शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
5
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
6
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
7
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
8
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
9
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
10
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
11
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
12
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
13
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
14
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
15
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
16
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
17
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
18
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
19
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
20
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल

आपत्तीच्या दोन महिन्यांनंतरही प्यावं लागतंय गडूळ पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जुलै महिन्यात आलेल्या पावसाने पाटण तालुक्यातील गावांना चांगलाच तडाखा दिला. घरे दरडीखाली गाडली गेली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जुलै महिन्यात आलेल्या पावसाने पाटण तालुक्यातील गावांना चांगलाच तडाखा दिला. घरे दरडीखाली गाडली गेली आणि जमीन गाळाने पिळवटून गेली. याला दोन महिने उलटून गेल्यानंतर अद्यापही या भागातील स्थानिकांना गढूळ पाणी प्यावं लागतंय. निवारा केंद्रात आसरा घेणाऱ्या अनेकांना अद्यापही हक्काचे घर मिळाले नाही. कागदावर सक्षम असणारे आपत्ती व्यवस्थापन विभाग आपत्तीग्रस्त झाले असून, याचा फटका येथील स्थानिकांना सोसावा लागत आहे.

पाटण तालुक्यात २२ आणि २३ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने कोयना नगर विभागातील पुरामुळे व भूस्खलनामुळे बाधित झालेल्या कामरगाव, हुंबरळी, तोरणे, ढोकावळे, हेळवाक, कोयना नगर, रासाटी, दास्तान, गोषटवाडी, शिरळ, त्रिपुडी, म्हावशी आणि नावडी या गावांना अजूनही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. भूस्खलनामुळे सर्वस्व गमावलेल्या या गावात अद्यापही आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध न झाल्याने स्थानिकांचे हाल होऊ लागले आहेत. भूस्खलनात संपूर्ण घरच वाहून गेल्याने यातील बहुतांश कुटुंबांना अजूनही शाळेतच राहण्याची वेळी आली आहे. लोकांकडून आलेले साहित्य पुरवून प्रशासन आपल्या कर्तव्यपूर्तीच्या फुशारक्या मारतंय; मात्र दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला तरी या लोकांना स्वच्छ पाणी प्यायला मिळत नाही, हे दुर्दैव आहे.

गत सप्ताहात या भागातील काहींनी शासनाच्या विरोधात आंदोलनही केले; पण शासकीय उत्तरांच्या पलिकडे त्यांना काहीच मिळाले नाही. शासकीय पदांवर कार्यरत असणाऱ्या यंत्रणेतील या अधिकाऱ्यांनी खुर्चीतील बाज सोडून सामान्यांच्या जागी जाऊन परिस्थितीचे अवलोकन केले, तरच ही स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. सामान्यांनी आपल्यातील अर्धी भाकरी देऊन या बांधवांना शक्य ते सहकार्य केले. आता राज्यकर्त्यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या मागे लागून भूस्खलनग्रस्तांची योग्य सोय लावण्यासाठी प्रयत्नशील रहावे, अन्यथा आगामी काळात राजकीय चित्रही बदलेल, यात शंका नाही.