शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्याच्या तोंडावरही सहा धरणांत ४५ टीमएमसी साठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST

सातारा : जिल्ह्यात गेल्या वर्षी सतत झालेल्या पावसामुळे आजही सर्वच प्रमुख धरणांत चांगला पाणीसाठा आहे. सद्यस्थितीत पश्चिमेकडील प्रमुख ६ ...

सातारा : जिल्ह्यात गेल्या वर्षी सतत झालेल्या पावसामुळे आजही सर्वच प्रमुख धरणांत चांगला पाणीसाठा आहे. सद्यस्थितीत पश्चिमेकडील प्रमुख ६ धरणांमध्ये ४५.०८ टीमएमसी पाणी शिल्लक आहे. त्यामुळे या वर्षीही आतापासून चांगला पाऊस सुरू झाल्यास धरणे लवकरच भरू शकतात. तर सध्या कोयनेत २९, उरमोडीत ६, धोम ५ तर तारळी धरणात ३ टीएमसीच्या आसपास पाणीसाठा शिल्लक आहे.

जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून चांगला पाऊस होत आहे. यामुळे सर्व धरणे ओव्हरफुल्ल होत आहेत. तसेच पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून अनेक वेळा पाणी सोडावे लागल्याने नदीकाठच्या गावांना धोकाही निर्माण झालेला. दोन वर्षांपूर्वी कोयना, कृष्णा, वेण्णा, नीरा नदीपात्र सोडून वाहत होत्या. त्यामुळे आजूबाजूच्या गावांत आणि शेतात पाणी जाऊन मोठे नुकसान झाले होते. आताही पावसाळा सुरू झाला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली आहे. काही ठिकाणी पेरण्याही सुरू झाल्या आहेत. पण, काही भागांत पाऊस अत्यल्प पडलेला आहे. परिणामी पेरण्या रखडलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता आहे. त्यामुळे तलाव, धरणांत पाणीसाठा वाढू शकतो. तसेच धरणे लवकर भरली जातील, असा अंदाज आहे.

जिल्ह्यातील धोम, कण्हेर, कोयना, बलकवडी, उरमोडी, तारळी या ६ प्रमुख धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८.७४ टीएमसी इतकी आहे. गेल्या वर्षी या वेळी या धरणात ४९.३८ टीएमसी पाणीसाठा होता. तर या वर्षी तो ४५.०८ टीएमसी इतका आहे. त्यामुळे अजूनही पाणीसाठा बऱ्यापैकी टिकून आहे. तर १०५ टीएमसी क्षमता असणाऱ्या कोयना धरणातही अजूनही २८.७१ टीएमसी साठा आहे. म्हणजेच या धरणात अजूनही जवळपास २७.२८ टक्के पाणी आहे. त्याचबरोबर इतर धरणांमध्येही चांगला पाणीसाठा शिल्लक असल्याचे दिसून येत आहे.

चौकट :

जिल्ह्यातील प्रमुख धरणाचा साठा (टीएमसीमध्ये)

धरणे या वर्षी गतवर्षी एकूण क्षमता यावर्षीची टक्केवारी

धोम ४.९५ ५.४९ १३.५० ३६.६७

कण्हेर २.१८ २.१७ १०.१० २१.५९

कोयना २८.७१ ३२.७० १०५.२५ २७.२८

बलकवडी ०.७० १.०७ ४.०८ १७.१०

उरमोडी ५.७४ ५.७५ ९.९६ ५७.२७

तारळी २.८० २.२० ५.८५ ४७.९२

....................................................