शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
2
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
3
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
4
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
5
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
6
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
7
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
8
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
9
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
10
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
11
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
12
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
13
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
14
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
15
Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला
16
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
17
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
18
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
19
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
20
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...

‘ईटीएस’ मशीन ठरवणार भूस्खलनग्रस्तांच्या शेतांचे बांध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:44 IST

सातारा : गावागावांमध्ये बांधावरून असणारी भांडणं सर्वज्ञात आहेत. भूस्खलनामुळे जिल्ह्यातील काही गावांमध्ये शेतजमिनींवर डोंगरातील दगड-माती साठली आहे. ही माती ...

सातारा : गावागावांमध्ये बांधावरून असणारी भांडणं सर्वज्ञात आहेत. भूस्खलनामुळे जिल्ह्यातील काही गावांमध्ये शेतजमिनींवर डोंगरातील दगड-माती साठली आहे. ही माती काढता येणं शक्य नसल्याने मोजणी खात्याकडील नकाशे आणि ‘ईटीएस’ मशीन शेताच्या बांधांची हद्द ठरविणार आहेत. शेतातील माती आहे तशीच ठेवल्याने काहींची शेती उंचावर तर काहींची खोलात जाण्याची शक्यता असल्याने गावागावांमध्ये पुन्हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

अतिवृष्टी, भूस्खलन, महापूर या नैसर्गिक आपत्तीने जिल्ह्यातील १६७ गावे पूर्णत: बाधित झाली आहेत. त्यातील सुमारे ६८ गावे डोंगर उतारावर असल्याने तिथं शेतीचं मोठं नुकसान झाले आहे. बहुतांश ठिकाणी भूस्खलनाने अवघे डोंगरच शेत जमिनीवर पडल्याने शेती पन्नास फुटांहून अधिक खोल गाडली गेली आहे. प्रशासकीय पातळीवर पन्नास फुटांवर असलेला गाळ काढणं अशक्य आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रसामग्रीसह मनुष्यबळही शासनाकडे उपलब्ध नाही.

चौकट :

असं असतं ‘ईटीएस’ मशीन

इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन अर्थात ‘ईटीएस’ हे एक इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिट थियोडोलाइट आहे. हे यंत्रावर इलेक्ट्रॉनिक अंतर मोजमापासह एकत्रित केले आहे. जे दोन्ही अनुलंब आणि क्षैतिज कोन मोजण्यासाठी आणि इन्स्ट्रुमेंटपासून विशिष्ट बिंदूपर्यंत उतार अंतर आणि डेटा गोळा करण्यासाठी उपयुक्त ठरते. त्रिकोणी गणना करण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.

गाळावरच करावी लागणार शेती

डोंगरउतारासह नदी काठाला असलेल्या जमिनींमध्ये पाणी गाळ आणि वाहून आलेली दगडं साठली आहेत. शेतात आलेल्या या गाळावरच शेतकऱ्यांना शेती करण्याची वेळ येणार आहे. पाच ते सात फुटावर असलेला गाळ काढण्याची तयारी करण्यात आली आहे. मात्र, त्याहून अधिक साठलेला गाळ काढणं शक्य नसल्याने वाहून आलेल्या मलब्यावरच शेती करावी लागणार आहे.

गाळ काढायला स्थानिकांना आवाहन

जिल्ह्यात पुरासह भूस्खलनाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. डोंगर उतारावर असलेल्या शेतीत बहुतांश ठिकाणी डोंगराचे कडे आणि दगड ओघळून आले आहेत. हा सर्व गाळ काढण्याइतकी यंत्रणा शासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे स्थानिकांनी त्यांच्याकडील जेसीबी, पोकलेन उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्याच्या मानसिकतेत प्रशासन आहे. या वाहनांसाठी लागणारे इंधन देण्याची जबाबदारी शासन घेण्यास तयार आहे.

कोट :

भूस्खलन आणि पूरपरिस्थितीमुळे लोकांच्या घरांसह शेतीचेही नुकसान झाले आहे. शासन स्तरावर नुकसानभरपाई देण्याबरोबरच पंचनामे करण्याचे कामही सुरू आहे. डोंगरावरून वाहून आलेला गाळ शेतातून काढणं शक्य नाही, पण त्यांच्या बांधांच्या हद्दी ‘ईटीस’द्वारे निश्चित करण्यात येतील.

- श्रीरंग तांबे, प्रांताधिकारी, पाटण

बांधावरच्या भांडणांना खूप जुना इतिहास आहे. मशीनद्वारे जरी जागेची मोजणी झाली तरीही त्यातून शेतकऱ्यांचे समाधान होणे निव्वळ अशक्य आहे. त्यामुळे आहे तिथेच जागा देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणं शासन आणि अधिकाऱ्यांनी बंद करावं. शेतकऱ्यावर अस्मानी आणि सुलतानी दोन्ही संकटे आले, त्यांचा संवेदनशीलपणे विचार व्हावा.

- विक्रमबाबा पाटणकर, जिल्हा परिषद, माजी उपाध्यक्ष.