शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

थकितवाले तुपाशी, नियमितवाले उपाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:10 IST

रहिमतपूर : राज्य सरकारकडून थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली; परंतु नियमित शेती पिकासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप ...

रहिमतपूर : राज्य सरकारकडून थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली; परंतु नियमित शेती पिकासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप एका दमडीचीही मदत मिळालेली नाही. ‘थकितवाले तुपाशी अन् नियमितवाले उपाशी’ ठेवणाऱ्या राज्य सरकारच्या नावाने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा होळीपूर्वीच शिमगा सुरू झाला आहे.

महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यावेळी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांची मदत करणार असल्याचे जाहीर केले. थकीत कर्जदारांना कर्जमाफी मिळाली; मात्र नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप एका दमडीचीही मदत केली नाही. पहिल्यांदा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच आर्थिक मदत मिळणे गरजेचे होते. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत केली असती, तर नियमित कर्ज भरणाऱ्यांची संख्या आणखी वाढली असती. पोटाला चिमटा घेऊन ज्यांनी कर्जाची परतफेड केली, त्यांना आर्थिक मदतीच्या स्वरूपात आधार देणे गरजेचे होते, परंतु थकीत कर्ज असणाऱ्यांना माफी दिली गेली.

कर्जमाफी मिळाले तेही शेतकरीच आणि नियमित कर्ज भरणारेही शेतकरीच आहेत. त्यामुळे कर्जमाफी दिलेल्या निर्णयांचे शेतकऱ्यांतून स्वागत होत आहे. परंतु वारंवार पडणारा दुष्काळ, महागाईचे चटके व शेतीमालाला नसलेला हमीभाव यामुळे सर्वच शेतकरी चारीबाजूने भरडला जात आहे. पोटाला चिमटा घेऊन विदारक परिस्थितीत विकास सेवा सोसायट्या व बँकांची देणी वेळेत भागवली अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा लाभ मिळणे गरजेचे होते. परंतु काहीतरी निमित्त करून सरकारकडून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची टोलवाटोलवी सुरू आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचा नियमित कर्ज भरण्याकडे कल कमी होण्याची शक्यता निर्माण होण्याची शक्यता आहे.

चाैकट :

पन्नास हजारांची मदत तातडीने करा

थकीत कर्जदारांना कर्जमाफी आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना केवळ आश्वासनाचे ढोस दिले जात आहेत. सरकारच्या या दुटप्पी भूमिकेमुळे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांत खदखद सुरू झाली आहे. आम्ही वेळेत कर्जाचा भरणा केला, हीच मोठी चूक झाली, अशी प्रतिक्रिया नियमित कर्ज भरणारे अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान, राज्य सरकारने आश्वासनाप्रमाणे पन्नास हजारांची मदत तातडीने करावी, अशी मागणी होत आहे.