शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कुटुंबसंस्थेत ‘लिव्ह इन’ मान्य नसल्याचे वास्तव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:27 IST

जगात कुटुंबव्यवस्था ही समाजातील मूळ घटक संस्था मानली जाते. भारतासारख्या देशात तर कुटुंबसंस्था आणि विवाहसंस्थेला अत्यंत महत्त्व आहे. औद्योगिकीकरण ...

जगात कुटुंबव्यवस्था ही समाजातील मूळ घटक संस्था मानली जाते. भारतासारख्या देशात तर कुटुंबसंस्था आणि विवाहसंस्थेला अत्यंत महत्त्व आहे. औद्योगिकीकरण आणि शहरीकरणानंतर अनेक आर्थिक, सांस्कृतिक व सामाजिक बदल होत गेले. त्याचा परिणाम हा कुटुंब आणि विवाह या दोन्हीही संस्थांवर झाला. यामध्ये विवाह संस्थेवर अधिक करून परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आली. पती, पत्नी आणि मुले असे छोटे व सुटसुटीत कुटुंब दिसू लागले. महिलांची नोकरीची क्षेत्रे विस्तारली. तसेच आर्थिक आवकही वाढली. त्यातच करिअर आणि आर्थिक स्थिरतेला महत्त्व देण्यात येऊ लागले. यामुळे कुटुंबातील बंदिस्तपणा आणि प्रेमाचे बंधन उसवल्यासारखे झाले. त्यातूनच सध्या लग्न न करता एकत्र राहणाऱ्या तरुण-तरुणींचे प्रमाण वाढत चालले आहे. यातून कुटुंबसंस्थेला कुठेतरी धक्का लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ही गोष्ट आजही समाजमान्य नाही. यातून अनेक चुकीच्या गोष्टीही घडू पाहत आहेत.

‘लिव्ह इन’मध्ये एक स्पष्ट आहे की, वरवर एकत्र असणाऱ्या दोन व्यक्ती केवळ तडजोड म्हणूनच एकत्र राहत असल्याचे दिसत आहे. कुटुंबव्यवस्थेतील हे बदल शहराबरोबर कदाचित हळूहळू ग्रामीण भागातही पसरतील. आणखी काही वर्षांनी समाजमन कसे व कोठे वळेल हे आजतरी सांगणे अवघड आहे. आज अमान्य असणारी ही बाब उद्या समाजमान्य होईलही. त्यातून कोणत्या प्रकारची कुटुंबव्यवस्था दिसेल याचे उत्तर आतातरी सांगणे अवघड आहे. पण, एक वास्तव आजही आहे की, बहुतांशी लोकांना ‘लिव्ह इन’ मान्यच नाही.

चौकट :

कुटुंबसंस्था म्हणजे काय?

विवाह, रक्तसंबंध किंवा दत्तकविधान आणि एकत्र निवास यांनी बांधल्या गेलेल्या दोन अथवा अधिक महिला आणि पुरुषांचा गट म्हणजे कुटुंब होय. कुटुंब हे एका व्यापक समाजरचनेचा भाग आहे. जुन्या कुटुंबांना ‘लिव्ह इन’ अजिबात मान्य नाही. तसेच ते यावर चर्चाही करताना टाळतात. शहरी भागात हे हळूहळू मोठ्या प्रमाणात रुजू लागलं आहे, हेही एक वास्तव आहे.

- नितीन काळेल

..............................................................