शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा सुरू होऊनही १४ गावे अन् २६ वाड्या तहानलेल्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:50 IST

सातारा : जिल्ह्यात पावसाळा सुरू होऊनही अद्याप मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झालेले नाही. त्यामुळे ४ तालुक्यांत अजूनही टंचाई आहे. सध्यस्थितीत ...

सातारा : जिल्ह्यात पावसाळा सुरू होऊनही अद्याप मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झालेले नाही. त्यामुळे ४ तालुक्यांत अजूनही टंचाई आहे. सध्यस्थितीत १४ गावे आणि २६ वाड्या तहानलेल्या आहेत. या तालुक्यांत ११ टँकर सुरू असून १३ हजार नागरिकांना आधार मिळाला आहे.

जिल्ह्यात तीन-चार वर्षांतून दुष्काळ पडतो. त्यातच पाऊस होऊनही माण, खटावसारख्या तालुक्यांत डिसेंबर, जानेवारी महिना उजाडताच टँकर सुरू करावे लागायचे. पण, गेल्या काही वर्षांत हे चित्र बदललंय. याला कारण म्हणजे जलसंधारणाची झालेली कामे. त्याचबरोबर वॉटरकप स्पर्धेमुळे तर पाणी साठवण्याचं तुफान आलेलं. माण, खटाव आणि कोरेगाव या तालुक्यांत जलसंधारणाची मोठी कामे झाली आहेत. त्यामुळे पावसाचं पडलेलं पाणी अडून राहिलं व त्याचा फायदाही टंचाई निवारणासाठी झाला आहे.

जिल्ह्यात दोन वर्षांपासून दमदार पाऊस होत आहे. २०१९ आणि २०२० या दोन वर्षांत सरासरीहून अधिक पाऊस झाला. त्यामुळे या वर्षीच्या उन्हाळ्यात टंचाईची स्थिती एकदम कमी राहिली. याबाबत जिल्हा प्रशासनानेही संभाव्य टंचाई आराखडा तयार केला होता. त्यानुसार ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यातील १६९ गावांना आणि २२६ वाड्यांत टंचाई भासू शकते असा अंदाज होता. तर यामधील १३८ गावांनाच टंचाईचा सामना करावा लागण्याची स्थिती होती. त्यासाठी ४६ टँकर लागू शकतात, असे अनुमान होते. जवळपास अडीच कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र, उन्हाळा संपला तरी मोठ्या प्रमाणात टँकर लागले नाहीत.

जिल्ह्यात सध्या पावसाळा सुरू झाला आहे. मागील आठ दिवसांपासून पाऊस होत आहे. काही भागांत पावसाने चांगली हजेरी लावली, तर काही भागांत पाऊसच झालेला नाही. त्यामुळे टंचाई कमी झाली असली तरी टँकरग्रस्त गावे अजूनही आहेत. सध्यस्थितीत जिल्ह्यात १४ गावे आणि २६ वाड्यांसाठी ११ टँकर सुरू आहेत. यामध्ये ९ शासकीय आणि २ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. या टँकरवर १३१५४ नागरिक आणि ३०२३ पशुधन अवलंबून आहे. यामध्ये माण तालुक्यात टंचाईची स्थिती अधिक आहे.

जिल्ह्यात सध्या माण तालुक्यात ७ गावे आणि १४ वाड्यांसाठी ४ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यावर ५७१३ नागरिक अवलंबून आहेत. खटाव तालुक्यातील २ गावे व एका वाडीसाठी पाणीपुरवठा सुरू आहे. तर वाई तालुक्यात ३ गावे आणि ५ वाड्या तहानलेल्या आहेत. वाईत ३६२६ नागरिक आणि १४८० पशुधन टँकरवर अवलंबून आहे. सातारा आणि कऱ्हाड या तालुक्यांतील २ गावे व ४ वाड्यांसाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

चौकट :

१९ विहिरींचे अधिग्रहण...

जिल्ह्यात टंचाई असणाऱ्या गाव परिसरातील १९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये माण तालुक्यात ३, खटावमध्ये ७, फलटण २, खंडाळा तालुक्यात १ तर वाई तालुक्यात ५ आणि सातारा तालुक्यात एका विहिरीचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.

...........

२० दिवसांपूर्वी २१ गावे तहानलेली...

जिल्ह्यात २० दिवसांपूर्वी २१ गावे आणि २८ वाड्यांसाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. यावर १८ हजार नागरिक आणि ५ हजारांवर पशुधन अवलंबून होते. मात्र, मागील १५ दिवसांत काही भागांत पाऊस झाल्याने टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे.

..................................................................