शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सिंचनाची वसना... निधीसाठी याचना !

By admin | Updated: December 29, 2014 23:52 IST

खर्च दुपटीने वाढला : चौदा वर्षांपासून रखडलेली योजना पूर्ण करायाला हवेत अजून ७० कोटी रूपये

पिंपोडे बुद्रुक : उत्तर कोरेगाव तालुक्याच्या कायम दुष्काळी भागाला वरदान ठरणारार वसना उपसा सिंचन योजना प्रकल्प गेल्या चौदा वर्षांपासून रखडला असून त्याच्या पुर्णत्वासाठी अजून किमान ७० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे जात असले तरी सध्या पैसे नसल्याचे कारण देऊन ठेकेदाराने काम बंद ठेवले आहे.वसना योजनेचे सर्वेक्षण अनेकवेळा करण्यात आले. या योजनेचे गाजर दाखवून अनेक निवडणुका लढवल्या गेल्या. त्यामध्ये विधानसभेचे माजी सभापती माजी आमदार दिवंगत शंकरराव जगताप, माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील याांच्यासह माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचाही समावेश होतो.शरद पवार यांच्या मूळ गावी नांदवळ, ता. कोरेगाव येथे दि. ९ मे २००० रोजी मान्यवरांच्या व स्वत: शरद पवारांच्या हस्ते या योजनेचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र तब्बल साडे चौदा वर्षे झाली तरी अजून या योजनेचा वनवास संपला नाही. ठेकेदाराने २०१२ साजी पहिला टप्पा पूर्ण केला. या योजनेचे जलपूजन आसनगावच्या माळावर तत्कालिन जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांच्यासह शरद पवारांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर फेब्रुवारी २०१३ पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण करण्याचे आश्वासन तत्कालीन जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांनी दिले होते. अद्याप दुसरा टप्पा पूर्ण झालेला नाही. पंपहाऊसचे ७५ टक्के तर ऊर्ध्वगामी नलिकेचे ६० टक्के काम झाले आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी ठेकेदारास अजून किमान आठ कोटी रुपये आवश्यक आहेत. (वार्ताहर)पूर्वेकडील गावांचा समावेशाचा प्रश्न प्रलंबितवसना उपसा सिंचन योजना ही उत्तर कोरेगावच्या दुष्काळी भागासाठी प्रामुख्याने सर्वेक्षित करण्यात आली, मात्र वसना नदीच्या पश्मिेकडीलच गावे या योजनेमध्ये समाविष्ठ करण्यात आली. पूर्वेकडील भावेनगर, पिंपोडे बुद्रुक, घिगेवाडी, वाठारस्टेशन, तडवळे, सं. वाघोली, फडतरेवाडी, जाधववाडी, विखळे ही गावे कायम दुष्काळीच आहेत. या गावांचा समावेश करण्यासाठी अनेकदा स्थानिक लोकप्रतिनिधींनी निवेदने दिली आहेत. मात्र अजून तरी त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. जर या गावांचा समावेश करण्यात आला तर योजनेच्या खर्चातही मोठी वाढ होणार आहे. दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी किमान दहा कोटी रुपयांची आवश्यकता आहे. सध्या निधी उपलब्ध नसल्यामुळे ठेकेदारानेकाम बंद ठेवले आहे. लवकर निधी उपलब्ध झाला तर मार्च २०१४ पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण होऊन त्यातील क्षेत्र ओलिताखाली येऊ शकेल. व्ही. जी. चव्हाण, कार्यकारी अभियंता, वसना उपसा सिंचन योजना ===कोणत्याही परिस्थिती निधी अभावी काम बंद पडणार नाही, लवकरात लवकर योजना पूर्ण करून उत्तर कोरेगावची दुष्काळी शेती ओलिताखाली आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.दीपक चव्हाण, आमदारवसना योजनेची प्रारंभी ७२ कोटी रुपये प्रकल्प किंमत होती. वाढत्या महागाईमुळे सद्य:स्थितीत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जवळपास १५० कोटी रुपयांवर खर्च जाण्याची शक्यता आहे. कारण आजपर्यंत झालेल्या कामावर ७० कोटी रुपये खर्च झाला आहे तर अजून ७० कोटींची गरज आहे.