शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्री कोयना पर्यटन संघर्ष समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:49 IST

बामणोली : दुर्गम बामणोली विभागातील ३८ गावे व सह्याद्रीनगर ते गाळदेव या सह्याद्रीच्या माथ्यावरील सर्व गावांतील लोकांनी एकत्र ...

बामणोली : दुर्गम बामणोली विभागातील ३८ गावे व सह्याद्रीनगर ते गाळदेव या सह्याद्रीच्या माथ्यावरील सर्व गावांतील लोकांनी एकत्र येत सह्याद्री कोयना संघर्ष समिती स्थापन केली. या समितीच्या माध्यमातून विभागातील महत्त्वाचा प्रश्न असलेला कास-माचूतर रस्ता (राजमार्ग) खुला करण्याबरोबरच सातारा-बामणोली रस्ता कास पठारावरूनच सुरू ठेवणे व पर्यटन विकासासाठी प्रयत्न करणे हे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.

सह्याद्रीनगर येथे कोरोना नियमांचे पालन करून मर्यादित लोकांच्या उपस्थितीत समिती स्थापन करण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. या वेळी बामणोलीचे माजी सरपंच राजेंद्र संकपाळ, अंधारीचे उपसरपंच रवींद्र शेलार, कास संयुक्त व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष विष्णू किर्दत,

घाटाईदेवी ट्रस्टचे अध्यक्ष विष्णू काळे, दत्ता किर्दत, संतोष मालुसरे, दत्ता शिंदे, तुकाराम शिंदे, आपटीचे सरपंच बाबूराव शिंदे, गणेश गोरे, चंद्रकांत शिंदे, फळणीचे संतोष साळुंखे, लक्ष्मण शिंदे, गणपत ढेबे, पांडुरंग शिंदे, संदीप पाटणे यांच्यासह दोन्ही भागातील लोक उपस्थित होते.

रवींद्र शेलार म्हणाले, ‘कास पठार ते सह्याद्रीनगर हा राजमार्ग तीन वर्षांपासून बंद केला आहे. नेमका कोणत्या कारणास्तव हा रस्ता बंद केला हे प्रशासनाने सांगितले पाहिजे. हा मार्ग खुला झाल्यास संपूर्ण जावली तालुक्याचा पर्यटन विकास होऊन लोकांना रोजगार उपलब्ध होईल.’

राजेंद्र संकपाळ यांनी सातारा-बामणोली रस्ता कास पठारावरूनच सुरू करून डांबरीकरण करण्यात यावे. यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.

कास समितीचे अध्यक्ष विष्णू किर्दत यांनी कास गाव संघर्ष समितीला संपूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन दिले.

सभेचे प्रास्ताविक तुकाराम शिंदे यांनी केले. आभार संतोष मालुसरे यांनी मानले.

फोटो आहे...

....................................................................................................................