शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
3
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
4
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
5
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
6
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
7
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
8
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
9
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
10
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
11
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
12
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
13
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
14
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
15
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
16
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
17
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
18
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
19
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
20
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता

लाभक्षेत्रातील शेतकरी पाण्यापासून वंचित

By admin | Updated: September 9, 2014 23:45 IST

वांग-मराठवाडीचा प्रश्न : धरणाचे काम अद्यापही अपूर्ण

सणबूर : वांग मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात असूनही येथील शेतकऱ्यांना गेल्या सतरा वर्षांच्या कालावधीत धरणाच्या पाण्याचा एक थेंबही मिळालेला नाही़ धरण एकीकडे आणि लाभक्षेत्र दुसरीकडे असल्याने या शेतकऱ्यांना शासन कसे पाणी देणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे़परिसरातील मंद्रुळकोळे, मंद्रुळकोळे खुर्द, शितपवाडी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी काढून घेतल्या, मात्र त्यांना भरपाई मिळालेली नाही़ मराठवाडी धरणातून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना नेमके कसे पाणी दिले जाणार? याबाबत कुणीही ठोसपणे सांगायला तयार नसल्याने शेतकऱ्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे़ धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जमिनी संपादीत करून सतरा वर्षे उलटून गेली़ तरीही पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही़ शासनाने या गावातील शेतकऱ्यांना पाणी कसे देणार ते जाहीर करावे़ नाही तर घेतलेल्या जमिनी मुळ शेतकऱ्यांना परत द्याव्यात अशा मागणीने जोर धरला आहे़ १९९७ पासून या धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली़ तेव्हापासूनच हे धरण संघर्षात सापडले आहे़ कधी निधीचा तुटवडा तर कधी धरणग्रस्तांची आंदोलने यामुळे धरणाचे काम सातत्याने रखडत गेले़ सध्या धरणात काही प्रमाणात पाणी साठवण्यात आले असले तरी पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होण्यासाठी अजूनही धरणाचे बरेच काम बाकी आहे़ शासनाने चार एकरांचा स्लॅब लागू करून त्यावरील जमिनी पुनर्वसनासाठी ताब्यात घेतल्या़ एकत्र कुटुंब असलेल्या आणि खातेफोड न झालेल्या अनेक शेतकऱ्यांवर यामुळे अन्याय झाला आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे़ तर काहींनी आपल्या जमिनीला पाणी मिळेल, या आशेने जमिनी दिल्या आहेत़ मात्र, सतरा वर्षे उलटूनही याठिकाणी पाणी पोहोचले नाही. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे़ (वार्ताहर)