शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
12
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
13
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
14
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
15
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
16
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
17
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
18
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
19
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
20
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी

अण्णासाहेब घालतायत विद्यार्थ्यांना ‘टोपी’!

By admin | Updated: July 6, 2015 00:25 IST

महसूलच्या अधिकाऱ्यांना गंडविले : मालदन सजातील प्रकार; दाखल्यासाठी केली जातेय आकडेमोड; तलाठ्याच्या मनमानीने पालक हतबल

ढेबेवाडी : विद्यार्थ्यांना वेठीस धरून आर्थिक पिळवणूक करणाऱ्या मालदन सजातील एका तलाठ्याच्या चौकशीची मागणी पालकांनी केली आहे. पंधरा दिवसांपासून तलाठ्यांची खुर्ची सांभाळणारे हे तलाठी ‘अण्णा मी चार्जच घेतला नाही,’ असे सांगून महसूल विभागालाच गंडा घालीत असल्याचा संशय निर्माण झाला आहे. निलंबनाचा यापूर्वीचा इतिहास असलेल्या या तलाठ्यास ‘आमच्या सजात नियुक्ती करू नका,’ अशी मागणी विभागातील पदाधिकाऱ्यांनी केली आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची धांदल उडाल्याने विद्यार्थ्यांची कागदपत्रे गोळा करण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र ग्रामीण विभागात दिसून येते. प्रवेशासह फी माफीसाठी तलाठ्यांचा रहिवासी आणि उत्पन्नाचा दाखला गरजेचा असल्याने तलाठी कार्यालये विद्यार्थ्यांनी फुललेली दिसत आहेत.या विभागात काही सजा तलाठ्यांविना आहेत. तर काही गावांमध्ये तलाठ्यांची नेमणूक असूनसुध्दा विद्यार्थ्यांची पिळवणूक होत आहे. मालदन परिसरातील एका सजातील तलाठी ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. तेथील तात्पुरता चार्ज ढेबेवाडीचे तलाठ्यांकडे देण्यात आला. त्यानंतर १५ जून पासून याठिकाणी कऱ्हाडहून बदलून आलेल्या तलाठ्यांनी धुरा खांद्यावर घेतली. पंधरा दिवसांपासून येथील खुर्ची सांभाळणारे या तलाठी अण्णांनी मात्र लगेचच आकडेमोडीस सुरुवात केली. उत्पन्नाचा दाखला २०० रुपये, रहिवासी दाखला १०० रुपये आणि वारस नोंद २००० रुपये हे सर्व करताना पूर्वीचा इतिहास पाठीशी असल्याने आता ते चक्क तोंडाने आकडा न सांगता संबंधितांना कागदावर लिहून देत आहेत. ‘विद्यार्थ्यांची व शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या तलाठ्यांची उचलबांगडी करा,’ अशी मागणी होत आहे. (वार्ताहर) पद्भार घेतला नाही, मग दाखले कसे देता?विद्यार्थ्यांना शालेय कामासाठी सध्या विविध दाखल्यांची गरज पडते. त्यामुळे ते तलाठी कार्यालयात जातात. त्याठिकाणी गेल्यानंतर त्यांनी रहिवासी व उत्पन्नाचा दाखला मागितला की, हे तलाठी दाखला देण्यासाठी आकडेमोड करतात. काही दिवसांपूर्वी याबाबत काही पालकांनी संबंधित तलाठ्यांना जाब विचारला. ‘पैसे पाहिजे असतील तर आम्हाला लेखी द्या,’ असे ते म्हणाले. त्यावर तलाठ्यांनी मी अजून पद्भारच घेतला नाही, असे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. मुळात जर संबंधित तलाठ्यांनी पद्भार घेतलेलाच नाही, तर ते दाखले कसे देतायत, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.विद्यार्थ्यांची हेळसांडतलाठ्याच्या आडमुठेपणामुळे विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. आकडेमोडीशिवाय त्यांचा पेनच हालत नाही. त्यांनी कामात बदल करावा; अन्यथा आंदोलन करावे लागेल.- दिलीप गुंजाळकर,ग्रामपंचायत सदस्य, मान्याचीवाडी