शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
2
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
3
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
4
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
5
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
8
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
9
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
10
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
11
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
12
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
13
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
14
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
15
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
16
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
17
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
18
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
19
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
20
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप

ग्रामपंचायतींचे अस्तित्व जपण्यासाठी पथदिव्यांचे बिल शासनाने भरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:25 IST

महाबळेश्वर : ग्रामपंचायतींचे अस्तित्व जपण्यासाठी पथदिव्यांचे बिल राज्य शासनाने भरावे व ग्रामपंचायतींना जीवदान द्यावे, अशी मागणी सरपंच परिषद महाराष्ट्र ...

महाबळेश्वर : ग्रामपंचायतींचे अस्तित्व जपण्यासाठी पथदिव्यांचे बिल राज्य शासनाने भरावे व ग्रामपंचायतींना जीवदान द्यावे, अशी मागणी सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेचे जिल्हा समन्वयक व माजी जिल्हाध्यक्ष संजय उतेकर यांनी तापोळा येथे पत्रकार परिषदेत केली आहे.

राज्य शासन रोज नवनवीन परिपत्रक काढत आहे. या परिपत्रकामुळे ग्रामपंचायतींसमोर मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. यापूर्वीच्या परिपत्रकामुळे आधीच ग्रामपंचायती आर्थिक संकटात असताना आता राज्य शासनाने पथदिव्यांचे बिल ग्रामपंचायतींनी भरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायतींचे कंबरडे मोडले आहे. पथदिव्यांचे बिल ग्रामपंचायतींना भरणे शक्य नाही, तरीही शासन हा निर्णय ग्रामपंचायतींवर लादत आहे. अशा या जबरदस्तीमुळे राज्यातील ग्रामपंचायतींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. राज्य शासनाने हा निर्णय जाहीर करताच वीजवितरण कंपनीने या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने सुरू केली आहे. ‘बिल भरा अन्यथा पथदिव्यांचे कनेक्शन तोडण्यासाठी कर्मचारी गावागावात फिरत आहेत. या धोरणामुळे राज्यातील अनेक गावे आता अंधारात जाणार आहेत. सायंकाळनंतर गावागावांवर अंधाराचे साम्राज्य पसरणार आहे, म्हणून राज्य शासनाने या निर्णयाचा फेेरविचार करावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.