शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

लाभक्षेत्रातील शेतकरी पाण्यापासून वंचित

By admin | Updated: September 9, 2014 23:45 IST

वांग-मराठवाडीचा प्रश्न : धरणाचे काम अद्यापही अपूर्ण

सणबूर : वांग मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात असूनही येथील शेतकऱ्यांना गेल्या सतरा वर्षांच्या कालावधीत धरणाच्या पाण्याचा एक थेंबही मिळालेला नाही़ धरण एकीकडे आणि लाभक्षेत्र दुसरीकडे असल्याने या शेतकऱ्यांना शासन कसे पाणी देणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे़परिसरातील मंद्रुळकोळे, मंद्रुळकोळे खुर्द, शितपवाडी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी काढून घेतल्या, मात्र त्यांना भरपाई मिळालेली नाही़ मराठवाडी धरणातून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना नेमके कसे पाणी दिले जाणार? याबाबत कुणीही ठोसपणे सांगायला तयार नसल्याने शेतकऱ्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे़ धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जमिनी संपादीत करून सतरा वर्षे उलटून गेली़ तरीही पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही़ शासनाने या गावातील शेतकऱ्यांना पाणी कसे देणार ते जाहीर करावे़ नाही तर घेतलेल्या जमिनी मुळ शेतकऱ्यांना परत द्याव्यात अशा मागणीने जोर धरला आहे़ १९९७ पासून या धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली़ तेव्हापासूनच हे धरण संघर्षात सापडले आहे़ कधी निधीचा तुटवडा तर कधी धरणग्रस्तांची आंदोलने यामुळे धरणाचे काम सातत्याने रखडत गेले़ सध्या धरणात काही प्रमाणात पाणी साठवण्यात आले असले तरी पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होण्यासाठी अजूनही धरणाचे बरेच काम बाकी आहे़ शासनाने चार एकरांचा स्लॅब लागू करून त्यावरील जमिनी पुनर्वसनासाठी ताब्यात घेतल्या़ एकत्र कुटुंब असलेल्या आणि खातेफोड न झालेल्या अनेक शेतकऱ्यांवर यामुळे अन्याय झाला आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे़ तर काहींनी आपल्या जमिनीला पाणी मिळेल, या आशेने जमिनी दिल्या आहेत़ मात्र, सतरा वर्षे उलटूनही याठिकाणी पाणी पोहोचले नाही. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे़ (वार्ताहर)