शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

होतकरू युवकांच्या माहितीस्तव मत्स्यबीज प्रकल्पाची उभारणी : देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:40 IST

औंध: माण-खटावच्या होतकरू युवकांना एखाद्या उद्योग व्यवसायाची माहिती घेता न आल्याने अनेक युवक व्यवसायात अडचणीत आले आहेत. सध्या माशांची ...

औंध: माण-खटावच्या होतकरू युवकांना एखाद्या उद्योग व्यवसायाची माहिती घेता न आल्याने अनेक युवक व्यवसायात अडचणीत आले आहेत. सध्या माशांची शेतीकडे महाराष्ट्रातील अनेक युवकांचा कल आहे. मात्र या प्रकल्पाची माहिती आपल्याकडे मिळत नसल्याने आपल्या दोन्ही तालुक्यातील युवक याकडे वळताना दिसत नाहीत. त्यामुळे होतकरू युवकांच्या माहितीस्तव या प्रकल्पाची उभारणी केली असल्याची माहिती हरणाई सूतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांनी दिली.

हरणाई सूतगिरणीच्या मागील बाजूस अडीच एकर क्षेत्रात मोठे तळे काढले असून यामध्ये ५० हजार मत्स्यबीज यावेळी सोडण्यात आले. यावेळी मार्केट कमिटीचे माजी सभापती अशोकराव गोडसे, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, ॲड. अनुज देशमुख, विशाल देवकर,सयाजी सुर्वे,जनरल मॅनेजर रमेश भोसले, अमृत मटकल्ली, नीलेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी रणजितसिंह देशमुख म्हणाले, अडीच एकरात मत्स्यशेतीसाठी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. यासाठी एक मोठे तळे काढण्यात आले आहे. यामध्ये साडेपाच फूट पाणीसाठा केला आहे. अंदाजे यामध्ये दीड कोटी लीटर पाणी बसेल इतके मोठे आहे. बाजूने आठ फूट उंचीची जाळी मारून बंदिस्त करण्यात आले आहे. गुजरातचे मत्स्य तज्ज्ञ संगम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ५० लाख रुपये खर्च करून हा प्रकल्प उभा केला आहे. यामध्ये आता थिलापिया मोनोसेक्स या प्रजातीचे बीज म्हणजे माशांची पिल्ले सोडण्यात आली आहेत.

हा प्रकल्प उभारणी मागचा एकच उद्देश आहे की दुष्काळी भागातील युवकांना एवढा मोठा नाही. परंतु छोटा उद्योग व्यवसाय उभारता यावा, याची संपूर्ण माहिती या ठिकाणी त्यांना मिळणार आहे. भविष्यात या मातीतून उद्योजक तयार व्हावेत, अशी भावना आमची असल्याचे रणजितसिंह देशमुख यांनी सांगितले.

फोटो आहे :

फोटो ओळ : खटाव तालुक्यातील येळीव येथे हरणाई सूतगिरणीच्या कार्यस्थळावर मत्स्य बीज सोडताना संस्थापक रणजितसिंह देशमुख, अशोकराव गोडसे, डॉ. विवेक देशमुख, विशाल देवकर उपस्थित होते. (छाया-रशिद शेख)