शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शेतकरी म्हणे... मेरा नंबर कब आएगा?

By admin | Updated: January 15, 2015 23:35 IST

मजुरांअभावी ऊसतोडणी रखडल्या : ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत, फड पेटण्याच्या घटनांतही वाढ

कऱ्हाड : जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत कऱ्हाड व पाटण तालुक्यामध्ये ऊसक्षेत्र जास्त आहे. या दोन्ही तालुक्यांत सध्या पाच कारखाने कार्यरत आहेत. या कारखान्यांचे ऊसतोडणी मजूरही ठिकठिकाणी दाखल झाले आहेत. मात्र, मजुरांची संख्या कमी असल्याने तोडणीचे काम गतीने होत नसल्याचे चित्र शिवारात दिसून येत आहे. चार ते पाच गावांसाठी आठ-नऊ मजुरांची एकच टोळी कार्यरत असल्याने शिवारातील ऊसतोडणी उरकणार कधी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यातच फड पेटण्याच्या घटनांतही वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कऱ्हाडसह पाटण तालुक्यातील बहुतांश क्षेत्र बागायती आहे. पाण्याची उपलब्धता असल्याने या पट्ट्यात माळव्याच्या पिकांसह हुकमी उत्पन्न देणारे पीक म्हणून उसाची लागण मोठ्या प्रमाणावर केली जाते. दरवर्षी कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असतानाही या दोन तालुक्यातील बहुतांश गावांत ऊसतोडणीचे काम उरकलेले नसते. काही क्षेत्रातील ऊस फडातच उभा असतो. यावर्षीही हीच परिस्थिती उद्भवण्याची चिन्हे आहेत. कारखाना सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, तरीही तोडणी उरकलेल्या नाहीत. शिवारात बहुतांश क्षेत्रातील ऊस उभाच असल्याचे दिसते. काही ठिकाणच्या शिवारात उसाला तुरेही आले आहे. ऊसतोडणी रखडण्यामागे मजुरांची कमतरता हे मुख्य कारण आहे. मजूरच उपलब्ध नसल्याने उसाची तोडणी होतच नाही. काही वर्षांपूर्वी दीपावलीपूर्वीच ऊसतोडणी मजूर येथे दाखल होत होते. टोळ्यांमध्ये दहापेक्षा जास्त मजुरांची संख्या असायची. तसेच टोळ्याही मोठ्या प्रमाणात ऊस पट्ट्यामध्ये दाखल व्हायच्या. एका गावात चार ते पाच टोळ्यांकरवी ऊसतोडणीचे काम चालायचे. त्यामुळे एक-दोन महिन्यांतच गावातील बहुतांश शिवार रिकामे व्हायचे; पण हळूहळू ही परिस्थिती बदलली. टोळ्यांतील मजुरांची संख्या कमी झाली. एका टोळीत फक्त पाच ते सहा मजूर असायचे. मात्र, त्याही परिस्थितीत ऊसतोडीचा प्रश्न उद्भवत नव्हता. कारखान्यांचा हंगाम संपेपर्यंत गावागावातील ऊसतोडणी उरकायच्या. सध्या मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. टोळीतील मजुरांच्या संख्येबरोबरच टोळ्यांचीही संख्या कमी झाल्याचे दिसते. चार ते पाच गावांसाठी कारखान्याकडून एकच टोळी पुरविली जात आहे. संबंधित टोळीतील सहा-सात मजूर पाच ते सहा गावांतील उसाची तोडणी करीत आहेत. त्यामुळे तोडणीचे काम वेळेत होत नाही.मजुरांच्या तुटवड्यावर उपाय म्हणून हार्वेस्टर मशीन घेण्यात आल्या. मात्र, त्या काही भागापुरत्याच मर्यादित आहेत. तो भाग वगळता इतर ठिकाणी मजुरांकरवीच तोडणी केली जात असून मजुरांच्या तुटवड्यामुळे तोडणीचे काम होत नसल्याचे दिसते. परिणामी, शेतकऱ्यांना कारखान्याच्या गट कार्यालयात तोडीसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. उसाला तोडणी कधी मिळणार, अशी विचारणा त्यांना कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना करावी लागत आहे. एवढे करूनही वेळेत तोडणी मिळत नसल्याने त्याचा फटका ऊसाला बसत आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन घटत आहे. काही दिवसांपासून फड पेटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अगोदरच उसाला तोड मिळत नाही. अशातच फड पेटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ऊस पेटण्याच्या प्रमाणात अचानक वाढ कशी झाली, हासुद्धा सध्या संशोधनाचा विषय आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांनीच हाती घेतला कोयताऊसतोड मजुरांचा तुटवडा सर्वत्रच जाणवत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी स्वत:च हातात कोयता घेऊन ऊसतोड करण्यास सुरूवात केली आहे. काही युवकही त्यासाठी सरसावले आहेत. बहुतांश गावांमध्ये आठ ते दहा युवकांनी एकत्रित येऊन ऊसतोड टोळी तयार केली आहे. संबंधित युवक शेतकऱ्यांना ऊसाची तोडणी व भरणी करून देतात. त्याचा मोबदला ते शेतकऱ्यांकडून घेतात. युवकांच्या या टोळ्यांमुळे काही गावांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.