट केले नाही तर साखर कारखान्यांची मालमत्ता जप्त करून महसुली वसुलीप्रमाणे उसाचे पेमेंट करण्यासाठी साखर कारखान्यांना दमदाटी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य अथवा केंद्र शासन अद्याप तरी कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही.उसाचे प्रचंड क्षेत्र अद्याप गाळपअभावी शिल्लक असल्याने संपूर्ण उसाचे गाळप कसे करणार, हा प्रश्न सर्वांसमोर आहे. ऊसउत्पादक शेतकरी उसाच्या तोडीसाठी प्रयत्नशील असतानाच आर्थिक संकटाचा विचार करून आणि शासनाचे ठाम धोरण नसल्याने अनेक साखर कारखान्यांनी आपले गळीत हंगाम उशिरा सुरू केले आहेत. परिणामी उसाचे मोठे क्षेत्र गाळपाविना शिल्लक राहण्याची भीती जाणकारांमधून व्यक्त होत आहे.फलटण तालुक्यातील श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योगाकडील साखर उतारा ११.७२ टक्के धरून तोडणी वाहतूक खर्च ५०७ रुपये २२ पैसे वजा जाता २,२०७ रुपये ८२ पैसे प्रतिटन ‘एफआरपी’प्रमाणे रक्कम देणे या कारखान्याला बंधनकारक आहे. कारखान्याने आज अखेर ४८ हजार २२५ मे.टन उसाचे गाळप करून ४८ हजार ८०० साखर पोत्यांची निर्मिती केली आहे. मात्र, कारखान्याने आतापर्यंत ऊसउत्पादकाला एक रुपयाही दिलेला नाही.दरम्यान, न्यू फलटण शुगर वर्क्स साखरवाडी या कारखान्याने आतापर्यंत १ लाख ४२ हजार ६०० मे.टन उसाचे गाळप करून १ लाख ५२ हजार ६०० साखरपोत्यांची निर्मिती करण्यात आली आहे.एफआरपीसाठी गतवर्षीचा साखर उतारा ११.३६ टक्क्यांप्रमाणे तोडणी वाहतूक खर्च ४९२ प्रतिटन वजा जाता २१३९ रुपये ५२ पैसे प्रतिटन ऊस उत्पादकाला देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. तथापि, साखरेचे दर पडल्याने या कारखान्यानेही अद्याप उसाचे पेमेंट केलेले नाही.(प्रतिनिधी)दर द्या; अन्यथा आंदोलन : खोतऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने, प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीवर मात करून उसाचे उत्पादन काढले असल्याने आता साखरेचे दर पडल्याचे कारण देऊन उसाची वाजवी किंमत देण्यास टाळाटाळ करणे गैर व अवाजवी आहे. शासनाने वाट्टेल त्या मार्गाने तरतुदी करून ऊस उत्पादकाला १४ दिवसांच्या आत ‘एफआरपी’प्रमाणे उसाची संपूर्ण रक्कम दिली पाहिजे; अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. यावेळी धनंजय महामुलकर, नितीन यादव. अ‍ॅड. नरसिंह निकम आदी उपस्थित होते.