शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

‘ईटीएस’ मशीन ठरवणार भूस्खलनग्रस्तांच्या शेतांचे बांध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:44 IST

सातारा : गावागावांमध्ये बांधावरून असणारी भांडणं सर्वज्ञात आहेत. भूस्खलनामुळे जिल्ह्यातील काही गावांमध्ये शेतजमिनींवर डोंगरातील दगड-माती साठली आहे. ही माती ...

सातारा : गावागावांमध्ये बांधावरून असणारी भांडणं सर्वज्ञात आहेत. भूस्खलनामुळे जिल्ह्यातील काही गावांमध्ये शेतजमिनींवर डोंगरातील दगड-माती साठली आहे. ही माती काढता येणं शक्य नसल्याने मोजणी खात्याकडील नकाशे आणि ‘ईटीएस’ मशीन शेताच्या बांधांची हद्द ठरविणार आहेत. शेतातील माती आहे तशीच ठेवल्याने काहींची शेती उंचावर तर काहींची खोलात जाण्याची शक्यता असल्याने गावागावांमध्ये पुन्हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

अतिवृष्टी, भूस्खलन, महापूर या नैसर्गिक आपत्तीने जिल्ह्यातील १६७ गावे पूर्णत: बाधित झाली आहेत. त्यातील सुमारे ६८ गावे डोंगर उतारावर असल्याने तिथं शेतीचं मोठं नुकसान झाले आहे. बहुतांश ठिकाणी भूस्खलनाने अवघे डोंगरच शेत जमिनीवर पडल्याने शेती पन्नास फुटांहून अधिक खोल गाडली गेली आहे. प्रशासकीय पातळीवर पन्नास फुटांवर असलेला गाळ काढणं अशक्य आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रसामग्रीसह मनुष्यबळही शासनाकडे उपलब्ध नाही.

चौकट :

असं असतं ‘ईटीएस’ मशीन

इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन अर्थात ‘ईटीएस’ हे एक इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिट थियोडोलाइट आहे. हे यंत्रावर इलेक्ट्रॉनिक अंतर मोजमापासह एकत्रित केले आहे. जे दोन्ही अनुलंब आणि क्षैतिज कोन मोजण्यासाठी आणि इन्स्ट्रुमेंटपासून विशिष्ट बिंदूपर्यंत उतार अंतर आणि डेटा गोळा करण्यासाठी उपयुक्त ठरते. त्रिकोणी गणना करण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.

गाळावरच करावी लागणार शेती

डोंगरउतारासह नदी काठाला असलेल्या जमिनींमध्ये पाणी गाळ आणि वाहून आलेली दगडं साठली आहेत. शेतात आलेल्या या गाळावरच शेतकऱ्यांना शेती करण्याची वेळ येणार आहे. पाच ते सात फुटावर असलेला गाळ काढण्याची तयारी करण्यात आली आहे. मात्र, त्याहून अधिक साठलेला गाळ काढणं शक्य नसल्याने वाहून आलेल्या मलब्यावरच शेती करावी लागणार आहे.

गाळ काढायला स्थानिकांना आवाहन

जिल्ह्यात पुरासह भूस्खलनाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. डोंगर उतारावर असलेल्या शेतीत बहुतांश ठिकाणी डोंगराचे कडे आणि दगड ओघळून आले आहेत. हा सर्व गाळ काढण्याइतकी यंत्रणा शासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे स्थानिकांनी त्यांच्याकडील जेसीबी, पोकलेन उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्याच्या मानसिकतेत प्रशासन आहे. या वाहनांसाठी लागणारे इंधन देण्याची जबाबदारी शासन घेण्यास तयार आहे.

कोट :

भूस्खलन आणि पूरपरिस्थितीमुळे लोकांच्या घरांसह शेतीचेही नुकसान झाले आहे. शासन स्तरावर नुकसानभरपाई देण्याबरोबरच पंचनामे करण्याचे कामही सुरू आहे. डोंगरावरून वाहून आलेला गाळ शेतातून काढणं शक्य नाही, पण त्यांच्या बांधांच्या हद्दी ‘ईटीस’द्वारे निश्चित करण्यात येतील.

- श्रीरंग तांबे, प्रांताधिकारी, पाटण

बांधावरच्या भांडणांना खूप जुना इतिहास आहे. मशीनद्वारे जरी जागेची मोजणी झाली तरीही त्यातून शेतकऱ्यांचे समाधान होणे निव्वळ अशक्य आहे. त्यामुळे आहे तिथेच जागा देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणं शासन आणि अधिकाऱ्यांनी बंद करावं. शेतकऱ्यावर अस्मानी आणि सुलतानी दोन्ही संकटे आले, त्यांचा संवेदनशीलपणे विचार व्हावा.

- विक्रमबाबा पाटणकर, जिल्हा परिषद, माजी उपाध्यक्ष.