शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
2
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
3
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
4
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
5
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
6
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
7
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
8
असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक; म्हणाला, "दोन आठवड्यांपूर्वीच..."
9
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
10
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
11
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
12
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
13
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
14
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
15
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
16
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
17
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
18
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
19
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...

सिंचनाची वसना... निधीसाठी याचना !

By admin | Updated: December 29, 2014 23:52 IST

खर्च दुपटीने वाढला : चौदा वर्षांपासून रखडलेली योजना पूर्ण करायाला हवेत अजून ७० कोटी रूपये

पिंपोडे बुद्रुक : उत्तर कोरेगाव तालुक्याच्या कायम दुष्काळी भागाला वरदान ठरणारार वसना उपसा सिंचन योजना प्रकल्प गेल्या चौदा वर्षांपासून रखडला असून त्याच्या पुर्णत्वासाठी अजून किमान ७० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे जात असले तरी सध्या पैसे नसल्याचे कारण देऊन ठेकेदाराने काम बंद ठेवले आहे.वसना योजनेचे सर्वेक्षण अनेकवेळा करण्यात आले. या योजनेचे गाजर दाखवून अनेक निवडणुका लढवल्या गेल्या. त्यामध्ये विधानसभेचे माजी सभापती माजी आमदार दिवंगत शंकरराव जगताप, माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील याांच्यासह माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचाही समावेश होतो.शरद पवार यांच्या मूळ गावी नांदवळ, ता. कोरेगाव येथे दि. ९ मे २००० रोजी मान्यवरांच्या व स्वत: शरद पवारांच्या हस्ते या योजनेचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र तब्बल साडे चौदा वर्षे झाली तरी अजून या योजनेचा वनवास संपला नाही. ठेकेदाराने २०१२ साजी पहिला टप्पा पूर्ण केला. या योजनेचे जलपूजन आसनगावच्या माळावर तत्कालिन जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांच्यासह शरद पवारांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर फेब्रुवारी २०१३ पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण करण्याचे आश्वासन तत्कालीन जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांनी दिले होते. अद्याप दुसरा टप्पा पूर्ण झालेला नाही. पंपहाऊसचे ७५ टक्के तर ऊर्ध्वगामी नलिकेचे ६० टक्के काम झाले आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी ठेकेदारास अजून किमान आठ कोटी रुपये आवश्यक आहेत. (वार्ताहर)पूर्वेकडील गावांचा समावेशाचा प्रश्न प्रलंबितवसना उपसा सिंचन योजना ही उत्तर कोरेगावच्या दुष्काळी भागासाठी प्रामुख्याने सर्वेक्षित करण्यात आली, मात्र वसना नदीच्या पश्मिेकडीलच गावे या योजनेमध्ये समाविष्ठ करण्यात आली. पूर्वेकडील भावेनगर, पिंपोडे बुद्रुक, घिगेवाडी, वाठारस्टेशन, तडवळे, सं. वाघोली, फडतरेवाडी, जाधववाडी, विखळे ही गावे कायम दुष्काळीच आहेत. या गावांचा समावेश करण्यासाठी अनेकदा स्थानिक लोकप्रतिनिधींनी निवेदने दिली आहेत. मात्र अजून तरी त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. जर या गावांचा समावेश करण्यात आला तर योजनेच्या खर्चातही मोठी वाढ होणार आहे. दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी किमान दहा कोटी रुपयांची आवश्यकता आहे. सध्या निधी उपलब्ध नसल्यामुळे ठेकेदारानेकाम बंद ठेवले आहे. लवकर निधी उपलब्ध झाला तर मार्च २०१४ पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण होऊन त्यातील क्षेत्र ओलिताखाली येऊ शकेल. व्ही. जी. चव्हाण, कार्यकारी अभियंता, वसना उपसा सिंचन योजना ===कोणत्याही परिस्थिती निधी अभावी काम बंद पडणार नाही, लवकरात लवकर योजना पूर्ण करून उत्तर कोरेगावची दुष्काळी शेती ओलिताखाली आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.दीपक चव्हाण, आमदारवसना योजनेची प्रारंभी ७२ कोटी रुपये प्रकल्प किंमत होती. वाढत्या महागाईमुळे सद्य:स्थितीत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जवळपास १५० कोटी रुपयांवर खर्च जाण्याची शक्यता आहे. कारण आजपर्यंत झालेल्या कामावर ७० कोटी रुपये खर्च झाला आहे तर अजून ७० कोटींची गरज आहे.