शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

होतकरू युवकांच्या माहितीस्तव मत्स्यबीज प्रकल्पाची उभारणी : देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:40 IST

औंध: माण-खटावच्या होतकरू युवकांना एखाद्या उद्योग व्यवसायाची माहिती घेता न आल्याने अनेक युवक व्यवसायात अडचणीत आले आहेत. सध्या माशांची ...

औंध: माण-खटावच्या होतकरू युवकांना एखाद्या उद्योग व्यवसायाची माहिती घेता न आल्याने अनेक युवक व्यवसायात अडचणीत आले आहेत. सध्या माशांची शेतीकडे महाराष्ट्रातील अनेक युवकांचा कल आहे. मात्र या प्रकल्पाची माहिती आपल्याकडे मिळत नसल्याने आपल्या दोन्ही तालुक्यातील युवक याकडे वळताना दिसत नाहीत. त्यामुळे होतकरू युवकांच्या माहितीस्तव या प्रकल्पाची उभारणी केली असल्याची माहिती हरणाई सूतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांनी दिली.

हरणाई सूतगिरणीच्या मागील बाजूस अडीच एकर क्षेत्रात मोठे तळे काढले असून यामध्ये ५० हजार मत्स्यबीज यावेळी सोडण्यात आले. यावेळी मार्केट कमिटीचे माजी सभापती अशोकराव गोडसे, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, ॲड. अनुज देशमुख, विशाल देवकर,सयाजी सुर्वे,जनरल मॅनेजर रमेश भोसले, अमृत मटकल्ली, नीलेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी रणजितसिंह देशमुख म्हणाले, अडीच एकरात मत्स्यशेतीसाठी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. यासाठी एक मोठे तळे काढण्यात आले आहे. यामध्ये साडेपाच फूट पाणीसाठा केला आहे. अंदाजे यामध्ये दीड कोटी लीटर पाणी बसेल इतके मोठे आहे. बाजूने आठ फूट उंचीची जाळी मारून बंदिस्त करण्यात आले आहे. गुजरातचे मत्स्य तज्ज्ञ संगम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ५० लाख रुपये खर्च करून हा प्रकल्प उभा केला आहे. यामध्ये आता थिलापिया मोनोसेक्स या प्रजातीचे बीज म्हणजे माशांची पिल्ले सोडण्यात आली आहेत.

हा प्रकल्प उभारणी मागचा एकच उद्देश आहे की दुष्काळी भागातील युवकांना एवढा मोठा नाही. परंतु छोटा उद्योग व्यवसाय उभारता यावा, याची संपूर्ण माहिती या ठिकाणी त्यांना मिळणार आहे. भविष्यात या मातीतून उद्योजक तयार व्हावेत, अशी भावना आमची असल्याचे रणजितसिंह देशमुख यांनी सांगितले.

फोटो आहे :

फोटो ओळ : खटाव तालुक्यातील येळीव येथे हरणाई सूतगिरणीच्या कार्यस्थळावर मत्स्य बीज सोडताना संस्थापक रणजितसिंह देशमुख, अशोकराव गोडसे, डॉ. विवेक देशमुख, विशाल देवकर उपस्थित होते. (छाया-रशिद शेख)