शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

सह्याद्री कोयना पर्यटन संघर्ष समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:49 IST

बामणोली : दुर्गम बामणोली विभागातील ३८ गावे व सह्याद्रीनगर ते गाळदेव या सह्याद्रीच्या माथ्यावरील सर्व गावांतील लोकांनी एकत्र ...

बामणोली : दुर्गम बामणोली विभागातील ३८ गावे व सह्याद्रीनगर ते गाळदेव या सह्याद्रीच्या माथ्यावरील सर्व गावांतील लोकांनी एकत्र येत सह्याद्री कोयना संघर्ष समिती स्थापन केली. या समितीच्या माध्यमातून विभागातील महत्त्वाचा प्रश्न असलेला कास-माचूतर रस्ता (राजमार्ग) खुला करण्याबरोबरच सातारा-बामणोली रस्ता कास पठारावरूनच सुरू ठेवणे व पर्यटन विकासासाठी प्रयत्न करणे हे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.

सह्याद्रीनगर येथे कोरोना नियमांचे पालन करून मर्यादित लोकांच्या उपस्थितीत समिती स्थापन करण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. या वेळी बामणोलीचे माजी सरपंच राजेंद्र संकपाळ, अंधारीचे उपसरपंच रवींद्र शेलार, कास संयुक्त व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष विष्णू किर्दत,

घाटाईदेवी ट्रस्टचे अध्यक्ष विष्णू काळे, दत्ता किर्दत, संतोष मालुसरे, दत्ता शिंदे, तुकाराम शिंदे, आपटीचे सरपंच बाबूराव शिंदे, गणेश गोरे, चंद्रकांत शिंदे, फळणीचे संतोष साळुंखे, लक्ष्मण शिंदे, गणपत ढेबे, पांडुरंग शिंदे, संदीप पाटणे यांच्यासह दोन्ही भागातील लोक उपस्थित होते.

रवींद्र शेलार म्हणाले, ‘कास पठार ते सह्याद्रीनगर हा राजमार्ग तीन वर्षांपासून बंद केला आहे. नेमका कोणत्या कारणास्तव हा रस्ता बंद केला हे प्रशासनाने सांगितले पाहिजे. हा मार्ग खुला झाल्यास संपूर्ण जावली तालुक्याचा पर्यटन विकास होऊन लोकांना रोजगार उपलब्ध होईल.’

राजेंद्र संकपाळ यांनी सातारा-बामणोली रस्ता कास पठारावरूनच सुरू करून डांबरीकरण करण्यात यावे. यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.

कास समितीचे अध्यक्ष विष्णू किर्दत यांनी कास गाव संघर्ष समितीला संपूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन दिले.

सभेचे प्रास्ताविक तुकाराम शिंदे यांनी केले. आभार संतोष मालुसरे यांनी मानले.

फोटो आहे...

....................................................................................................................