शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

माजी सैनिकाचा स्वत:च्या विहिरीने घेतला बळी

By admin | Updated: January 9, 2017 22:29 IST

१२ तासांचे शोधकार्य : पिंपोडे बुद्रुक येथे रात्री उशिरा ढिगाऱ्याखालील दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यंत्रणेला यश

वाठार स्टेशन : हवाई दलात नोकरी केल्यानंतर गावाकडे जायचं. शेती करायची अन् शेतकऱ्यांसाठी एखादी नर्सरी काढून मस्त जगायचं, असं छान स्वप्न उराशी बाळगून गेली १२ वर्षांपासून कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक या गावी शेती करत असलेले सेवानिवृत जवान कांतिलाल खाशाबा केंजळे (वय ५५ ) व शेतमजूर विकास मनजी सारोळे (४५) या दोघांचा एका विहिरीने बळी घेतला. ही खळबळजनक घटना रविवारी दुपारी २ वाजता घडली. स्वत:च्या बांधीव विहिरीत पडलेला बोगदा मुजवण्यासाठी लावलेला पत्रा काढत असताना हादरा बसून विहिरीस बांधलेला कमजोर स्लॅब व मातीचा ढिगारा अंगावर कोसळल्याने या ढिगाऱ्याखाली अडकून या माजी जवानासह त्यांच्याकडे शेती करत असलेल्या एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटना रविवारी घडला आणि ढिगाऱ्याखालून सोमवारी त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. विहिरीत पडलेल्या ढिगाऱ्याखालील मृतदेह शोधण्यासाठी तब्बल १२ तास ३ पॉकलेन मशीनच्या साह्याने रात्री ३ वाजेपर्यंत हे शोधकार्य सुरू होते.याबाबत पोलिसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव येथील येळे वस्तीनजीक पाडळ वाट शिवारात येथील कांतिलाल केंजळे यांची स्वत:ची ७० फूट खोल बांधीव विहिर आहे. या विहिरीचे अंदाजे दीड वर्षांपूर्वीच ५० फूट सिमेंट रिंग टाकून बांधकाम केले होते. मात्र, काही महिन्यांपूर्वीच विहिरीतील एका रिंगला चार ते पाच फुटांचा बोगदा पडल्यामुळे कांतिलाल केंजळे यांनी हा बोगदा लोखंडी पत्र्याच्या साह्याने लोखंडी अँगलच्या मदतीने वेल्डिंग करून बसवला होता. मात्र, यातूनही बाहेरील माती विहिरीत पडत असल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वी एका बांधकाम ठेकेदाराला हा बोगदा दाखवला होता. यावेळी या बांधकाम ठेकदाराने विहिरीतील बोगद्यावर लावलेला पत्रा काढून घ्या, असे कांतिलाल यांना सांगितले होते. त्यामुळे रविवार, दि. ८ जानेवारी रोजी कांतिलाल व त्यांच्याकडे काम करत असलेला शेतमजूर दुपारी २ वाजता या विहिरीकडे गेले होते. यावेळी विहिरीच्या वरील बाजूस एक पार ठोकून त्यास एक दोरी बांधून कांतिलाल हे विहिरीतील मधोमध असलेल्या बोगद्यावरील पत्रा काढत होते. याच दरम्यान हादरा बसत असल्याने कमकुवत असलेली विहिरीतील रिंग अचानक कोसळली. यावेळी विहिरीवरील बाजूस दोर धरून बसलेला मजूरही यामुळे खाली कोसळल्याने अचानक मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून शेजारी शेतात काम करणाऱ्या लोकांनी विहिरीकडे धाव घेतली. यावेळी मातीचा मोठा ढीग विहिरीत कोसळला गेल्याचे व ढिगाऱ्याखाली कांतिलाल व त्यांचा शेतमजूर अडक ला असल्याची चर्चा वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. याबाबतची माहिती संजय साळुंखे यांनी तत्काळ वाठार पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांना कळवल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यास सुरुवात केली.रविवारी दुपारी ३ वाजल्यापासून या ठिकाणी ३ पॉकलेन मशीनच्या साह्याने विहिरीबाहेर समतल खड्डा काढून विहिरीतिल मातीचा ढिगारा हटवण्याचे काम या मशिनच्या साह्याने पहाटे ३ पर्यंत सुरू होते. पहाटे ३ वाजता दोन्ही मृतदेह आढळून आल्यानंतर हे शोधकार्य थांबवून दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले. सोमवारी सकाळी दहा वाजता कांतिलाल केंजळे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)